शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पांढरकवडातून अवैध व्यावसायिक भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:28 IST

कै.वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरूवारी पांढरकवडा शहरातील मटका, जुगार अड्डयाचे स्टींग आॅपरेशन केल्यानंतर अवैध व्यावसायिकांची चांगलीच दाणादाण उडाली. नव्या ठाणेदाराच्या कार्यपद्धतीची जाणिव असल्याने शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायिक भूमिगत झाले आहेत.

ठळक मुद्देनवे ठाणेदार रुजू : चोरमंडी परिसरात शुकशुकाट, मटका अड्डा चालकांची धरपकड

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : कै.वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरूवारी पांढरकवडा शहरातील मटका, जुगार अड्डयाचे स्टींग आॅपरेशन केल्यानंतर अवैध व्यावसायिकांची चांगलीच दाणादाण उडाली. नव्या ठाणेदाराच्या कार्यपद्धतीची जाणिव असल्याने शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायिक भूमिगत झाले आहेत. शुक्रवारी नवे ठाणेदार अनिलसिंह गौतम यांनी शहरात फेरफटका मारून परिस्थितीचे अवलोकन केले.शहरातील आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. हे अवैध धंदे बंद करण्याचे वरिष्ठांचे आदेश झुगारूनदेखील पांढरकवडा शहरात अवैध धंद्यांना परवानगी देण्यात आली होती. यामुळे शेतकरी वर्ग लुटल्या जात होता. यातून शेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी किशोर तिवारी यांनी हे अड्डे बंद व्हावेत, याकरिता गुरूवारी स्वत: या अड्डयांवर फिरून स्टींग आॅपरेशन केले. त्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. याची दखल घेत ठाणेदार बचाटे यांची त्याच दिवशी तडकाफडकी बदली करण्यात आली. गुरूवारी रात्रीच त्यांच्या जागी नवे ठाणेदार म्हणून अनिलसिंह गौतम यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला. ही वार्ता अवैध व्यावसायिकांत पसरताच, सर्व अवैध धंदे चालक आपला गाशा गुंडाळून भूमिगत झाले. पोलीस यंत्रणेकडून या सर्वांची माहिती गोळा करणे सुरू असून त्यांना तातडीने पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश गौतम यांनी दिल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.पाटणबोरीचा आंतराज्यीय जुगार अड्डयाला टाळेपांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे आंतराज्यीय जुगार अड्डा भरविला जातो. यवतमाळच्या पोलीस यंत्रणेने अनेकदा हा अड्डा उद्ध्वस्थ केला. मात्र स्थानिक पोलिसांच्या परवानगीने हा अड्डा अजुनही सुरूच होता. मात्र गुरूवारी किशोर तिवारी यांनी केलेल्या स्टींग आॅपरेशननंतर पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी अनिलसिंह गौतम यांची नियुक्ती करण्यात येताच, पाटणबोरीतील आंतरराज्यीय जुगार अड्डयाला अवैध व्यावसायिकांनी टाळे ठोकले. शुक्रवारी दिवसभर हा अड्डा बंद होता.शासनाच्या चुकीच्या धोरणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहे, त्यात भर म्हणून राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळेदेखील शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला.कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत-गौतमठाण्याअंतर्गत कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे चालू देणार नाही. तसेच कोणत्याही राजकीय दबाबापोटी गुन्हेगारांना पाठिशी घालणार नाही , असे ठाणेदार अनिलसिंह गौतम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अप्रीय घटना घडू नये, याचीही खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.