शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

तर ग्रामसेवकांवर फौजदारी

By admin | Updated: January 29, 2015 23:13 IST

ग्रामपंचायतस्तरावरील अपहाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून बदली झाल्यानंतरही ग्रामसेवक प्रभार हस्तांतरितच करीत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी थेट ग्रामपंचायत

सीईओंचे निर्देश : ग्रामपंचायतींचा ‘प्रभार’ दडपणे भोवणार यवतमाळ : ग्रामपंचायतस्तरावरील अपहाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून बदली झाल्यानंतरही ग्रामसेवक प्रभार हस्तांतरितच करीत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी थेट ग्रामपंचायत अधिनियमाचा आधार घेऊन खटला दाखल करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिले आहे. ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाज आॅनलाईन करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामसेवक बदलताच ग्रामपंचायतींचे दप्तरही बदलते. कोट्यवधींच्या मुद्रांक शुल्क घोटाळ्याची चौकशी करण्यासाठीही समितीला कागदपत्रेच मिळाली नाही. गेल्या पाच वर्षाचाही ताळेबंद अनेक ग्रामपंचायतींकडे उपलब्ध नाही. स्थानिक अंकेक्षण समितीकडून लेखा परीक्षण करण्यासाठी दस्ताऐवजाची मागणी केली जाते. या समितीलाही अभावानेच ताळेबंद उपलब्ध होतो. आतापर्यंत अनेक ग्रामसेवकांवर कारवाई झाली आहे. मात्र ग्रामसेवक निलंबनालाही जुमानत नाही. महिना दोन महिने निलंबित राहिल्यानंतर पुन्हा सेवेत यायचे, अशी स्थिती आहे. यावर वचक निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीतील अधिकारी, कर्मचारी, सचिव या पैकी ज्या कोण्या व्यक्तीने कोणतेही अभिलेखे, पैसे याचा प्रभार दिला नाही अशा व्यक्तीवर निलंबनानंतर खटला चालविण्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमामध्ये करण्यात आली आहे. या अंतर्गत दिग्रस तालुक्यातील माळहिवरा येथील ग्रामसेवक उडाखे यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. सूचना देऊनही कुठलीही कार्यवाही झाली नाही. आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे खटला दाखल करण्याचे निर्देश सीईओ डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)