शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

परिवर्तनासाठी व्यक्तिपूजेपेक्षा विचारधारा महत्त्वाची

By admin | Updated: November 30, 2015 02:23 IST

आरक्षणाचे जनक महाराष्ट्रात जन्मले परिणामी महाराष्ट्रात सामाजिक चेतना निर्माण झाली. मात्र त्याचे फळ उत्तरप्रदेश आणि बिहारला मिळाले आहे.

चंद्रशेखर यादव : यवतमाळ येथे स्मृती पर्वाच्या उद्घाटनाला प्रचंड गर्दीयवतमाळ : आरक्षणाचे जनक महाराष्ट्रात जन्मले परिणामी महाराष्ट्रात सामाजिक चेतना निर्माण झाली. मात्र त्याचे फळ उत्तरप्रदेश आणि बिहारला मिळाले आहे. बहुसंख्य असूनही एकाशी दुसऱ्याचे पटत नाही. व्यक्तीपूजक झाल्याने त्यांचे विभाजन झाले. सर्व प्रकारच्या व्यवस्थेत बदल होण्यासाठी व्यक्तिपूजेला नाकारून विचारधारा स्वीकारण्याची गरज आहे. काहींजवळ ज्ञान आहे तर इमान नाही, काहींजवळ इमान आहे तर ज्ञान नाही. हे दोन्ही एकत्र येण्यासाठी सर्वांना एकजूट करण्याची गरज आहे, असे आवाहन भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर यादव यांनी केले. स्मृतीपर्वाच्या उद्घाटन पर्वात ते ‘ओबीसी के अच्छे दिन आ सकते है. बशर्ते की वह जागरूक रहे’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सत्यशोधक गोलमेज परिषदेचे राष्ट्रीय संयोजक ज्ञानेश्वर गोबरे होते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीपर्वाला २८ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. संत कबीर विचारपीठावर सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक समाजातील बुद्धिवंतांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे शक्य झाले तर सर्वच क्षेत्रात चांगले दिवस येऊ शकतात. स्मृतीपर्वाच्या दुसऱ्या सत्रात ‘महात्मा फुले यांचे सार्वजनिक सत्य व त्याची सध्य स्थितीतील उपयुक्तता’ या विषयावर नागपूरचे सत्यशोधक प्रबोधनकार अरविंद माळी यांनी आपले विचार व्यक्त केले. महात्मा फुले यांनी शिक्षण सार्वजनिक तेव्हा मनुवादी घाबरले. त्यांनी मनुस्मृती नाकारली म्हणून मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना विरोध केला. सत्य-असत्य कळण्याची क्षमता शिक्षणामुळे येते. हेच मनुवाद्यांना नको होते. संत कबीर विचारपीठावर यावेळी डॉ. दिलीप घावडे, प्रा. काशिनाथ लाहोरे, राजेश खवले, प्रा. सविता हजारे, मायाताई गोबरे, रवी नागरीकर, प्रा. सलिम चव्हाण, अशोक तिखे, प्रा. रमेश पिसे आदी मंडळी उपस्थित होती. प्रारंभी समता गीत गायक आणि प्रबोधनकार भीमदास नाईक तसेच त्यांच्या संचाने सादर केली. ललिता वाघ यांनी वंदन गीत सादर केले. राजेश मुके यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. दीपक वाघ यांनी सूत्रसंचालन केले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)