शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनासाठी व्यक्तिपूजेपेक्षा विचारधारा महत्त्वाची

By admin | Updated: November 30, 2015 02:23 IST

आरक्षणाचे जनक महाराष्ट्रात जन्मले परिणामी महाराष्ट्रात सामाजिक चेतना निर्माण झाली. मात्र त्याचे फळ उत्तरप्रदेश आणि बिहारला मिळाले आहे.

चंद्रशेखर यादव : यवतमाळ येथे स्मृती पर्वाच्या उद्घाटनाला प्रचंड गर्दीयवतमाळ : आरक्षणाचे जनक महाराष्ट्रात जन्मले परिणामी महाराष्ट्रात सामाजिक चेतना निर्माण झाली. मात्र त्याचे फळ उत्तरप्रदेश आणि बिहारला मिळाले आहे. बहुसंख्य असूनही एकाशी दुसऱ्याचे पटत नाही. व्यक्तीपूजक झाल्याने त्यांचे विभाजन झाले. सर्व प्रकारच्या व्यवस्थेत बदल होण्यासाठी व्यक्तिपूजेला नाकारून विचारधारा स्वीकारण्याची गरज आहे. काहींजवळ ज्ञान आहे तर इमान नाही, काहींजवळ इमान आहे तर ज्ञान नाही. हे दोन्ही एकत्र येण्यासाठी सर्वांना एकजूट करण्याची गरज आहे, असे आवाहन भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर यादव यांनी केले. स्मृतीपर्वाच्या उद्घाटन पर्वात ते ‘ओबीसी के अच्छे दिन आ सकते है. बशर्ते की वह जागरूक रहे’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सत्यशोधक गोलमेज परिषदेचे राष्ट्रीय संयोजक ज्ञानेश्वर गोबरे होते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीपर्वाला २८ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. संत कबीर विचारपीठावर सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक समाजातील बुद्धिवंतांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे शक्य झाले तर सर्वच क्षेत्रात चांगले दिवस येऊ शकतात. स्मृतीपर्वाच्या दुसऱ्या सत्रात ‘महात्मा फुले यांचे सार्वजनिक सत्य व त्याची सध्य स्थितीतील उपयुक्तता’ या विषयावर नागपूरचे सत्यशोधक प्रबोधनकार अरविंद माळी यांनी आपले विचार व्यक्त केले. महात्मा फुले यांनी शिक्षण सार्वजनिक तेव्हा मनुवादी घाबरले. त्यांनी मनुस्मृती नाकारली म्हणून मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना विरोध केला. सत्य-असत्य कळण्याची क्षमता शिक्षणामुळे येते. हेच मनुवाद्यांना नको होते. संत कबीर विचारपीठावर यावेळी डॉ. दिलीप घावडे, प्रा. काशिनाथ लाहोरे, राजेश खवले, प्रा. सविता हजारे, मायाताई गोबरे, रवी नागरीकर, प्रा. सलिम चव्हाण, अशोक तिखे, प्रा. रमेश पिसे आदी मंडळी उपस्थित होती. प्रारंभी समता गीत गायक आणि प्रबोधनकार भीमदास नाईक तसेच त्यांच्या संचाने सादर केली. ललिता वाघ यांनी वंदन गीत सादर केले. राजेश मुके यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. दीपक वाघ यांनी सूत्रसंचालन केले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)