शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नवरा-बायकोने मिळून बांधलेल्या घरकुलांचाच धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

जिल्ह्यात २०१६ ते २०२२ या सहा वर्षांच्या काळात विविध योजनांमधून ६० हजार ६३७ घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र घरकूल मंजूर झाल्यावर प्रशासनाच्या पाठपुराव्यासह स्वत:ही मेहनत घेऊन घरकूल बांधून पूर्ण करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी असते. अशावेळी नवरा-बायको दोघेही संसारासाठी एकदिलाने एकत्र आले तर घर बांधून पूर्ण होतेच. त्याचाच प्रत्यय या योजनेतही आला.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घर असते दोघांचे... दोघांनी मिळून सावरायचे... या कवितेसारखीच जिल्ह्यातील घरकूल योजनेची ताजी स्थिती पुढे आली आहे. भले रोज मजुरी करत असतील, पण ज्या नवरा-बायकोने दोघांच्याही एकत्रित नावाने घरकुलासाठी अर्ज केला, त्यांचे घरकूल बांधून पूर्णही झाले अन् त्यात त्यांचा संसारही गोडीगुलाबीने बहरला. तर ज्या महिलेने वा पुरुषाने एकट्याच्याच नावाने घरकूल मागितले, त्याला मंजुरी तर मिळाली; पण त्याचे बांधकामच झालेले नाही.जिल्ह्यात २०१६ ते २०२२ या सहा वर्षांच्या काळात विविध योजनांमधून ६० हजार ६३७ घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र घरकूल मंजूर झाल्यावर प्रशासनाच्या पाठपुराव्यासह स्वत:ही मेहनत घेऊन घरकूल बांधून पूर्ण करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी असते. अशावेळी नवरा-बायको दोघेही संसारासाठी एकदिलाने एकत्र आले तर घर बांधून पूर्ण होतेच. त्याचाच प्रत्यय या योजनेतही आला. ३८ हजार ९१९ दाम्पत्यांपैकी तब्बल २६ हजार ७०६ जोडप्यांनी आपले घरकूल पूर्ण करून त्यात आनंदाने राहायलाही गेले. त्याचवेळी एकट्या महिलेला किंवा एकट्या पुरुषाला घरकूल बांधण्यात असे यश आल्याचे दिसत नाही. जिल्ह्यातील ७ हजार ३७० पुरुषांनी एकट्याच्याच नावाने घरकूल मंजूर करून घेतले; पण त्यातील २ हजार २९५ पुरुषांना सहा वर्षे उलटूनही घर पूर्ण करता आलेले नाही. हीच अवस्था एकट्या महिलेचीही आहे. तब्बल ११ हजार ८१४ महिलांना स्वतंत्ररीत्या घरकूल मंजूर होऊनही त्यातील ३ हजार ४६६ महिलांचे घर पूर्ण होऊच शकले नाही.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास ही केंद्र पुरस्कृत योजना तसेच शबरी आवास, रमाई आवास, पारधी आवास, आदिम आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, अटल बांधकाम कामगार आवास आदी राज्य पुरस्कृत घरकूल योजना डीआरडीएमार्फत राबविल्या जात आहेत. त्यात घरकूल मंजूर होण्यापासून तर त्याचे बांधकाम पूर्ण होण्यापर्यंतच्या कामात ‘एकट्या’ अर्जदारापेक्षा ‘दाम्पत्य’ अर्जदारांचाच धडाका दिसून येतो. बंगला असो वा छोटेसे घरकूल, ते बांधण्यासाठी रेती-सिमेंट लागतेच, पण त्या घरकुलाला ‘पूर्णत्व’ येण्यासाठी नवरा-बायकोचे प्रेमच हवे.

एकटी महिला पुरुषांच्या पुढे

विधवा, निराधार असलेल्या अनेक महिलांना घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून आपले घरकूल पूर्ण करून घेतले. वेळप्रसंगी स्वत:च्या मजुरीतून गोळा केलेले पैसे लावून बांधकाम केले. अशा महिलांची संख्या आठ हजारांवर आहे. त्या तुलनेत पुरुष लाभार्थी केवळ पाच हजार आहेत.

१८ हजार घरे केवळ कागदावरच

गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून जिल्ह्यात सहा वर्षात ६० हजारांपेक्षा अधिक घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र त्यात राज्य योजनेतील ५७६६ आणि केंद्र पुरस्कृत योजनेतील १३०८२ अशी १८ हजार ८४८ घरकुले अद्यापही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. तर ४१ हजार ७८९ घरकुले पूर्ण झाली. त्यात राज्य योजनेच्या १४२१७ तसेच केंद्र पुरस्कृत योजनेच्या २७५७२ घरांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना