शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नवरा-बायकोने मिळून बांधलेल्या घरकुलांचाच धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

जिल्ह्यात २०१६ ते २०२२ या सहा वर्षांच्या काळात विविध योजनांमधून ६० हजार ६३७ घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र घरकूल मंजूर झाल्यावर प्रशासनाच्या पाठपुराव्यासह स्वत:ही मेहनत घेऊन घरकूल बांधून पूर्ण करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी असते. अशावेळी नवरा-बायको दोघेही संसारासाठी एकदिलाने एकत्र आले तर घर बांधून पूर्ण होतेच. त्याचाच प्रत्यय या योजनेतही आला.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घर असते दोघांचे... दोघांनी मिळून सावरायचे... या कवितेसारखीच जिल्ह्यातील घरकूल योजनेची ताजी स्थिती पुढे आली आहे. भले रोज मजुरी करत असतील, पण ज्या नवरा-बायकोने दोघांच्याही एकत्रित नावाने घरकुलासाठी अर्ज केला, त्यांचे घरकूल बांधून पूर्णही झाले अन् त्यात त्यांचा संसारही गोडीगुलाबीने बहरला. तर ज्या महिलेने वा पुरुषाने एकट्याच्याच नावाने घरकूल मागितले, त्याला मंजुरी तर मिळाली; पण त्याचे बांधकामच झालेले नाही.जिल्ह्यात २०१६ ते २०२२ या सहा वर्षांच्या काळात विविध योजनांमधून ६० हजार ६३७ घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र घरकूल मंजूर झाल्यावर प्रशासनाच्या पाठपुराव्यासह स्वत:ही मेहनत घेऊन घरकूल बांधून पूर्ण करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी असते. अशावेळी नवरा-बायको दोघेही संसारासाठी एकदिलाने एकत्र आले तर घर बांधून पूर्ण होतेच. त्याचाच प्रत्यय या योजनेतही आला. ३८ हजार ९१९ दाम्पत्यांपैकी तब्बल २६ हजार ७०६ जोडप्यांनी आपले घरकूल पूर्ण करून त्यात आनंदाने राहायलाही गेले. त्याचवेळी एकट्या महिलेला किंवा एकट्या पुरुषाला घरकूल बांधण्यात असे यश आल्याचे दिसत नाही. जिल्ह्यातील ७ हजार ३७० पुरुषांनी एकट्याच्याच नावाने घरकूल मंजूर करून घेतले; पण त्यातील २ हजार २९५ पुरुषांना सहा वर्षे उलटूनही घर पूर्ण करता आलेले नाही. हीच अवस्था एकट्या महिलेचीही आहे. तब्बल ११ हजार ८१४ महिलांना स्वतंत्ररीत्या घरकूल मंजूर होऊनही त्यातील ३ हजार ४६६ महिलांचे घर पूर्ण होऊच शकले नाही.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास ही केंद्र पुरस्कृत योजना तसेच शबरी आवास, रमाई आवास, पारधी आवास, आदिम आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, अटल बांधकाम कामगार आवास आदी राज्य पुरस्कृत घरकूल योजना डीआरडीएमार्फत राबविल्या जात आहेत. त्यात घरकूल मंजूर होण्यापासून तर त्याचे बांधकाम पूर्ण होण्यापर्यंतच्या कामात ‘एकट्या’ अर्जदारापेक्षा ‘दाम्पत्य’ अर्जदारांचाच धडाका दिसून येतो. बंगला असो वा छोटेसे घरकूल, ते बांधण्यासाठी रेती-सिमेंट लागतेच, पण त्या घरकुलाला ‘पूर्णत्व’ येण्यासाठी नवरा-बायकोचे प्रेमच हवे.

एकटी महिला पुरुषांच्या पुढे

विधवा, निराधार असलेल्या अनेक महिलांना घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून आपले घरकूल पूर्ण करून घेतले. वेळप्रसंगी स्वत:च्या मजुरीतून गोळा केलेले पैसे लावून बांधकाम केले. अशा महिलांची संख्या आठ हजारांवर आहे. त्या तुलनेत पुरुष लाभार्थी केवळ पाच हजार आहेत.

१८ हजार घरे केवळ कागदावरच

गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून जिल्ह्यात सहा वर्षात ६० हजारांपेक्षा अधिक घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र त्यात राज्य योजनेतील ५७६६ आणि केंद्र पुरस्कृत योजनेतील १३०८२ अशी १८ हजार ८४८ घरकुले अद्यापही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. तर ४१ हजार ७८९ घरकुले पूर्ण झाली. त्यात राज्य योजनेच्या १४२१७ तसेच केंद्र पुरस्कृत योजनेच्या २७५७२ घरांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना