शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नवरा-बायकोने मिळून बांधलेल्या घरकुलांचाच धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

जिल्ह्यात २०१६ ते २०२२ या सहा वर्षांच्या काळात विविध योजनांमधून ६० हजार ६३७ घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र घरकूल मंजूर झाल्यावर प्रशासनाच्या पाठपुराव्यासह स्वत:ही मेहनत घेऊन घरकूल बांधून पूर्ण करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी असते. अशावेळी नवरा-बायको दोघेही संसारासाठी एकदिलाने एकत्र आले तर घर बांधून पूर्ण होतेच. त्याचाच प्रत्यय या योजनेतही आला.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घर असते दोघांचे... दोघांनी मिळून सावरायचे... या कवितेसारखीच जिल्ह्यातील घरकूल योजनेची ताजी स्थिती पुढे आली आहे. भले रोज मजुरी करत असतील, पण ज्या नवरा-बायकोने दोघांच्याही एकत्रित नावाने घरकुलासाठी अर्ज केला, त्यांचे घरकूल बांधून पूर्णही झाले अन् त्यात त्यांचा संसारही गोडीगुलाबीने बहरला. तर ज्या महिलेने वा पुरुषाने एकट्याच्याच नावाने घरकूल मागितले, त्याला मंजुरी तर मिळाली; पण त्याचे बांधकामच झालेले नाही.जिल्ह्यात २०१६ ते २०२२ या सहा वर्षांच्या काळात विविध योजनांमधून ६० हजार ६३७ घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र घरकूल मंजूर झाल्यावर प्रशासनाच्या पाठपुराव्यासह स्वत:ही मेहनत घेऊन घरकूल बांधून पूर्ण करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी असते. अशावेळी नवरा-बायको दोघेही संसारासाठी एकदिलाने एकत्र आले तर घर बांधून पूर्ण होतेच. त्याचाच प्रत्यय या योजनेतही आला. ३८ हजार ९१९ दाम्पत्यांपैकी तब्बल २६ हजार ७०६ जोडप्यांनी आपले घरकूल पूर्ण करून त्यात आनंदाने राहायलाही गेले. त्याचवेळी एकट्या महिलेला किंवा एकट्या पुरुषाला घरकूल बांधण्यात असे यश आल्याचे दिसत नाही. जिल्ह्यातील ७ हजार ३७० पुरुषांनी एकट्याच्याच नावाने घरकूल मंजूर करून घेतले; पण त्यातील २ हजार २९५ पुरुषांना सहा वर्षे उलटूनही घर पूर्ण करता आलेले नाही. हीच अवस्था एकट्या महिलेचीही आहे. तब्बल ११ हजार ८१४ महिलांना स्वतंत्ररीत्या घरकूल मंजूर होऊनही त्यातील ३ हजार ४६६ महिलांचे घर पूर्ण होऊच शकले नाही.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास ही केंद्र पुरस्कृत योजना तसेच शबरी आवास, रमाई आवास, पारधी आवास, आदिम आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, अटल बांधकाम कामगार आवास आदी राज्य पुरस्कृत घरकूल योजना डीआरडीएमार्फत राबविल्या जात आहेत. त्यात घरकूल मंजूर होण्यापासून तर त्याचे बांधकाम पूर्ण होण्यापर्यंतच्या कामात ‘एकट्या’ अर्जदारापेक्षा ‘दाम्पत्य’ अर्जदारांचाच धडाका दिसून येतो. बंगला असो वा छोटेसे घरकूल, ते बांधण्यासाठी रेती-सिमेंट लागतेच, पण त्या घरकुलाला ‘पूर्णत्व’ येण्यासाठी नवरा-बायकोचे प्रेमच हवे.

एकटी महिला पुरुषांच्या पुढे

विधवा, निराधार असलेल्या अनेक महिलांना घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून आपले घरकूल पूर्ण करून घेतले. वेळप्रसंगी स्वत:च्या मजुरीतून गोळा केलेले पैसे लावून बांधकाम केले. अशा महिलांची संख्या आठ हजारांवर आहे. त्या तुलनेत पुरुष लाभार्थी केवळ पाच हजार आहेत.

१८ हजार घरे केवळ कागदावरच

गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून जिल्ह्यात सहा वर्षात ६० हजारांपेक्षा अधिक घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र त्यात राज्य योजनेतील ५७६६ आणि केंद्र पुरस्कृत योजनेतील १३०८२ अशी १८ हजार ८४८ घरकुले अद्यापही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. तर ४१ हजार ७८९ घरकुले पूर्ण झाली. त्यात राज्य योजनेच्या १४२१७ तसेच केंद्र पुरस्कृत योजनेच्या २७५७२ घरांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना