शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

यवतमाळ शहरात शंभरावर वाहनांची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे  आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून चाेरट्यांचा धुमाकूळ : पाेलीस उरले केवळ तक्रारी नाेंदविण्यापुरते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  शहरसह जिल्ह्यात दुचाकी चाेरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात शंभरावर वाहने चाेरीला गेली आहेत. यवतमाळात दर दिवशी पाच ते सहा वाहने चाेरीला जात आहेत. पाेलीस केवळ तक्रारी नाेंदविण्यापुरतीच भूमिका वठवत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार थेट दाखल करून घेतली जात नाही, त्यामुळे दर दिवशीचे प्रमाण रेकाॅर्डवर कमी दिसत आहे. चाेरटे सैराट झाल्याने सामान्य नागरिक हैराण आहेत.  दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे  आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे. दुचाकी सापडल्यास ती तक्रार नाेंदविल्यावर सहज परत करता येत नाही, असे सांगून परत पाठविले जाते. दुचाकी गेल्याचे दु:ख घेऊन त्या व्यक्तीलाच स्वत:च्या गाडीचा शाेध घ्यावा लागताे. शाेधाशाेध करून ती सापडत नाही. मात्र, पाेलीस ठाण्यातील हा अनुभव आल्यानंतर बरेच जण पुन्हा तक्रार देण्यासाठी जात नाही, त्यामुळे अनेक गुन्हे रेकाॅर्डवर येत नाहीत. शहरासह ग्रामीण भागातही दुचाकी चाेरटे सक्रिय आहे. महगाव, उमरखेड, पुसद, आर्णी या तालुक्यातील गावांमध्ये दुचाकी चाेरीचे गुन्हे घडत आहे. अनलाॅकच्या प्रक्रियेत गुन्ह्याचा आलेख वाढणार, ही शक्यता अनेक जाणकारांनी वर्तविली हाेती. आता याची प्रचिती येत आहे. चाेरीच्या दुचाकीचा वापर हा विविध गुन्ह्यांमध्ये केला जाताे, अशा घटनाही घडत आहेत. 

चाेरट्यांना माेकळे रान

- यवतमाळ शहरातील शहर पाेलीस ठाणे, अवधूतवाडी पाेलीस ठाणे, ग्रामीण व लाेहरा पाेलीस ठाण्यातही चाेरीचे गुन्हे दाखल हाेत आहे. दुचाकी चाेरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी काेणतीच ठाेस उपाययाेजना पाेलिसांकडून प्रभावीपणे राबविली जात नाही. यामुळेच चाेरट्यांचे फावत आहे.  अनेक प्रमुख चाैकात असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहे. या कारणाने अनेक घटना उघडकीस येत नाही. किमान सीसीटीव्ही सुरू असल्यास चाेरट्यांच्या टाेळीचा झडा लागण्याला मदत हाेईल, असे जाणकार पाेलीस कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस