शहरं
Join us  
Trending Stories
1
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
2
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
3
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
4
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
5
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
6
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
7
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
8
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
9
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
10
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
11
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
12
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
13
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
14
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
15
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
16
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
17
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
18
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
19
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
20
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्तीसाठी आता शेकडो माध्यमिक शाळा ‘रडार’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:41 IST

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या सलाम फाउंडेशनने आता माध्यमिक शाळांना रडारवर घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प सलाम फाउंडेशन व शिक्षण विभागाने केला आहे.

ठळक मुद्देसंकल्प : शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या सलाम फाउंडेशनने आता माध्यमिक शाळांना रडारवर घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प सलाम फाउंडेशन व शिक्षण विभागाने केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात काही समन्वयकाची निवडही करण्यात आली आहे. त्यामुळे तंबाखुयुुक्त खºर्याचे सेवन करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.सलाम फाउंडेशनने तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा बनविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याची निवड केली. प्रथम टप्प्यात प्राथमिक शाळांमध्ये जनजागृती करून तंबाखूमुक्तीची चळवळ गावागावांत पोहोचविली. शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी या चळवळीला बळकटी देऊन शिक्षकांना आवाहन केले. शिक्षकांनी त्याला प्रतिसादही दिला. काही चिमुकल्या मुलींनी आपल्या पालकांनासुद्धा तंबाखू सोडण्यास बाध्य केले. अशा विद्यार्थिनी व पालकांचा सलाम फाउंडेशनने सत्कारही केला आणि वर्षभरात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा सलाम फाउंडेशन व शिक्षण विभागाने केला. या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेण्यात आली.जिल्ह्याला शासनाने गौरवपत्र बहाल केले. कागदोपत्री का होईना पण सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्या. आता यावर्षी माध्यमिक शाळांना तंबाखूमुक्त करण्याचा ध्यास फाउंडेशनने घेतला. नव्याने जिल्ह्यात आलेले शिक्षणाधिकारी दीपक चवने यांनीही या चांगल्या उपक्रमाला उचलून धरले आहे. त्यासाठी १ जुलै ते ३१ मे २०१८ पर्यंत तंबाखूमुक्त अभियानांतर्गत राबवायच्या विविध कार्यक्रमाचे वार्षिक नियोजन करून देण्यात आले आहे. शासनाने तंबाखू नियंत्रण कायदा २००३ हा अध्यादेश काढला आहे.या अध्यादेशातील कलम २३ नुसार शालेय परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ हाताळणाºया, विक्री करणाºया किंवा सेवन करणाºया व्यक्तीवर २०० रूपये दंड ठोकण्याचे अधिकार मुख्याध्यापकांनाच देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिलेले तंबाखूमुक्त शाळांसाठी ११ निकष ठरवून देण्यात आले आहेत.शाळांनी प्रत्येक निकष पूर्ण केल्याचा पुरावा ‘टोबॅको फ्री स्कूल’ या अ‍ॅपमध्ये अपलोड करावयाच्या आहे. अकराही निकषांची पूर्तता झाल्यानंतरच संबंधित शाळेला तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित केले जाणार आहे.तंबाखू सेवनाने दररोज अडीच हजार लोकांचा मृत्यूदेशात २९ टक्के, तर महाराष्ट्रात २७ टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन करतात. भारतात दररोज २५०० लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. जगात तंबाखूमुळे होणाºया तोंडाच्या कँसरचे सर्वाधिक रूग्ण भारतात आहे. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधिन गेलेली आहेत. भारतात प्रत्येक १६ सेकंदाला एक मुल तंबाखूचे पहिल्यांच सेवन करते.