शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:34 IST

पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देशिरपूर ग्रामपंचायतीचा प्रताप : रोप लागवडीचा उडविला बोजवारा, शासनाच्या उद्देशाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. यापैकी एक हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी कनाके यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ५०० पेक्षा अधिक झाडांची लागवड झाली नसल्याची बाब एका जाणकाराने ‘लोकमत’ला सांगितली. एक हजार रोपांची लागवड केल्यानंतर उर्वरित २०० पैकी १०० झाडे गावात वाटण्यात आली. त्यातील उरलेली १०० झाडे पाण्याअभावी सुकून गेल्याने ती फेकण्यात आली, असे सरपंचांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र पुन्हा एकदा त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क करून वृक्ष लागवडीबाबत वेगवेगळ्या आकड्यांचा खेळ सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ३०० पेक्षा अधिक रोपे ग्रामपंचायतीच्या एका खोलीत ठेवण्यात आली होती. या रोपांची ग्रामपंचायतीने अखेरपर्यंत लागवडच केली नाही. त्यामुळे पाण्याअभावी ती सुकून गेली.६ नोव्हेंबरला शिरपूर येथे पाणी विषयात शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, गटविकास अधिकारी राजेश गायनर तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे वृक्ष लागवडीबाबतचे पितळ उघडे पडेल, या भीतीने ग्रामपंचायतीने ६ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे ही रोपे एका ट्रॅक्टरमध्ये भरून नेऊन ती शिरपूरलगतच्या तलावात फेकून दिली. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.गेल्या काही वर्षात निसर्गाचा असमतोल निर्माण झाला. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाला सामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होताच वृक्ष लागवडीची मोठी मोहिम हाती घेण्यात आली. त्यानुसार शिरपूर ग्रामपंचायतीलाही एक हजार २०० वृक्षांची लागवड करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु मुळातच या विषयात अनास्था असलेल्या ग्रामपंचायतीने या योजनेचा पार बोजवारा उडवून टाकला. ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या रोपांपैकी किती झाडे जगलीत, असा प्रश्न विचारल असता, त्याचे उत्तरही सरपंच मिनाक्षी कनाके देऊ शकल्या नाहीत. माहिती घेऊन सांगते, असे ‘टीपीकल’ उत्तर त्यांनी ‘लोकमत’ला देऊन वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी एक हजार झाडे ग्रामपंचायतीने लावली. उर्वरितपैकी काही झाडे गावात वाटण्यात आली, तर काही सुकून गेल्याने ती फेकण्यात आली. नेमकी किती झाडे सुकली, हे सांगता येणार नाही.- मिनाक्षी कनाके, सरपंच, शिरपूर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच