शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:34 IST

पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देशिरपूर ग्रामपंचायतीचा प्रताप : रोप लागवडीचा उडविला बोजवारा, शासनाच्या उद्देशाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. यापैकी एक हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी कनाके यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ५०० पेक्षा अधिक झाडांची लागवड झाली नसल्याची बाब एका जाणकाराने ‘लोकमत’ला सांगितली. एक हजार रोपांची लागवड केल्यानंतर उर्वरित २०० पैकी १०० झाडे गावात वाटण्यात आली. त्यातील उरलेली १०० झाडे पाण्याअभावी सुकून गेल्याने ती फेकण्यात आली, असे सरपंचांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र पुन्हा एकदा त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क करून वृक्ष लागवडीबाबत वेगवेगळ्या आकड्यांचा खेळ सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ३०० पेक्षा अधिक रोपे ग्रामपंचायतीच्या एका खोलीत ठेवण्यात आली होती. या रोपांची ग्रामपंचायतीने अखेरपर्यंत लागवडच केली नाही. त्यामुळे पाण्याअभावी ती सुकून गेली.६ नोव्हेंबरला शिरपूर येथे पाणी विषयात शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, गटविकास अधिकारी राजेश गायनर तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे वृक्ष लागवडीबाबतचे पितळ उघडे पडेल, या भीतीने ग्रामपंचायतीने ६ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे ही रोपे एका ट्रॅक्टरमध्ये भरून नेऊन ती शिरपूरलगतच्या तलावात फेकून दिली. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.गेल्या काही वर्षात निसर्गाचा असमतोल निर्माण झाला. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाला सामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होताच वृक्ष लागवडीची मोठी मोहिम हाती घेण्यात आली. त्यानुसार शिरपूर ग्रामपंचायतीलाही एक हजार २०० वृक्षांची लागवड करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु मुळातच या विषयात अनास्था असलेल्या ग्रामपंचायतीने या योजनेचा पार बोजवारा उडवून टाकला. ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या रोपांपैकी किती झाडे जगलीत, असा प्रश्न विचारल असता, त्याचे उत्तरही सरपंच मिनाक्षी कनाके देऊ शकल्या नाहीत. माहिती घेऊन सांगते, असे ‘टीपीकल’ उत्तर त्यांनी ‘लोकमत’ला देऊन वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी एक हजार झाडे ग्रामपंचायतीने लावली. उर्वरितपैकी काही झाडे गावात वाटण्यात आली, तर काही सुकून गेल्याने ती फेकण्यात आली. नेमकी किती झाडे सुकली, हे सांगता येणार नाही.- मिनाक्षी कनाके, सरपंच, शिरपूर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच