शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:34 IST

पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देशिरपूर ग्रामपंचायतीचा प्रताप : रोप लागवडीचा उडविला बोजवारा, शासनाच्या उद्देशाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. यापैकी एक हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी कनाके यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ५०० पेक्षा अधिक झाडांची लागवड झाली नसल्याची बाब एका जाणकाराने ‘लोकमत’ला सांगितली. एक हजार रोपांची लागवड केल्यानंतर उर्वरित २०० पैकी १०० झाडे गावात वाटण्यात आली. त्यातील उरलेली १०० झाडे पाण्याअभावी सुकून गेल्याने ती फेकण्यात आली, असे सरपंचांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र पुन्हा एकदा त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क करून वृक्ष लागवडीबाबत वेगवेगळ्या आकड्यांचा खेळ सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ३०० पेक्षा अधिक रोपे ग्रामपंचायतीच्या एका खोलीत ठेवण्यात आली होती. या रोपांची ग्रामपंचायतीने अखेरपर्यंत लागवडच केली नाही. त्यामुळे पाण्याअभावी ती सुकून गेली.६ नोव्हेंबरला शिरपूर येथे पाणी विषयात शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, गटविकास अधिकारी राजेश गायनर तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे वृक्ष लागवडीबाबतचे पितळ उघडे पडेल, या भीतीने ग्रामपंचायतीने ६ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे ही रोपे एका ट्रॅक्टरमध्ये भरून नेऊन ती शिरपूरलगतच्या तलावात फेकून दिली. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.गेल्या काही वर्षात निसर्गाचा असमतोल निर्माण झाला. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाला सामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होताच वृक्ष लागवडीची मोठी मोहिम हाती घेण्यात आली. त्यानुसार शिरपूर ग्रामपंचायतीलाही एक हजार २०० वृक्षांची लागवड करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु मुळातच या विषयात अनास्था असलेल्या ग्रामपंचायतीने या योजनेचा पार बोजवारा उडवून टाकला. ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या रोपांपैकी किती झाडे जगलीत, असा प्रश्न विचारल असता, त्याचे उत्तरही सरपंच मिनाक्षी कनाके देऊ शकल्या नाहीत. माहिती घेऊन सांगते, असे ‘टीपीकल’ उत्तर त्यांनी ‘लोकमत’ला देऊन वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी एक हजार झाडे ग्रामपंचायतीने लावली. उर्वरितपैकी काही झाडे गावात वाटण्यात आली, तर काही सुकून गेल्याने ती फेकण्यात आली. नेमकी किती झाडे सुकली, हे सांगता येणार नाही.- मिनाक्षी कनाके, सरपंच, शिरपूर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच