शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

किती शाळा बंद केल्या आणि का केल्या?; शिक्षण सचिवांनी मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:36 IST

गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा सर्वत्र तापलेला आहे. दोन वर्षानंतर आता पहिल्यांदाच शिक्षण सचिव अशा शाळांचा आढावा घेणार आहेत.

ठळक मुद्दे शिक्षणाधिकाऱ्यांना टाळून कनिष्ठांकडून घेणार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा सर्वत्र तापलेला आहे. दोन वर्षानंतर आता पहिल्यांदाच शिक्षण सचिव अशा शाळांचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकाऱ्यांना टाळून या आढाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. किती शाळा बंद झाल्या, त्या बंद करण्याची कारणे काय, अशी माहिती घेऊन शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना थेट मुंबईत बोलावण्यात आले आहे.शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ११ जुलै रोजी ही आढावा बैठक बोलावली आहे. केंद्राच्या सूचनेनुसार यदा राज्यातील प्रत्येक शाळेची माहिती यू-डायस प्लस पोर्टलमध्ये भरण्याचे आदेश होते. याच कामाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. मात्र गेल्या वर्षीच्या यू-डायस आकडेवारीत आणि यंदा यू-डायस प्लसमध्ये भरलेल्या आकडेवारीत शाळांच्या संख्येत तफावत आहे. यंदा अनेक जिल्हा परिषदांनी आपल्या अखत्यारीतील काही शाळा बंद केल्या. त्यामुळे जिल्ह्यातील किती शाळा बंद करण्यात आल्या, त्या शाळा बंद करण्याची कारणे काय आहेत, आदींची माहिती शिक्षण सचिव जाणून घेणार आहेत. मात्र ही कारणे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगायची नसून समग्र शिक्षा अभियानात काम करणाऱ्या संगणक प्रोग्रामरने सांगायची आहेत. यूडायस प्लस पोर्टलमध्ये शाळांची माहिती भरण्याची जबाबदारी प्रामुख्याने संगणक प्रोग्रामरनेच पार पाडली आहे. त्यामुळे शाळा, तेथील कर्मचारी यांच्याशी थेट संबंध असलेल्या या कर्मचाऱ्यांना शाळा बंद होण्याची खरी कारणेही ठाऊक आहेत. या कारणांवर ११ जुलैच्या बैठकीत चर्चा होणार आहे.पहिल्यांदाच वापरला ‘बंद’ शब्दग्रामीण भागातील शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयावर सातत्याने टीका होत आहे. मात्र या निर्णयाचे तत्कालीन शिक्षण मंत्र्यांपासून तर विद्यमान शिक्षण मंत्र्यांपर्यंत ठाम समर्थन करण्यात आले. आम्ही शाळा बंद करीत नसून समायोजित करीत आहोत, असाच दावा शासकीय यंत्रणेकडून सातत्याने होत राहिला. मात्र शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी आढावा बैठकीसाठी शुक्रवारी दिलेल्या लेखी आदेशात ‘समायोजित’ हा शब्द न वापरता ‘शाळा बंद’ असा स्पष्ट शब्दोल्लेख केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र