शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्डरच नाही तर गोदामात लिंकिंगचे खत आले कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:57 IST

खरीप हंगामात रासायनिक खताची कंपन्यांकडून लिंकिंग केली जात आहे. कंपन्यांकडून कृषी केंद्रांना १५ टनामागे १५ ते ४० हजार रुपये किंमतीचे दुय्यम दर्जाचे खत बळजबरीने दिले जात आहे.

ठळक मुद्देकृषी गुणवत्ता नियंत्रण विभागाला आव्हानगोदामातील साठा तपासल्यास मिळणार पुरावे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लिंकिंगचे अर्थात दुय्यम दर्जाचे खत बहुतांश कृषी केंद्रांमध्ये पोहोचले असतानाही कृषी खात्याचे अधिकारी याबाबत अनभिज्ञता दर्शवित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. कृषी केंद्राने या दुय्यम खताची ऑर्डरच कंपनीला दिली नसेल तर हे खत त्यांच्या गोदामात आले कसे? याची चौकशी झाल्यास खताच्या लिंकिंगचे मोठे पुरावे कृषी अधिकाऱ्यांच्या हाती लागू शकतात.खरीप हंगामात रासायनिक खताची कंपन्यांकडून लिंकिंग केली जात आहे. कंपन्यांकडून कृषी केंद्रांना १५ टनामागे १५ ते ४० हजार रुपये किंमतीचे दुय्यम दर्जाचे खत बळजबरीने दिले जात आहे. तर कृषी केंद्रांकडून हीच लिंक पुढे शेतकऱ्यांकडे वापरली जात आहे. गरज नसताना दुय्यम दर्जाचे खत शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार सुरू आहे. या खताला ‘वॉटर सोलीबल’ अर्थात पाण्यात पूर्णत: विरघळणारे म्हणूनही ओळखले जाते. बहुतांश शेतकरी हे खत टाळतात. परंतु यावर्षी खताच्या टंचाईचा फायदा उचलत कंपन्यांनी रासायनिक खताआड दुय्यम दर्जाच्या खताचीही सक्तीने विक्री सुरू केली आहे.यवतमाळ जिल्ह्यात वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वत्र हे दुय्यम दर्जाचे खत सक्तीने पोहोचले आहे. अन्य जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. असे असताना अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक याबाबत अनभिज्ञता दर्शवित असल्याने खुद्द कृषी विभागाची यंत्रणा आणि कृषी केंद्र संचालकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लिंकिंगला ब्रेक लावणे कठीण नाहीकृषी विभागाला खरोखरच खताच्या लिंकिंगला ब्रेक लावायचा असेल तर ते काम कठीण नाही. प्रमुख कृषी साहित्य विक्रेत्यांची गोदामे तपासल्यास तेथे दुय्यम दर्जाच्या लिंकिंगमधील खताचा साठा आढळून येतो. कृषी केंद्र संचालकाने या खताची ऑर्डर कंपनीला दिली होती का हे तपासल्यास सर्व काही उघड होईल. ऑर्डर नसताना कंपन्यांनी दुय्यम दर्जाचे खत पाठविल्याने लिंकिंग व बळजबरी सिद्ध होण्यास वेळ लागणार नाही. मात्र त्यासाठी कृषी प्रशासनाकडून प्रामाणिक प्रयत्नांची तेवढी गरज आहे.

‘क्वॉलिटी कंट्रोल’ची मोहीम आहे कुठे ?बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेवर नजर ठेवण्याची जबाबदारी अमरावतीच्या कृषी सहसंचालक कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण (क्वॉलिटी कंट्रोल) विभागावर आहे. मात्र या विभागाची खरोखरच उपयोगिता काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे. या विभागातील तंत्रज्ञ अधिकारी जुन्या सरकारमध्ये खास वजनदार ‘मोहीम’ राबवून आल्याचे सांगितले जाते. या विभागाचे दुर्लक्षही खताच्या लिंकिंगसाठी तेवढेच कारणीभूत ठरते आहे.खत उत्पादक कंपन्यांशी संपर्क केला. सल्फरचा पुरवठा केल्याचे त्यांनी सांगितले. सल्फर हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयोगी असून कृषी आयुक्तालयाकडून त्याला रितसर परवानगी दिली गेली आहे.- सुभाष नागरेविभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.

टॅग्स :agricultureशेती