शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेस पदाधिकारी नेमके मोर्चा, आंदोलनावेळीच गायब कसे होतात? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले

By विशाल सोनटक्के | Updated: March 29, 2023 10:29 IST

कार्यक्रमावेळी कार्यकर्ते आणण्याचे आता पदाधिकाऱ्यांना टार्गेट

यवतमाळ : प्रदेश कॉंग्रेसच्या माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न तसेच समस्यांसह राजकीय मुद्द्यांवर मोर्चे, उपोषण, सत्याग्रहासह आंदोलनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले जातात. अशा कार्यक्रमावेळी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणे अपेक्षित असताना खुद्द पदाधिकारीच गायब राहत आहेत. या प्रकाराची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर दखल घेतली आहे. वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देताना, या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमावेळी कार्यकर्ते आणण्याचे टार्गेटही आता पटोले यांनी दिले आहे.

कर्नाटकातील कोलार येथील सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेत सगळेच मोदी चोर कसे? असा सवाल केला होता. या वक्तव्याबाबत गुजरातमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर अवघ्या २४ तासात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दचे नोटिफिकेशनही तत्परतेने निघाले. सर्वोच्च नेत्यावर अशी कारवाई केल्याने एक प्रकारे भाजपने कॉंग्रेसला फुलटॉस टाकला होता.

या कारवाईनंतर कॉंग्रेस कार्यकर्ते गावखेड्यापासून देशपातळीवर रान उठवतील, असेच अनेकांना वाटत होते. खरे तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचीही संधी याद्वारे मिळाली आहे. मात्र अनेक ठिकाणी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे आंदोलन पार पडले. यानिमित्ताने पक्षीय कार्यक्रमावेळी कॉंग्रेस पदाधिकारी दाखवीत असलेली उदासीनता प्रकर्षाने दिसून आली. याबरोबरच इतर वेळच्या मोर्चे, उपोषण, आंदोलनावेळीही अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी झूम मीटिंगद्वारे या पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार तिचे उचित पालन होेणे अपेक्षित आहे. मात्र प्रदेश जिल्हा व ब्लॉक स्तरावरील अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेवूनही पक्षाचे काम करीत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देता येईल. वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठवावी, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी राज्यभरातील कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.

प्रदेशसाठी ४०, तर जिल्हा पदाधिकाऱ्याला २० कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट

या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंगळवार, २८ मार्च रोजी पत्रच पाठविले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या पुढे होणाऱ्या प्रत्येक आंदोलन, मोर्चा तसेच कार्यक्रमात प्रदेश पदाधिकाऱ्याने किमान ४० कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकाऱ्याने २०, तर ब्लॉकस्तरीय पदाधिकाऱ्याने १० कार्यकर्ते सोबत आणावेत. जे पदाधिकारी दिलेल्या उद्दिष्टानुसार कार्यकर्ते आणणार नाहीत, अशांची माहिती प्रदेश कार्यालयास तातडीने कळविण्याच्या सूचनाही या पत्राद्वारे प्रदेश कॉंग्रेसने पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले