शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेस पदाधिकारी नेमके मोर्चा, आंदोलनावेळीच गायब कसे होतात? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले

By विशाल सोनटक्के | Updated: March 29, 2023 10:29 IST

कार्यक्रमावेळी कार्यकर्ते आणण्याचे आता पदाधिकाऱ्यांना टार्गेट

यवतमाळ : प्रदेश कॉंग्रेसच्या माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न तसेच समस्यांसह राजकीय मुद्द्यांवर मोर्चे, उपोषण, सत्याग्रहासह आंदोलनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले जातात. अशा कार्यक्रमावेळी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणे अपेक्षित असताना खुद्द पदाधिकारीच गायब राहत आहेत. या प्रकाराची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर दखल घेतली आहे. वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देताना, या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमावेळी कार्यकर्ते आणण्याचे टार्गेटही आता पटोले यांनी दिले आहे.

कर्नाटकातील कोलार येथील सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेत सगळेच मोदी चोर कसे? असा सवाल केला होता. या वक्तव्याबाबत गुजरातमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर अवघ्या २४ तासात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दचे नोटिफिकेशनही तत्परतेने निघाले. सर्वोच्च नेत्यावर अशी कारवाई केल्याने एक प्रकारे भाजपने कॉंग्रेसला फुलटॉस टाकला होता.

या कारवाईनंतर कॉंग्रेस कार्यकर्ते गावखेड्यापासून देशपातळीवर रान उठवतील, असेच अनेकांना वाटत होते. खरे तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचीही संधी याद्वारे मिळाली आहे. मात्र अनेक ठिकाणी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे आंदोलन पार पडले. यानिमित्ताने पक्षीय कार्यक्रमावेळी कॉंग्रेस पदाधिकारी दाखवीत असलेली उदासीनता प्रकर्षाने दिसून आली. याबरोबरच इतर वेळच्या मोर्चे, उपोषण, आंदोलनावेळीही अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी झूम मीटिंगद्वारे या पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार तिचे उचित पालन होेणे अपेक्षित आहे. मात्र प्रदेश जिल्हा व ब्लॉक स्तरावरील अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेवूनही पक्षाचे काम करीत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देता येईल. वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठवावी, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी राज्यभरातील कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.

प्रदेशसाठी ४०, तर जिल्हा पदाधिकाऱ्याला २० कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट

या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंगळवार, २८ मार्च रोजी पत्रच पाठविले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या पुढे होणाऱ्या प्रत्येक आंदोलन, मोर्चा तसेच कार्यक्रमात प्रदेश पदाधिकाऱ्याने किमान ४० कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकाऱ्याने २०, तर ब्लॉकस्तरीय पदाधिकाऱ्याने १० कार्यकर्ते सोबत आणावेत. जे पदाधिकारी दिलेल्या उद्दिष्टानुसार कार्यकर्ते आणणार नाहीत, अशांची माहिती प्रदेश कार्यालयास तातडीने कळविण्याच्या सूचनाही या पत्राद्वारे प्रदेश कॉंग्रेसने पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले