शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कॉंग्रेस पदाधिकारी नेमके मोर्चा, आंदोलनावेळीच गायब कसे होतात? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले

By विशाल सोनटक्के | Updated: March 29, 2023 10:29 IST

कार्यक्रमावेळी कार्यकर्ते आणण्याचे आता पदाधिकाऱ्यांना टार्गेट

यवतमाळ : प्रदेश कॉंग्रेसच्या माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न तसेच समस्यांसह राजकीय मुद्द्यांवर मोर्चे, उपोषण, सत्याग्रहासह आंदोलनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले जातात. अशा कार्यक्रमावेळी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणे अपेक्षित असताना खुद्द पदाधिकारीच गायब राहत आहेत. या प्रकाराची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर दखल घेतली आहे. वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देताना, या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमावेळी कार्यकर्ते आणण्याचे टार्गेटही आता पटोले यांनी दिले आहे.

कर्नाटकातील कोलार येथील सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेत सगळेच मोदी चोर कसे? असा सवाल केला होता. या वक्तव्याबाबत गुजरातमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर अवघ्या २४ तासात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दचे नोटिफिकेशनही तत्परतेने निघाले. सर्वोच्च नेत्यावर अशी कारवाई केल्याने एक प्रकारे भाजपने कॉंग्रेसला फुलटॉस टाकला होता.

या कारवाईनंतर कॉंग्रेस कार्यकर्ते गावखेड्यापासून देशपातळीवर रान उठवतील, असेच अनेकांना वाटत होते. खरे तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचीही संधी याद्वारे मिळाली आहे. मात्र अनेक ठिकाणी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे आंदोलन पार पडले. यानिमित्ताने पक्षीय कार्यक्रमावेळी कॉंग्रेस पदाधिकारी दाखवीत असलेली उदासीनता प्रकर्षाने दिसून आली. याबरोबरच इतर वेळच्या मोर्चे, उपोषण, आंदोलनावेळीही अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी झूम मीटिंगद्वारे या पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार तिचे उचित पालन होेणे अपेक्षित आहे. मात्र प्रदेश जिल्हा व ब्लॉक स्तरावरील अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेवूनही पक्षाचे काम करीत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देता येईल. वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठवावी, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी राज्यभरातील कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.

प्रदेशसाठी ४०, तर जिल्हा पदाधिकाऱ्याला २० कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट

या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंगळवार, २८ मार्च रोजी पत्रच पाठविले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या पुढे होणाऱ्या प्रत्येक आंदोलन, मोर्चा तसेच कार्यक्रमात प्रदेश पदाधिकाऱ्याने किमान ४० कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकाऱ्याने २०, तर ब्लॉकस्तरीय पदाधिकाऱ्याने १० कार्यकर्ते सोबत आणावेत. जे पदाधिकारी दिलेल्या उद्दिष्टानुसार कार्यकर्ते आणणार नाहीत, अशांची माहिती प्रदेश कार्यालयास तातडीने कळविण्याच्या सूचनाही या पत्राद्वारे प्रदेश कॉंग्रेसने पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले