शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचे ‘जनधन’ येते आणि जाते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:16 IST

पंतप्रधानांनी राबविलेली जनधन बँक खात्यांची संकल्पना आता पंतप्रधानांच्या नावाने सुरू असलेल्या घरकुल योजनेतच अडसर ठरू लागली आहे.

ठळक मुद्देविड्रॉलचे वांदे : नऊ हजार लाभार्थी पैशाच्या प्रतीक्षेत

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधानांनी राबविलेली जनधन बँक खात्यांची संकल्पना आता पंतप्रधानांच्या नावाने सुरू असलेल्या घरकुल योजनेतच अडसर ठरू लागली आहे. जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या जनधन खात्यात ६० हजार रुपयांचा निधी जमा होतोय. पण या खात्यातून ५० हजारांपेक्षा जास्त विड्रॉल करता येत नसल्याने हा निधी योजनेच्या राज्यस्तरीय बँक खात्यात परत जातोय.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत २०१६-१७ मध्ये ९ हजार ६६ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे. त्यांना पहिल्या टप्प्यातील ३० हजार रुपये मिळाले. मात्र बांधकाम अर्धवट झालेले असताना दुसºया टप्प्यातील ६० हजारांचा निधी खात्यात येऊनही लाभार्थ्यांना मिळेनासा झाला. कारण बहुतांश लाभार्थ्यांनी या योजनेत जनधन खात्याचाच क्रमांक दिला आहे. या खात्यात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास ती विड्रॉल करता येत नाही. परंतु, योजनेच्या सॉफ्टवेअरमध्ये पैसे अदा झाल्याबाबत ‘क्रेडिट कन्फर्मेशन’ असा संदेश येतो. प्रत्यक्षात हा निधी लाभार्थ्यांना न मिळता योजनेच्या केंद्रीय खात्यात जमा होत आहे. अशी अनेक प्रकरणे निस्तरता निस्तरता संबंधित गटविकास अधिकाºयांच्या नाकीनऊ येत आहे.पूर्वीप्रमाणे योजनेचा निधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून न येता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जात आहे. त्यामुळे जनधनचा घोळ निस्तरणे जिल्हास्तराच्या आवाक्याबाहेर गेले. प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच रमाई आवास योजना आणि शबरी आदिवासी घरकुल योजनेतही लाभार्थ्यांनी जनधनचीच खाती दिलेली असून निधी येऊनही विड्रॉलच्या अडचणी निर्माण होत आहेत.घरकुलांचे ‘टार्गेट’ घटलेजिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत २०१७-१८ वर्षाकरिता ४ हजार ६६९ लाभार्थ्यांचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. रमाई आवास योजनेतून १ हजार ८३२ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. तर शबरी आदिवासी घरकुल योजनेत ५७९ लाभार्थी निवडण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विविध योजनेतून १२ हजार घरकुलांना मंजुरी मिळालेली असताना यंदा टार्गेट घटवून केवळ ७ हजार ८० घरकुले होण्याची शक्यता आहे. शिवाय पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून ६५ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा घेण्याकरिता ५० हजारांचा निधी मिळणार आहे.अखेर निधीचे टप्पे वाढघरकुल योजनेचे १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान ३ टप्प्यात देण्यात येते. पहिला आणि तिसरा टप्पा ३० हजारांचा असला तरी दुसरा टप्पा ६० हजारांचा असल्याने जनधनमधून तो विड्रॉल होत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने आता निधी वितरणाचे पाच टप्पे पाडून दिले आहेत. पहिले तीन टप्पे प्रत्येकी ३० हजारांचे असतील, चौथा टप्पा २० हजारांचा तर पाचवा टप्पा १० हजार रुपयांचा असेल. या पाच टप्प्यात जमा झालेला निधी जनधनच्या खात्यातून लाभार्थ्यांना सहज काढता येणार आहे.