शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

घरकुलाचे ‘जनधन’ येते आणि जाते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:16 IST

पंतप्रधानांनी राबविलेली जनधन बँक खात्यांची संकल्पना आता पंतप्रधानांच्या नावाने सुरू असलेल्या घरकुल योजनेतच अडसर ठरू लागली आहे.

ठळक मुद्देविड्रॉलचे वांदे : नऊ हजार लाभार्थी पैशाच्या प्रतीक्षेत

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधानांनी राबविलेली जनधन बँक खात्यांची संकल्पना आता पंतप्रधानांच्या नावाने सुरू असलेल्या घरकुल योजनेतच अडसर ठरू लागली आहे. जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या जनधन खात्यात ६० हजार रुपयांचा निधी जमा होतोय. पण या खात्यातून ५० हजारांपेक्षा जास्त विड्रॉल करता येत नसल्याने हा निधी योजनेच्या राज्यस्तरीय बँक खात्यात परत जातोय.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत २०१६-१७ मध्ये ९ हजार ६६ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे. त्यांना पहिल्या टप्प्यातील ३० हजार रुपये मिळाले. मात्र बांधकाम अर्धवट झालेले असताना दुसºया टप्प्यातील ६० हजारांचा निधी खात्यात येऊनही लाभार्थ्यांना मिळेनासा झाला. कारण बहुतांश लाभार्थ्यांनी या योजनेत जनधन खात्याचाच क्रमांक दिला आहे. या खात्यात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास ती विड्रॉल करता येत नाही. परंतु, योजनेच्या सॉफ्टवेअरमध्ये पैसे अदा झाल्याबाबत ‘क्रेडिट कन्फर्मेशन’ असा संदेश येतो. प्रत्यक्षात हा निधी लाभार्थ्यांना न मिळता योजनेच्या केंद्रीय खात्यात जमा होत आहे. अशी अनेक प्रकरणे निस्तरता निस्तरता संबंधित गटविकास अधिकाºयांच्या नाकीनऊ येत आहे.पूर्वीप्रमाणे योजनेचा निधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून न येता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जात आहे. त्यामुळे जनधनचा घोळ निस्तरणे जिल्हास्तराच्या आवाक्याबाहेर गेले. प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच रमाई आवास योजना आणि शबरी आदिवासी घरकुल योजनेतही लाभार्थ्यांनी जनधनचीच खाती दिलेली असून निधी येऊनही विड्रॉलच्या अडचणी निर्माण होत आहेत.घरकुलांचे ‘टार्गेट’ घटलेजिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत २०१७-१८ वर्षाकरिता ४ हजार ६६९ लाभार्थ्यांचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. रमाई आवास योजनेतून १ हजार ८३२ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. तर शबरी आदिवासी घरकुल योजनेत ५७९ लाभार्थी निवडण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विविध योजनेतून १२ हजार घरकुलांना मंजुरी मिळालेली असताना यंदा टार्गेट घटवून केवळ ७ हजार ८० घरकुले होण्याची शक्यता आहे. शिवाय पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून ६५ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा घेण्याकरिता ५० हजारांचा निधी मिळणार आहे.अखेर निधीचे टप्पे वाढघरकुल योजनेचे १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान ३ टप्प्यात देण्यात येते. पहिला आणि तिसरा टप्पा ३० हजारांचा असला तरी दुसरा टप्पा ६० हजारांचा असल्याने जनधनमधून तो विड्रॉल होत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने आता निधी वितरणाचे पाच टप्पे पाडून दिले आहेत. पहिले तीन टप्पे प्रत्येकी ३० हजारांचे असतील, चौथा टप्पा २० हजारांचा तर पाचवा टप्पा १० हजार रुपयांचा असेल. या पाच टप्प्यात जमा झालेला निधी जनधनच्या खात्यातून लाभार्थ्यांना सहज काढता येणार आहे.