शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

नऊ महिन्यांपूर्वीच्या हनी ट्रॅप कारवाईची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

संदेश मानकर (रा. जामनकर नगर) या युवकाने दिल्लीतील डॉक्टरशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. डाॅक्टरला भावनिक आधार देत वेळोवेळी मार्गदर्शन केले. यातून दोघांचे नाते घट्ट झाले. संदेशने बहिणीची अडचण सांगत डॉक्टरकडून एक कोटी ७२ लाख रुपये घेतले. याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाली. त्यावरून सायबर सेलने गुन्ह्याचा छडा लावत आरोपी संदेश मानकरला अटक केली. त्याच्या घरून एक कोटी ७२ लाख जप्त केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीतील डॉक्टरला सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युवकाने हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले होते. ही कारवाई ४ नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आली. यात डॉक्टरला एक कोटी ७२ लाख रुपये पोलिसांनी परत केले. या कारवाईची झाडाझडती अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गुरुवारी घेतली. सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. संदेश मानकर (रा. जामनकर नगर) या युवकाने दिल्लीतील डॉक्टरशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. डाॅक्टरला भावनिक आधार देत वेळोवेळी मार्गदर्शन केले. यातून दोघांचे नाते घट्ट झाले. संदेशने बहिणीची अडचण सांगत डॉक्टरकडून एक कोटी ७२ लाख रुपये घेतले. याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाली. त्यावरून सायबर सेलने गुन्ह्याचा छडा लावत आरोपी संदेश मानकरला अटक केली. त्याच्या घरून एक कोटी ७२ लाख जप्त केले. या गुन्ह्याचा तपास यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केला. जामिनावर बाहेर आल्यानंतर संदेश मानकर याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलीस कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला. याची चौकशी करण्यासाठी उपपोलीस महानिरीक्षक गुरुवारी यवतमाळात दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्यातील तपासाशी निगडित असलेल्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाचारण केले. अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे, सायबर सेलचे प्रभारी अमोल पुरी यांच्याशी गुन्ह्याबाबत विचारपूस केली. सर्वांचेच जबाब नोंदवून घेतले. नऊ महिन्यांपूर्वीच्या कारवाईची चौकशी लागल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या चौकशीतून काय तथ्य बाहेर येते, याकडे लक्ष लागले आहे. नुकतीच औरंगाबाद आयजींनी भूखंडाच्या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. 

मदत पोहोचण्यास विलंबाबाबत नाराजी - जिल्ह्यातील क्विक रिस्पॉन्स सिस्टीम व्यवस्थित काम करीत नसल्याबाबत उपमहानिरीक्षकांनी नाराजी व्यक्त केली. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पोलीस मदत पोहोचण्यास वेळ लागत आहे. यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश उपमहानिरीक्षकांनी दिले. याशिवाय गुन्ह्यांचा तपास व इतर प्रकरणांच्या संदर्भात उपमहानिरीक्षकांकडून सूचना करण्यात आल्या. 

काही तपासाबाबत तक्रारी होत्या. याचा आढावा घेण्यात आला. शिवाय क्विक रिस्पॉन्स प्रणालीमध्ये जिल्हा माघारला आहे. यात सुधारणा करण्याचेही निर्देश देण्यात आले. - चंद्रकिशोर मीनापोलीस उपमहानिरीक्षक

 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅप