शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

होळीला तांड्या-तांड्यात अवतरते गोकूळ

By admin | Updated: March 6, 2015 02:13 IST

होळी आणि धूळवड या सणांना प्रत्येक समाजात वेगवेगळ्या परंपरा आहेत. या परंपरांना आधुनिक ‘टच’ मिळवून आनंदाचे सण काहीसे विकृत होऊ लागले आहेत.

सुनील हिरास दिग्रसहोळी आणि धूळवड या सणांना प्रत्येक समाजात वेगवेगळ्या परंपरा आहेत. या परंपरांना आधुनिक ‘टच’ मिळवून आनंदाचे सण काहीसे विकृत होऊ लागले आहेत. मात्र काही समाजांनी अजूनही सणांची पुरातन परंपरा जपली आहे. बंजारा समाजाने जपलेली होळीची परंपरा त्याचेच एक उदाहरण होय. होळीनंतर ‘लेंगी’ महोत्सव एक सांस्कृतिक पर्वणीच असते. होळीच्या आनंदाची पर्वणी जिल्ह्यातील प्रत्येक तांड्यात व गावातही पाहायला मिळते.मानवी नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या प्रेम अन् आनंदाची उधळण बंजारा समाज होळीच्या निमित्ताने करीत असतो. म्हणूनच या सणाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व व अस्सल पण अजूनही टिकून राहिले आहे. बंजाराबहुल असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याची ही आगळीवेगळी सांस्कृतिक ओळखच म्हणावी लागेल. प्रत्येक गावच्या तांड्यावर होळीचा आनंद अन् उत्साह भरभरून वाहत आहे. होळी हा लोक संस्कृतीचा उत्सव म्हणूनच हा समाज साजरा करीत असतो. तांडा किंवा गाव म्हणजे रंगभूमीच असते आणि या रंगभूमीवर लोककलेचा सुंदर अविष्कार होळीच्या निमित्ताने पाहायला मिळतो. होळीच्या निमित्ताने तांड्यातांड्यात डफडीचा आवाज घुमू लागतो. या डफडीच्या तालावर तांड्यातला प्रत्येक लहान मोठा फेर धरती अन् सुरू होते होळीच्या गाण्यांची समृद्ध परंपरा. होळीची गाणी हे या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य. बाया-माणसे सारेच ही गाणी मोठ्या आनंदाने सुरेल व एका आवाजात गातात. विशेषत: महिला अशी गाणी गाताना गाण्यांशी एकरूप होवून तन्मयतेने नाचू लागतात. होळीच्या या लोक संस्कृतीच्या प्रवाहात रितीरिवाज तर आहेतच शिवाय त्यात सण, उत्सव, व्रत, खेळ, मनोरंजन, विनोद यांचा अविट मेळ घातला आहे.रातेन काई वात किती ऐ गोरीहाटेन जाऊ तारे वास्तू गोरी ऐकत गोतो मारो लाढो देवरियामाहूरेन गोतो मारी सीता भोजाईया समाजातील गाणी मानव जीवनाच्या जन्मापासून थेट मृत्यूपर्यंत रचली आहेत. ही गीते केवळ गाणी आणि मनोरंजनापुरती मर्यादित नसून त्यात जीवनाचा गहन अर्थही दडला आहे. ‘लेंगी’ महोत्सव हे याचे अधिक चांगले उदाहरण होईल. अमर वेगेर एक चांदा रे सूर्यानव लाख तारा ओरे साथ चलेसोबतेम चले धरती तो परतांड्यातील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येकाने होळीचा आनंद घ्यावा याची काळजी तांड्यावरचे नायक, कारभारी घेत असतात. होळीच्या उत्सव पाच दिवसांचा असला तरी त्यातील पाल, फाग आणि गेद महत्त्वाचे मानले जातात. बंजारा महिला-पुरुष आपल्या पारंपरिक वेशभूषेत लेंगी गीत म्हणतात. गोलाकार वर्तुळाकार नाचत हा उत्सव बेभान होवून आनंदाला वाट करून देतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी फाग मागण्याची परंपरा आहे.