शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाला गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:08 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाला आर्णीनजिक आत्ताच तडे गेले. वाहतुकीपूर्वीच रस्त्याला तडे गेल्याने बांधकाम कंपनीची विश्वासार्हताच धोक्यात सापडली आहे.

ठळक मुद्देनागपूर-तुळजापूर महामार्ग : वाहतुकीपूर्वीच उघड झाले वास्तव

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाला आर्णीनजिक आत्ताच तडे गेले. वाहतुकीपूर्वीच रस्त्याला तडे गेल्याने बांधकाम कंपनीची विश्वासार्हताच धोक्यात सापडली आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर महागामार्गाचे चौपदरीकरणाने काम जोरात सुरू आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याचे लोकार्पण व्हावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. लोकापर्ण होताच अधिकृतपणे या रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळेच देशातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या रस्ता बांधकाम कंपनीला कोट्यवधींचे कंत्राट देण्यात आले आहे. कंपनीने युद्ध पातळीवर बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.कंपनीचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी रात्रंदिन मजूर राबत आहे. आर्णी तालुक्यातील तरोडा ते कोसदणीपर्यंतच्या ४० किलोमीटरचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या कामावर हजारो मजुरांसह अद्ययावत यंत्रसामुग्री आहे. मात्र काही ठिकाणी या महागार्माला तडे गेल्याचे दिसत आहे. तालुक्यात सुकळी तसेच लोणबेहळ ते कोसदणी भागातील जंगलातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अद्याप या रस्त्यावर पाहिजे तशी वाहतूक सुरू झाली नाही. तरीही रस्त्याला तडे गेले आहे. त्यामुळे बांधकाम कंपनीच्या कामावरच शंका उपस्थित केली जात आहे.रस्त्याचे आयुष्य १00 वर्षेया महामार्गाचे आयुष्य १00 वर्षांचे असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्त्याला तडे जात आहे. त्यामुळे पुढील १00 वर्षे हा रस्ता टिकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे रस्ता बांधकाम कंपनीच्या विश्वासार्हतेला तडा बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :highwayमहामार्गNational Highwayराष्ट्रीय महामार्ग