शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महामार्गाला गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:08 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाला आर्णीनजिक आत्ताच तडे गेले. वाहतुकीपूर्वीच रस्त्याला तडे गेल्याने बांधकाम कंपनीची विश्वासार्हताच धोक्यात सापडली आहे.

ठळक मुद्देनागपूर-तुळजापूर महामार्ग : वाहतुकीपूर्वीच उघड झाले वास्तव

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाला आर्णीनजिक आत्ताच तडे गेले. वाहतुकीपूर्वीच रस्त्याला तडे गेल्याने बांधकाम कंपनीची विश्वासार्हताच धोक्यात सापडली आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर महागामार्गाचे चौपदरीकरणाने काम जोरात सुरू आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याचे लोकार्पण व्हावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. लोकापर्ण होताच अधिकृतपणे या रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळेच देशातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या रस्ता बांधकाम कंपनीला कोट्यवधींचे कंत्राट देण्यात आले आहे. कंपनीने युद्ध पातळीवर बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.कंपनीचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी रात्रंदिन मजूर राबत आहे. आर्णी तालुक्यातील तरोडा ते कोसदणीपर्यंतच्या ४० किलोमीटरचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या कामावर हजारो मजुरांसह अद्ययावत यंत्रसामुग्री आहे. मात्र काही ठिकाणी या महागार्माला तडे गेल्याचे दिसत आहे. तालुक्यात सुकळी तसेच लोणबेहळ ते कोसदणी भागातील जंगलातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अद्याप या रस्त्यावर पाहिजे तशी वाहतूक सुरू झाली नाही. तरीही रस्त्याला तडे गेले आहे. त्यामुळे बांधकाम कंपनीच्या कामावरच शंका उपस्थित केली जात आहे.रस्त्याचे आयुष्य १00 वर्षेया महामार्गाचे आयुष्य १00 वर्षांचे असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्त्याला तडे जात आहे. त्यामुळे पुढील १00 वर्षे हा रस्ता टिकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे रस्ता बांधकाम कंपनीच्या विश्वासार्हतेला तडा बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :highwayमहामार्गNational Highwayराष्ट्रीय महामार्ग