शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

महामार्गाला गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:08 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाला आर्णीनजिक आत्ताच तडे गेले. वाहतुकीपूर्वीच रस्त्याला तडे गेल्याने बांधकाम कंपनीची विश्वासार्हताच धोक्यात सापडली आहे.

ठळक मुद्देनागपूर-तुळजापूर महामार्ग : वाहतुकीपूर्वीच उघड झाले वास्तव

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाला आर्णीनजिक आत्ताच तडे गेले. वाहतुकीपूर्वीच रस्त्याला तडे गेल्याने बांधकाम कंपनीची विश्वासार्हताच धोक्यात सापडली आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर महागामार्गाचे चौपदरीकरणाने काम जोरात सुरू आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याचे लोकार्पण व्हावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. लोकापर्ण होताच अधिकृतपणे या रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळेच देशातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या रस्ता बांधकाम कंपनीला कोट्यवधींचे कंत्राट देण्यात आले आहे. कंपनीने युद्ध पातळीवर बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.कंपनीचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी रात्रंदिन मजूर राबत आहे. आर्णी तालुक्यातील तरोडा ते कोसदणीपर्यंतच्या ४० किलोमीटरचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या कामावर हजारो मजुरांसह अद्ययावत यंत्रसामुग्री आहे. मात्र काही ठिकाणी या महागार्माला तडे गेल्याचे दिसत आहे. तालुक्यात सुकळी तसेच लोणबेहळ ते कोसदणी भागातील जंगलातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अद्याप या रस्त्यावर पाहिजे तशी वाहतूक सुरू झाली नाही. तरीही रस्त्याला तडे गेले आहे. त्यामुळे बांधकाम कंपनीच्या कामावरच शंका उपस्थित केली जात आहे.रस्त्याचे आयुष्य १00 वर्षेया महामार्गाचे आयुष्य १00 वर्षांचे असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्त्याला तडे जात आहे. त्यामुळे पुढील १00 वर्षे हा रस्ता टिकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे रस्ता बांधकाम कंपनीच्या विश्वासार्हतेला तडा बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :highwayमहामार्गNational Highwayराष्ट्रीय महामार्ग