शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची वारी सारफळीत लय भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:27 IST

येथून १४ कि.मी.वर असलेलं ७५० लोकसंख्येचं सारफळी गाव पाण्याच्या भीषण समस्येने होरपळून निघत आहे. नळ योजनेच्या विहिरीची पातळी खाली गेली. हातपंप कोरडे पडले. आता टँकरवर काम आलं आहे. दररोज २४ हजार लिटर पाणी या गावातील चार विहिरीत टाकले जाते.

ठळक मुद्देनागरिकांचा टाहो । विहिरींनी तळ गाठला, हातपंप कोरडे, प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : येथून १४ कि.मी.वर असलेलं ७५० लोकसंख्येचं सारफळी गाव पाण्याच्या भीषण समस्येने होरपळून निघत आहे. नळ योजनेच्या विहिरीची पातळी खाली गेली. हातपंप कोरडे पडले. आता टँकरवर काम आलं आहे. दररोज २४ हजार लिटर पाणी या गावातील चार विहिरीत टाकले जाते. गावात टँकर पोहोचते त्यावेळी विहिरीवर होणारी गर्दी जीवघेणी ठरते. पाणी मिळविण्यासाठी लोकांची मोठी धडपड सुरू होते. पाणी अपुरे पडत असल्याने टँकर वाढविण्याची मागणी सरपंच निर्मला कुंभेकर, उपसरपंच तेजस गावंडे यांनी केली आहे. या गावात कायमस्वरूपी उपाययोजनांचे अनेक प्रयोग फेल गेले. नाल्याशेजारी असलेल्या विहिरीचा पाझर तेवढा आधार आहे. याशिवाय बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, दाभा, येरंडगाव, यावली, सुकळी, तरोडा, वाई, आलेगाव ही गावे संभाव्य पाणीटंचाईच्या यादीत आहे. पुढील काळात पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुक्या जीवांची सेवासारफळी गावात मुक्या जीवांच्या पाण्याचा प्रश्नही भीषण आहे. गावशिवारातून वाहणारे ओढे कोरडे पडले आहे. अशावेळी जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. मात्र श्रीकांत वखरे यांनी ही सोय करून दिली आहे. गेली दोन वर्षांपासून ते जनावरांची तृष्णातृप्ती व्हावी यासाठी पाणी उपलब्ध करून देत असल्याचे उपसरपंच तेजस गावंडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई