शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने पेरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:05 IST

गतवर्षी अपुऱ्या पावसाने कर्जाच्या खाईत गेलेल्या शेतकऱ्यांना यंदा मृगनक्षत्रापासूनच पावसाने दिलासा दिला. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे.

ठळक मुद्दे२४ तासात २२.८१ मिमी : दहा दिवसात ८९.८१ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी अपुऱ्या पावसाने कर्जाच्या खाईत गेलेल्या शेतकऱ्यांना यंदा मृगनक्षत्रापासूनच पावसाने दिलासा दिला. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. गत दहा दिवसात ८९.८१ मिमी पाऊस झाला असून २४ तासात २२.८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील शेतशिवार आता शेतकरी आणि मजुरांच्या गर्दीने फुलून गेले आहे.गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्केच पाऊस झाला होता. यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला. यंदा सुरुवातीपासूनच हवामान खात्याने समाधानकारक अंदाज वर्तविले. विशेष म्हणजे अंदाज खरे ठरत पावसाचे वेळेवर आगमन झाले. मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दररोज रात्री पाऊस धो-धो बरसत आहे. १ ते १० जूनपर्यंत जिल्ह्यात ८९.८१ मिमी पाऊस कोसळला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत केवळ ४४.६४ टक्के पाऊस कोसळला होता. आतापर्यंत कोसळलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या १०.१८ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस दारव्हा तालुक्यात १६२ मिमी कोसळला. यवतमाळ ११७ मिमी, बाभूळगाव ६५ मिमी, कळंब ४० मिमी, आर्णी ८९ मिमी, दिग्रस १०७ मिमी, नेर ९५ मिमी, पुसद १५२ मिमी, उमरखेड ७८ मिमी, महागाव १०७ मिमी, केळापूर ७० मिमी, घाटंजी १३३ मिमी, राळेगाव ४१ मिमी, वणी ७८ मिमी, मारेगाव ४१ मिमी, झरी ६२ मिमी पाऊस कोसळला आहे. दहा दिवसात झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. कापूस टोबणीला शेतशिवारात प्रारंभ झाला आहे. शेतशिवार शेतकरी आणि मजुरांच्या गर्दीने फुलून गेले आहे.पेरणीची घाई करू नकाजिल्ह्यात सध्या कोसळत असलेला पाऊस मान्सूनपूर्व आहे. त्यातच १२ जूननंतर पावसात खंड पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तापमानातही वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, असेही म्हटले आहे.पाणीटंचाईत पावसाचा दिलासायवतमाळ शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यवतमाळ शहराने तर अभूतपूर्व पाणीटंचाई अनुभवली. दमदार पाऊस कोसळल्याने पाणीटंचाई संपली नसली तरी दिलासा मात्र मिळाला आहे. शहरातील अनेक विहिरी आणि हातपंप व बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे. काही ठिकाणी नागरिक छतावरून पडणारे पाणी गोळा करून आपली पाण्याची गरज भागवित असल्याचे चित्र यवतमाळ शहरात आहे.

टॅग्स :Rainपाऊस