शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने पेरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:05 IST

गतवर्षी अपुऱ्या पावसाने कर्जाच्या खाईत गेलेल्या शेतकऱ्यांना यंदा मृगनक्षत्रापासूनच पावसाने दिलासा दिला. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे.

ठळक मुद्दे२४ तासात २२.८१ मिमी : दहा दिवसात ८९.८१ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी अपुऱ्या पावसाने कर्जाच्या खाईत गेलेल्या शेतकऱ्यांना यंदा मृगनक्षत्रापासूनच पावसाने दिलासा दिला. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. गत दहा दिवसात ८९.८१ मिमी पाऊस झाला असून २४ तासात २२.८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील शेतशिवार आता शेतकरी आणि मजुरांच्या गर्दीने फुलून गेले आहे.गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्केच पाऊस झाला होता. यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला. यंदा सुरुवातीपासूनच हवामान खात्याने समाधानकारक अंदाज वर्तविले. विशेष म्हणजे अंदाज खरे ठरत पावसाचे वेळेवर आगमन झाले. मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दररोज रात्री पाऊस धो-धो बरसत आहे. १ ते १० जूनपर्यंत जिल्ह्यात ८९.८१ मिमी पाऊस कोसळला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत केवळ ४४.६४ टक्के पाऊस कोसळला होता. आतापर्यंत कोसळलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या १०.१८ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस दारव्हा तालुक्यात १६२ मिमी कोसळला. यवतमाळ ११७ मिमी, बाभूळगाव ६५ मिमी, कळंब ४० मिमी, आर्णी ८९ मिमी, दिग्रस १०७ मिमी, नेर ९५ मिमी, पुसद १५२ मिमी, उमरखेड ७८ मिमी, महागाव १०७ मिमी, केळापूर ७० मिमी, घाटंजी १३३ मिमी, राळेगाव ४१ मिमी, वणी ७८ मिमी, मारेगाव ४१ मिमी, झरी ६२ मिमी पाऊस कोसळला आहे. दहा दिवसात झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. कापूस टोबणीला शेतशिवारात प्रारंभ झाला आहे. शेतशिवार शेतकरी आणि मजुरांच्या गर्दीने फुलून गेले आहे.पेरणीची घाई करू नकाजिल्ह्यात सध्या कोसळत असलेला पाऊस मान्सूनपूर्व आहे. त्यातच १२ जूननंतर पावसात खंड पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तापमानातही वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, असेही म्हटले आहे.पाणीटंचाईत पावसाचा दिलासायवतमाळ शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यवतमाळ शहराने तर अभूतपूर्व पाणीटंचाई अनुभवली. दमदार पाऊस कोसळल्याने पाणीटंचाई संपली नसली तरी दिलासा मात्र मिळाला आहे. शहरातील अनेक विहिरी आणि हातपंप व बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे. काही ठिकाणी नागरिक छतावरून पडणारे पाणी गोळा करून आपली पाण्याची गरज भागवित असल्याचे चित्र यवतमाळ शहरात आहे.

टॅग्स :Rainपाऊस