शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 12:06 IST

सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.२ मिमी पाऊस झाला असून यवतमाळसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

ठळक मुद्देअनेक वाड्या-वस्त्यांना पुराचा वेढा : बेंबळा प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडले 

यवतमाळ : रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुरूच असल्याने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांपुढे पुराचा धोका निर्माण झाला आहे. बाभूळगावात अनेक ठिकाणी पूरपस्थिती असून तेथील मस्जीद परिरसातील नदी काठची घरी पाण्याने वेढली आहे. तालुक्यातील किन्ही व गोंधळी या गावांनाही पुराचा वेढा पडला असून धामणगाव रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर, यवतमाळमध्ये कॉलनीत आलेला पूर पहायला गेलेला एक मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. दरम्यान सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.२ मिमी पाऊस झाला असून यवतमाळसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

रविवारी सायंकाळपासून यवतमाळसह जिल्ह्यात रिमझीम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस अधूनमधून सुरू असतानाच रात्री १० नंतर पावसाने जोर पकडला. सोमवारी सकाळी ११.३० पर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरुच होता. बाभूळगाव शहरालगतच्या उंच पुलावरून पुराचे पाणी वाहत असून बाभूळगाव येथील मस्जीद परिसरातील नदी काठची घरे पुराने वेढली आहे. बाभूळगावातील गोरक्षणातील गाईच्या गोठाही पुराच्या पाण्यात सापडला आहे.

राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथील वर्धा नदीवर बांधलेल्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. अपर वर्धा प्रकल्पाचे सर्व १३ दरवाजे पहाटे ५ वाजता १५० सेमीने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने बाभूळगावसह कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राळेगाव तालुक्यातील अनेक गावे पुराने वेढली अूसन सावनेर येथील दहा घरे पुरामध्ये वाहून गेली.  झाडगावसह सावंगीसमोर पुराचा धोका असून तालुक्यातील चहांद आणि करंजी गावांचा संपर्क तुटला आहे. पिंपळगावातील काही घरात पाणी शिरले असून वडकी, फुटाणे ले-आऊटमध्येही पूरस्थिती आहे. मध्यम प्रकल्पाच्या पाण्यामुळे वरुड जहांगीर येथील बंजारा वस्तीत पाणी शिरले आहे.

राळेगावमध्ये १४७ तर कळंबमध्ये १३० मिमी पाऊस

रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात राळेगाव तालुक्यात १४७.९ मिमी पाऊस झाला आहे. कळंब तालुक्यालाही पावसाने झोडपले असून येथे १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव तालुक्यात १०३.४ मिमी, नेर १०३.१ मिमी तर यवतमाळ तालुक्यात ७० मिमी पाऊस झाला असून सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याची स्थिती आहे.

उपकेंद्र पाण्यात; राळेगाव तालुक्यातील १६ गावे अंधारातराळेगाव तालुक्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून झाडगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील डीसी पुरवठा थांबविण्यात आला असून सर्व ३३ केव्ही व ११ केव्ही फिडरवरून होणारा वीज पुरवठाही थांबविण्यात आला आहे. सदर उपकेंद्रातून १६ गावांना वीज पुरवठा केला जातो. ही १६ ही गावे सध्या अंधारात असून पूरस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची माहिती घेवूनच विद्युत पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे राळेगावच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.वरुड, जहांगीर तांड्यावरील नागरिकांनी गाठली टेकडी 

रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वरुड, जहांगीर येथील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढला आहे. तलाव ओव्हर फ्लो होवून नुकसान होण्याच्या भीतीने वरुड, जहांगीर तांड्यातील नागरिकांनी घराला कुलूपे ठोकून वरच्या बाजूला असलेल्या टेकडीचा आसरा घेतला आहे. पुराच्या भीतीमुळे लेकरां-बाळांसह ही कुटुंबे पहाटेपासून उपाशीच टेकडीवर बसून असल्याचे वार्ताहरांनी कळविले आहे.

कॉलनीत आलेला पूर पाहताना मुलगा वाहून गेला 

यवतमाळ शहरातील मुलकी परिसरात मुसळधार पावसामुळे  नाल्यांना पूर आला. पूर बघण्यासाठी जय गायकवाड (रा. मुंगसाजी नगर वडगाव आर्णी रोड) हा मित्रांसोबत गेला, सकाळी नाल्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरYavatmalयवतमाळ