शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; ५५ मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद

By विशाल सोनटक्के | Updated: July 13, 2022 15:18 IST

जोराच्या पावसामुळे अमरखेड, महागावसह राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा पडला आहे. 

ठळक मुद्दे२४ तासात ६९.७ मिमी पाऊस

यवतमाळ : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मंगळवारी दिवसभर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळल्यानंतर मध्यरात्री पावसाने आणखी जोर धरला. हा पाऊस पहाटेपर्यंत सर्वदूर कोसळत होता. यंदा प्रथमच संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून २४ तासात तब्बल ६९.७ मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे शंभरपैकी ५५ मंडळात अतिवृष्टी नोंदविली गेली आहे.

यवतमाळ तालुक्यात सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात ४७.८ मिमी पाऊस झाला आहे. बाभूळगाव ५१.३, कळंब ५१.२, दारव्हा ६३.३, दिग्रस ५४.२, आर्णी ७५.४, नेर ४७.२, पुसद ६५.५, उमरखेड १३२.३, घाटंजी ४०.१, राळेगाव ६३.५, महागाव १०९.१, वणी ७८.६, मारेगाव ४९.२, केळापूर ८६.७ तर झरी जामणी तालुक्यात सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात तब्बल १०५.५ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे. जोराच्या पावसामुळे अमरखेड, महागावसह राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा पडला आहे. 

बेंबळासह सायखेडा, अधरपूसमधूनही पाण्याचा विसर्ग

मंगळवारी दिवसभर जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्रीही पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने बेंबळासह सायखेडा आणि अधरपूस प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बेंबळा प्रकल्पात बुधवारी सकाळी ४६.५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ५० घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे. तर सायखेडा प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ६९.३८ घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे. अधरपूस प्रकल्पातही ५९.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ५० घनसेमीने पाणी सोडण्यात आले आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

दराटी, पिरंजी व तरोडा लघु प्रकल्प तुडुंब

जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे. पाटबंधारे उपविभाग क्र. ४ महागाव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी ३ वाजता दराटी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता पिरंजी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. तरोडा प्रकल्पही शंभर टक्के भरला असून या तीनही प्रकल्पातून सांडवा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी दराटी लघु प्रकल्पातून १५ सेमीने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर पिरंजीमधून १० आणि तरोडा प्रकल्पातून ५ सेमीने सांडवा विसर्ग सुरू होता.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरYavatmalयवतमाळ