शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:01 IST

जिल्ह्यात १५ जूनला पाऊस बरसला. त्यानंतर बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र उन्हाचा पारा अधिक असल्याने ही धडपड व्यर्थ जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. अनेकांना पाण्याची व्यवस्था असतानाही ओलित करता आले नाही. यामुळे पीक शेवटच्या घटका मोजत होते.

ठळक मुद्देराळेगावात दुकानात शिरले पाणी : यवतमाळ, कळंब, दारव्हा तालुक्यात धुव्वाधार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल १८ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेवटच्या घटका मोजणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले. तर पेरणी बाद झालेल्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करण्यासाठी या पावसाची मोठी मदत होणार आहे. राळेगाव तालुक्यात अतिपाऊस झाल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले.जिल्ह्यात १५ जूनला पाऊस बरसला. त्यानंतर बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र उन्हाचा पारा अधिक असल्याने ही धडपड व्यर्थ जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. अनेकांना पाण्याची व्यवस्था असतानाही ओलित करता आले नाही. यामुळे पीक शेवटच्या घटका मोजत होते. शुक्रवारी बहुतांश भागात पाऊस बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. उणे पावसाने शेतकऱ्यांची चांगली गोची झाली आहे. शुक्रवारी बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी उत्पन्न प्रभावित होण्याचाही धोका वर्तविला जात आहे.गुरूवारी रात्री राळेगावात अर्ध्या तासात ६३ मिमी पावसाची नोंद झाली.हा पाऊस जोरदार होता. त्रिमूर्ती कॉम्पलेक्सच्या दुकानात हे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे ५० लाखांचे नुकसान झाले. राळेगावात जोरदार पाऊस बरसल्याने कृषीसेवा केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या दुकानांना याचा फटका बसला. कळंबच्या थाळेगाव पुनर्वसन येथे अनेक घरात पाणी घुसले. कामठवाडा येथे पूल वाहून गेला.मासिक सरासरीच्या केवळ २३ टक्के पाऊसजिल्ह्यात सरासरी १० मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये यवतमाळ १.९ मिमी, बाभूळगाव १५.७ मिमी, कळंब ३७.४, दारव्हा ५.३, दिग्रस ९.२, आर्णी १०.२, नेर ०.६, पुसद १०.६, उमरखेड १, महागाव १४, वणी २३, मारेगाव ३, झरी २, केळापूर ४, घाटंजी ५ आणि राळेगाव १६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या केवळ २३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद पिकांसाठी चिंताजनक आहे.

टॅग्स :Rainपाऊस