शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उष्णतेच्या लाटेने जिल्हा होरपळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:04 IST

हवामान खात्याने विदर्भात उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. गुरूवारी जिल्ह्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. या नोंदीने एप्रिल महिन्यातील गत १० वर्षामधील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामान खात्याने विदर्भात उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. गुरूवारी जिल्ह्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. या नोंदीने एप्रिल महिन्यातील गत १० वर्षामधील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. उन्हाच्या वाढत्या झळांनी शहरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट होता.आजवर जिल्ह्यात एप्रिलचे उच्चांकी तापमान ४० अंशाच्या आसपासच राहिले आहे. यावर्षी हे तापमान ४४.५ अंशापर्यंत चढले. यामुळे मे महिन्यात जिल्ह्याचे तापमान किती अंशावर पोहोचेल, याबाबत धास्ती निर्माण झाली आहे. उन्हाच्या दाहकतेने सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यांवरून प्रवास करणेही अवघड झाले होते. प्रचंड उन्हामुळे यवतमाळ शहरात दुपारी ४ पर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.जोडमोहा येथे धावती बस पेटलीवाढत्या तापमानाने चक्क धावती बस पेटल्याची घटना जोडमोहा येथे घडली. गुरुवारी दुपारी २.१५ वाजता आदिलाबाद ते नेर ही बस (क्र.एम.एच.४०-वाय-५५१८) यवतमाळकडे जाताना अचानक पेटली. चालकाला त्याची कोणतीही कल्पना नव्हती. पेटती बस रस्त्यावरून धाव होती. जोडमोहा येथील काही नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी तातडीने दुचाकीने बसचा पाठलाग करून चालकाला माहिती दिली. त्यानंतर बस थांबविण्यात आली. सर्व प्रवाशांना खाली उतरवून जोडमोहा येथील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे मोठा अनर्थ टळला.तलावफैलात रोहित्र पेटलेयवतमाळ येथील तलावफैलातील रोहित्राने प्रचंड उन्हामुळे पेट घेतला. डीपीला जोडणाऱ्या दोन्ही केबल जळाल्या. यामुळे या भागातील वीज पुरवठा सात तास खंडीत होता. याचा फटका २० हजारांच्या लोकवस्तीला बसला. सायंकाळपर्यंत दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

टॅग्स :weatherहवामान