शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

जिल्ह्यात उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:09 IST

सूर्य आग ओकत असून उन मी म्हणत आहे. पारा ४३ अंशावर पोहचला असल्याने दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. नागरिकांना प्रचंड तापमानाचा सामना करावा लागत असून पाणीटंचाईने कुलर काढण्याची सोय नाही.

ठळक मुद्देउन म्हणते मी : पारा ४३ अंशावर, जलपातळीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सूर्य आग ओकत असून उन मी म्हणत आहे. पारा ४३ अंशावर पोहचला असल्याने दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. नागरिकांना प्रचंड तापमानाचा सामना करावा लागत असून पाणीटंचाईने कुलर काढण्याची सोय नाही.विदर्भात सध्या उष्णतेची लाट आली आहे. जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ११ ते १५ एप्रिलपर्यंत ३६ ते ३८ अंश तापमानाची नोंद जिल्ह्यात करण्यात आली होती. १५ एप्रिल रोजी पारा ४०.५ अंशावर जाऊन पोहोचला. १७ एप्रिलपासून तर तापमानाने कळस गाठणे सुरू केले. तीन दिवस पारा ४२.५ अंशावर स्थिर होता. गुरूवारी यवतमाळचे तापमान ४३ अंश नोंदविले गेले. शुक्रवारी तापमान ४२.५ अंश होते. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाने नागरिक हैराण झाले आहे. वातावरणात अचानक शुष्कता निर्माण होऊन तापमान प्रचंड वाढले आहे. यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे. दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. या उन्हामुळे आजार बळावण्याची शक्यता बळावली आहे.उन्हापासून बचाव करण्याचे प्रयत्न सर्वच जण करीत आहेत. मात्र यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई असल्याने कुलर काढण्याचीही सोय नाही. अनेकांनी कुलर काढले, परंतु पाणीच नसल्याने घामाच्या धारात भिजण्याशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागातही अशीच अवस्था निर्माण झाली आहे.वाढत्या तापमानाचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र भूजल पातळी खालावली आहे. अशातच आता तापमान वाढत असल्याने ही पातळी आणखी खाली जात आहे. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.पोलिसांनी टाकला सिग्नलवर मंडपतळपत्या उन्हामुळे सिग्नलवर दोन मिनीट थांबणेही असह्य होते. यावर उपाय म्हणून एलआयसी चौकातील सिग्नलवर पोलीस दलाच्यावतीने चक्क ग्रीन शेड नेटचा मंडप टाकला आहे. चारही बाजूला ग्रीन शेड नेट आच्छादले असून यामुळे तात्पुरती सावली निर्माण होऊन वाहनधारकांना सिग्नलवर थांबणे सुसह्य होते. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाने उन्हाळा मात्र काहीसा सुसह्य होणार आहे. शहरातील विविध भागात काही दुकानदारांनीही आपल्या दुकानासमोर ग्रीन शेड नेटचे मंडप टाकले आहे.