शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 22:17 IST

जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्यायाची मालिका सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कर्मचाºयांचे प्रश्न सोडविण्यात कुठलेही स्वारस्य नाही. या सर्व प्रकारात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही न्यायाची फारशी अपेक्षा नाही. अशावेळी न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसीईओंनाही स्वारस्य नाही : आरोग्य संघटनांनी दिलेले निवेदन बेदखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्यायाची मालिका सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कर्मचाºयांचे प्रश्न सोडविण्यात कुठलेही स्वारस्य नाही. या सर्व प्रकारात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही न्यायाची फारशी अपेक्षा नाही. अशावेळी न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सेवानिवृत्त तसेच कार्यरत कर्मचाºयांची कालबद्ध पदोन्नती प्रकरणे थंडबस्त्यात पडून आहे. सेवानिवृत्ती वेतन याविषयी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली जात नाही. अपवादाने झालीच तर इतिवृत्त तयार होत नाही. सभेमध्ये चर्चा झालेल्या विषयाचा आढावा घेण्यात येत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घ्यावयाचे निर्णय उपमुख्य कार्यकारी अधिकारी घेतात. यात झालेल्या अन्यायाविरूद्ध आरोग्य विभागातील अनेक प्रकरणे न्यायालयात गेली आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी जणू निर्णय प्रक्रियेबाहेर असल्याचे वातावरण जिल्हा परिषदेत आहे. विभाग प्रमुखांचीच अधिक चलती आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात पदाधिकारीही आपली भूमिका पार पाडत नाहीत. शिवाय सामान्य जनतेची कामेही अडली जात आहे. यावर नियंत्रण आणले जावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश आवटे यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी त्यांनी आरोग्यसह विविध विभागातील कर्मचाºयांच्या समस्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले आहे. आरोग्य संघटनांनी दिलेल्या निवेदनांनाही प्रशासनाकडून बेदखल केले जात आहे.सेस फंड कोर्टकचेरीतजिल्हा परिषदेकडून अन्याय झाल्याने कर्मचारी न्यायालयात धाव घेतात. अशावेळी जिल्हा परिषदेला आपली भूमिका मांडण्यासाठी वकीलाची नियुक्ती केली जाते. यासाठीचा खर्च जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून केला जातो. जिल्हा परिषदेविरोधात निर्णय जात असल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न रमेश आवटे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद