शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 22:17 IST

जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्यायाची मालिका सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कर्मचाºयांचे प्रश्न सोडविण्यात कुठलेही स्वारस्य नाही. या सर्व प्रकारात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही न्यायाची फारशी अपेक्षा नाही. अशावेळी न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसीईओंनाही स्वारस्य नाही : आरोग्य संघटनांनी दिलेले निवेदन बेदखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्यायाची मालिका सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कर्मचाºयांचे प्रश्न सोडविण्यात कुठलेही स्वारस्य नाही. या सर्व प्रकारात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही न्यायाची फारशी अपेक्षा नाही. अशावेळी न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सेवानिवृत्त तसेच कार्यरत कर्मचाºयांची कालबद्ध पदोन्नती प्रकरणे थंडबस्त्यात पडून आहे. सेवानिवृत्ती वेतन याविषयी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली जात नाही. अपवादाने झालीच तर इतिवृत्त तयार होत नाही. सभेमध्ये चर्चा झालेल्या विषयाचा आढावा घेण्यात येत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घ्यावयाचे निर्णय उपमुख्य कार्यकारी अधिकारी घेतात. यात झालेल्या अन्यायाविरूद्ध आरोग्य विभागातील अनेक प्रकरणे न्यायालयात गेली आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी जणू निर्णय प्रक्रियेबाहेर असल्याचे वातावरण जिल्हा परिषदेत आहे. विभाग प्रमुखांचीच अधिक चलती आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात पदाधिकारीही आपली भूमिका पार पाडत नाहीत. शिवाय सामान्य जनतेची कामेही अडली जात आहे. यावर नियंत्रण आणले जावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश आवटे यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी त्यांनी आरोग्यसह विविध विभागातील कर्मचाºयांच्या समस्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले आहे. आरोग्य संघटनांनी दिलेल्या निवेदनांनाही प्रशासनाकडून बेदखल केले जात आहे.सेस फंड कोर्टकचेरीतजिल्हा परिषदेकडून अन्याय झाल्याने कर्मचारी न्यायालयात धाव घेतात. अशावेळी जिल्हा परिषदेला आपली भूमिका मांडण्यासाठी वकीलाची नियुक्ती केली जाते. यासाठीचा खर्च जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून केला जातो. जिल्हा परिषदेविरोधात निर्णय जात असल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न रमेश आवटे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद