शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

कोरोना योद्ध्यांच्या पगाराला ‘आरोग्य’च्या पेपरफुटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 14:36 IST

आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर फुटल्यानंतर आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटले याला अटक झाली. मात्र या प्रकरणाने आरोग्य अभियानातील कोरोनाकाळात जादा मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पगाराला फटका बसला.

ठळक मुद्देकर्मचारी त्रस्त आरोग्य अभियानावर दिवाळखोरीचा आरोप

यवतमाळ : आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर फुटल्यानंतर आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटले याला अटक झाली. मात्र या प्रकरणाने आरोग्य अभियानातील कोरोनाकाळात जादा मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पगाराला फटका बसला. त्यामुळे व्यक्ती केंद्रित कारभारामुळे आरोग्य अभियानच दिवाळखोरीला निघाल्याचा आरोप त्रस्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. मात्र रिक्त पदांची भरती करण्याकडे आरोग्य विभागाने अनेक दिवस कानाडोळा केल्यानंतर कशीबशी पदभरतीची परीक्षा घेतली. त्यातही तारखा आणि तांत्रिक चुका झाल्यामुळे ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचीही नामुष्की ओढवली. त्यानंतर झालेल्या परीक्षेचाही पेपर फुटला. गंभीर म्हणजे पेपरफुटीच्या या प्रकरणात सूत्रधार म्हणून आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटलेच कारागृहात गेला.

या दरम्यानच्या काळात अपुरे मनुष्यबळ असतानाही काम करीत असलेल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. शासनाने जाहीर केलेला कोविड भत्ताही दिला नाही. आरोग्यवर्धिनीचा मेहनताना मिळाला नाही. आरोग्य विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची अनेक देयके प्रलंबित आहे. सहसचिव महेश बोटले व विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेले अभियानाचे लेखाधिकारी यांच्यात टक्केवारीची सेटिंग असल्यामुळे पगाराच्या बाबतीत विलंब लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केला आहे.

आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासनाने नेमून दिलेले आरोग्य विषयक ९५ कार्यक्रम राबवावे लागतात. गेल्या दीड वर्षांपासून या ९५ कार्यक्रमांसह कोविड लसीकरणाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. अभियानातील ७० टक्के पदे रिक्त असताना नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठबिगार पद्धतीने राबवून घेतले जात आहे, असाही आरोप जयसिंगपुरे यांनी केला.

मंगल कार्यालयांचे भाडेही थकविले

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रशासनाने अनेक ठिकाणचे मंगल कार्यालय नागरिकांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी वापरले. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही या मंगल कार्यालयांना भाडेच देण्यात आलेले नाही, असा आरोप अशोक जयसिंगपुरे यांनी केला. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येत असल्याची शक्यता आरोग्य विभागच वर्तवित आहे, तर दुसरीकडे आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना कोण आणि कसा करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यexamपरीक्षाEmployeeकर्मचारीjobनोकरी