शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना योद्ध्यांच्या पगाराला ‘आरोग्य’च्या पेपरफुटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 14:36 IST

आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर फुटल्यानंतर आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटले याला अटक झाली. मात्र या प्रकरणाने आरोग्य अभियानातील कोरोनाकाळात जादा मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पगाराला फटका बसला.

ठळक मुद्देकर्मचारी त्रस्त आरोग्य अभियानावर दिवाळखोरीचा आरोप

यवतमाळ : आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर फुटल्यानंतर आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटले याला अटक झाली. मात्र या प्रकरणाने आरोग्य अभियानातील कोरोनाकाळात जादा मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पगाराला फटका बसला. त्यामुळे व्यक्ती केंद्रित कारभारामुळे आरोग्य अभियानच दिवाळखोरीला निघाल्याचा आरोप त्रस्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. मात्र रिक्त पदांची भरती करण्याकडे आरोग्य विभागाने अनेक दिवस कानाडोळा केल्यानंतर कशीबशी पदभरतीची परीक्षा घेतली. त्यातही तारखा आणि तांत्रिक चुका झाल्यामुळे ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचीही नामुष्की ओढवली. त्यानंतर झालेल्या परीक्षेचाही पेपर फुटला. गंभीर म्हणजे पेपरफुटीच्या या प्रकरणात सूत्रधार म्हणून आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटलेच कारागृहात गेला.

या दरम्यानच्या काळात अपुरे मनुष्यबळ असतानाही काम करीत असलेल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. शासनाने जाहीर केलेला कोविड भत्ताही दिला नाही. आरोग्यवर्धिनीचा मेहनताना मिळाला नाही. आरोग्य विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची अनेक देयके प्रलंबित आहे. सहसचिव महेश बोटले व विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेले अभियानाचे लेखाधिकारी यांच्यात टक्केवारीची सेटिंग असल्यामुळे पगाराच्या बाबतीत विलंब लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केला आहे.

आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासनाने नेमून दिलेले आरोग्य विषयक ९५ कार्यक्रम राबवावे लागतात. गेल्या दीड वर्षांपासून या ९५ कार्यक्रमांसह कोविड लसीकरणाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. अभियानातील ७० टक्के पदे रिक्त असताना नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठबिगार पद्धतीने राबवून घेतले जात आहे, असाही आरोप जयसिंगपुरे यांनी केला.

मंगल कार्यालयांचे भाडेही थकविले

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रशासनाने अनेक ठिकाणचे मंगल कार्यालय नागरिकांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी वापरले. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही या मंगल कार्यालयांना भाडेच देण्यात आलेले नाही, असा आरोप अशोक जयसिंगपुरे यांनी केला. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येत असल्याची शक्यता आरोग्य विभागच वर्तवित आहे, तर दुसरीकडे आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना कोण आणि कसा करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यexamपरीक्षाEmployeeकर्मचारीjobनोकरी