शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्ध्यांच्या पगाराला ‘आरोग्य’च्या पेपरफुटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 14:36 IST

आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर फुटल्यानंतर आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटले याला अटक झाली. मात्र या प्रकरणाने आरोग्य अभियानातील कोरोनाकाळात जादा मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पगाराला फटका बसला.

ठळक मुद्देकर्मचारी त्रस्त आरोग्य अभियानावर दिवाळखोरीचा आरोप

यवतमाळ : आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर फुटल्यानंतर आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटले याला अटक झाली. मात्र या प्रकरणाने आरोग्य अभियानातील कोरोनाकाळात जादा मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पगाराला फटका बसला. त्यामुळे व्यक्ती केंद्रित कारभारामुळे आरोग्य अभियानच दिवाळखोरीला निघाल्याचा आरोप त्रस्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. मात्र रिक्त पदांची भरती करण्याकडे आरोग्य विभागाने अनेक दिवस कानाडोळा केल्यानंतर कशीबशी पदभरतीची परीक्षा घेतली. त्यातही तारखा आणि तांत्रिक चुका झाल्यामुळे ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचीही नामुष्की ओढवली. त्यानंतर झालेल्या परीक्षेचाही पेपर फुटला. गंभीर म्हणजे पेपरफुटीच्या या प्रकरणात सूत्रधार म्हणून आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटलेच कारागृहात गेला.

या दरम्यानच्या काळात अपुरे मनुष्यबळ असतानाही काम करीत असलेल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. शासनाने जाहीर केलेला कोविड भत्ताही दिला नाही. आरोग्यवर्धिनीचा मेहनताना मिळाला नाही. आरोग्य विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची अनेक देयके प्रलंबित आहे. सहसचिव महेश बोटले व विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेले अभियानाचे लेखाधिकारी यांच्यात टक्केवारीची सेटिंग असल्यामुळे पगाराच्या बाबतीत विलंब लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केला आहे.

आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासनाने नेमून दिलेले आरोग्य विषयक ९५ कार्यक्रम राबवावे लागतात. गेल्या दीड वर्षांपासून या ९५ कार्यक्रमांसह कोविड लसीकरणाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. अभियानातील ७० टक्के पदे रिक्त असताना नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठबिगार पद्धतीने राबवून घेतले जात आहे, असाही आरोप जयसिंगपुरे यांनी केला.

मंगल कार्यालयांचे भाडेही थकविले

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रशासनाने अनेक ठिकाणचे मंगल कार्यालय नागरिकांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी वापरले. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही या मंगल कार्यालयांना भाडेच देण्यात आलेले नाही, असा आरोप अशोक जयसिंगपुरे यांनी केला. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येत असल्याची शक्यता आरोग्य विभागच वर्तवित आहे, तर दुसरीकडे आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना कोण आणि कसा करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यexamपरीक्षाEmployeeकर्मचारीjobनोकरी