शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चांगले व्यवहार ठेवले, म्हणजे गुन्हा केला काय? आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा शेवटचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 10:04 IST

‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली.

ठळक मुद्देमृत्यूपूर्व चिठ्ठी कर्जमाफीस अपात्र ठरल्याची खंत

सुरेंद्र राऊत ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली. त्याच्या चिठ्ठीतील प्रत्येक शब्दातून शेतकऱ्याची आजची अवस्था आणि शासनाची धोरणे स्पष्ट होते. शेतकरी मृत्यूला का कवटाळतो, याचे उत्तरही शोधण्याचा प्रयत्न आपल्या चिठ्ठीत केला आहे.यवतमाळच्या भारत लॉजमध्ये बुधवारी ज्ञानेश्वर मिसाळ (५६) रा. सोयजना ता. मानोरा (जि. वाशिम) या शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी ज्ञानेश्वरने वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. शासनाचे धोरण, मुलाला जगण्याचा सल्ला आणि सोबत बँकेच्या कर्जाचे स्टेटमेंटही जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर हा आठ एकर शेती कसणारा शेतकरी. प्रामाणिकपणे कष्ट करून आयुष्यभर स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न केला. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या धोरणाने त्यालाही विषाचा घोट घेणे भाग पडले. आपल्यावर ही वेळ का आली याचा लेखाजोखा त्याने चिठ्ठीत मांडला आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, ‘माझ्या शेतात संत्र्याची ४०० झाडे होती. २०० झाडे वाळली. मी बेनार आॅफीसला कळविले. नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतातही भेट दिली नाही. मी आयसीआयसीआय बँकेकडे कर्जाची मागणी केली. ते देण्यास तयार झाले. इतर बँकेचे पैसे भरा, नीलचा दाखला आणा, असे सांगितले. माझ्याकडे असलेले ग्रामीण बँकेचे एक लाख आठ हजार रुपये भरले, त्यासाठी १२ टक्के व्याजाने सावरकारी कर्ज घेतले. आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख ६८ हजार रुपये कर्ज आहे. एडीसीसी बँकेचे ७८ हजार रुपये कर्ज आहे. आतापर्यंत बँकेबरोबर रेग्युलर व्यवहार केल्यामुळे मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही. असे चिठ्ठीत लिहिले आहे.

मुलाला दिला जगण्याचा सल्लाज्ञानेश्वर मिसाळ याने आपल्या सतीश व सागर या मुलांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत जगण्याचा मूलमंत्र दिला. माणूस कितीही मोठा असला तरी पैसा नसेल तर तो कवडीमोल ठरतो. कर्जबाजारी माणसावर कुणी विश्वास ठेवत नाही. माझ्यासोबत जो अनर्थ घडला असा कुणावरही येऊ नये. कोणाचाही पैसा बुडवू नका, व्यवहार चांगले ठेवा, काटकसरीने वागा, आयुष्यात कुणालाही पैसे मागण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सल्ला मुलाला दिला.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या