शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

चांगले व्यवहार ठेवले, म्हणजे गुन्हा केला काय? आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा शेवटचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 10:04 IST

‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली.

ठळक मुद्देमृत्यूपूर्व चिठ्ठी कर्जमाफीस अपात्र ठरल्याची खंत

सुरेंद्र राऊत ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली. त्याच्या चिठ्ठीतील प्रत्येक शब्दातून शेतकऱ्याची आजची अवस्था आणि शासनाची धोरणे स्पष्ट होते. शेतकरी मृत्यूला का कवटाळतो, याचे उत्तरही शोधण्याचा प्रयत्न आपल्या चिठ्ठीत केला आहे.यवतमाळच्या भारत लॉजमध्ये बुधवारी ज्ञानेश्वर मिसाळ (५६) रा. सोयजना ता. मानोरा (जि. वाशिम) या शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी ज्ञानेश्वरने वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. शासनाचे धोरण, मुलाला जगण्याचा सल्ला आणि सोबत बँकेच्या कर्जाचे स्टेटमेंटही जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर हा आठ एकर शेती कसणारा शेतकरी. प्रामाणिकपणे कष्ट करून आयुष्यभर स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न केला. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या धोरणाने त्यालाही विषाचा घोट घेणे भाग पडले. आपल्यावर ही वेळ का आली याचा लेखाजोखा त्याने चिठ्ठीत मांडला आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, ‘माझ्या शेतात संत्र्याची ४०० झाडे होती. २०० झाडे वाळली. मी बेनार आॅफीसला कळविले. नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतातही भेट दिली नाही. मी आयसीआयसीआय बँकेकडे कर्जाची मागणी केली. ते देण्यास तयार झाले. इतर बँकेचे पैसे भरा, नीलचा दाखला आणा, असे सांगितले. माझ्याकडे असलेले ग्रामीण बँकेचे एक लाख आठ हजार रुपये भरले, त्यासाठी १२ टक्के व्याजाने सावरकारी कर्ज घेतले. आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख ६८ हजार रुपये कर्ज आहे. एडीसीसी बँकेचे ७८ हजार रुपये कर्ज आहे. आतापर्यंत बँकेबरोबर रेग्युलर व्यवहार केल्यामुळे मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही. असे चिठ्ठीत लिहिले आहे.

मुलाला दिला जगण्याचा सल्लाज्ञानेश्वर मिसाळ याने आपल्या सतीश व सागर या मुलांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत जगण्याचा मूलमंत्र दिला. माणूस कितीही मोठा असला तरी पैसा नसेल तर तो कवडीमोल ठरतो. कर्जबाजारी माणसावर कुणी विश्वास ठेवत नाही. माझ्यासोबत जो अनर्थ घडला असा कुणावरही येऊ नये. कोणाचाही पैसा बुडवू नका, व्यवहार चांगले ठेवा, काटकसरीने वागा, आयुष्यात कुणालाही पैसे मागण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सल्ला मुलाला दिला.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या