शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

चांगले व्यवहार ठेवले, म्हणजे गुन्हा केला काय? आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा शेवटचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 10:04 IST

‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली.

ठळक मुद्देमृत्यूपूर्व चिठ्ठी कर्जमाफीस अपात्र ठरल्याची खंत

सुरेंद्र राऊत ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली. त्याच्या चिठ्ठीतील प्रत्येक शब्दातून शेतकऱ्याची आजची अवस्था आणि शासनाची धोरणे स्पष्ट होते. शेतकरी मृत्यूला का कवटाळतो, याचे उत्तरही शोधण्याचा प्रयत्न आपल्या चिठ्ठीत केला आहे.यवतमाळच्या भारत लॉजमध्ये बुधवारी ज्ञानेश्वर मिसाळ (५६) रा. सोयजना ता. मानोरा (जि. वाशिम) या शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी ज्ञानेश्वरने वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. शासनाचे धोरण, मुलाला जगण्याचा सल्ला आणि सोबत बँकेच्या कर्जाचे स्टेटमेंटही जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर हा आठ एकर शेती कसणारा शेतकरी. प्रामाणिकपणे कष्ट करून आयुष्यभर स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न केला. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या धोरणाने त्यालाही विषाचा घोट घेणे भाग पडले. आपल्यावर ही वेळ का आली याचा लेखाजोखा त्याने चिठ्ठीत मांडला आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, ‘माझ्या शेतात संत्र्याची ४०० झाडे होती. २०० झाडे वाळली. मी बेनार आॅफीसला कळविले. नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतातही भेट दिली नाही. मी आयसीआयसीआय बँकेकडे कर्जाची मागणी केली. ते देण्यास तयार झाले. इतर बँकेचे पैसे भरा, नीलचा दाखला आणा, असे सांगितले. माझ्याकडे असलेले ग्रामीण बँकेचे एक लाख आठ हजार रुपये भरले, त्यासाठी १२ टक्के व्याजाने सावरकारी कर्ज घेतले. आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख ६८ हजार रुपये कर्ज आहे. एडीसीसी बँकेचे ७८ हजार रुपये कर्ज आहे. आतापर्यंत बँकेबरोबर रेग्युलर व्यवहार केल्यामुळे मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही. असे चिठ्ठीत लिहिले आहे.

मुलाला दिला जगण्याचा सल्लाज्ञानेश्वर मिसाळ याने आपल्या सतीश व सागर या मुलांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत जगण्याचा मूलमंत्र दिला. माणूस कितीही मोठा असला तरी पैसा नसेल तर तो कवडीमोल ठरतो. कर्जबाजारी माणसावर कुणी विश्वास ठेवत नाही. माझ्यासोबत जो अनर्थ घडला असा कुणावरही येऊ नये. कोणाचाही पैसा बुडवू नका, व्यवहार चांगले ठेवा, काटकसरीने वागा, आयुष्यात कुणालाही पैसे मागण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सल्ला मुलाला दिला.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या