शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत नफरत हरली, प्रेम जिंकले - गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 07:10 IST

गुलाम नबी आझाद । विदर्भातील काँग्रेसचे मंत्री, आमदारांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा

यवतमाळ : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह जवळपास संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरविले. हा राजकीय दबाव, सोबतच ईडी, एनआयएचाही दबाव असताना दिल्लीकरांनी भाजपला केवळ आठ आणि ‘आप’ला तब्बल ६२ जागा दिल्या. ‘नफरत हार गई, प्यार जित गया’ अशा शब्दात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण केले.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी येथे कार्यकर्ता मेळावा व काँग्रेसचे मंत्री, आमदारांचा सत्कार पार पडला. यावेळी आझाद बोलत होते. ते म्हणाले, भाजप सरकारने केवळ जाती-पातीचे राजकारण केले. मात्र,दिल्लीच्या जनतेने असे धार्मिक ध्रुवीकरण नाकारले. विशेष म्हणजे, दिल्लीत मुस्लीम लोकसंख्या कमी असून हिंदूच मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपच्या जातीय राजकारणाला दिल्लीतील हिंदू मतदारांनीही झिडकारले. भाजपच्या काळात देशात २३ लाख उद्योग बंद झाले. महागाई १२.२ टक्के वाढली. वादग्रस्त कायदे करायचे आणि लोकांना विभाजित करून आपसात भांडत ठेवायचे, ही भाजपची नीती असल्याचे आझाद यांनी सांगितले.प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, खासदार बाळासाहेब धानोरकर, माजी खासदार विजय दर्डा, आदी उपस्थित होते.पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज : विजय दर्डालोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, हा केवळ सत्कार समारंभ नसून हा संदेश आहे. जेव्हा - जेव्हा काँग्रेस संकटात होती, तेव्हा - तेव्हा गुलाम नबी आझाद पुढे सरसावले. त्यांनी विदर्भाचे नेतृत्व केले. इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी अशा सर्वांसोबत त्यांनी वाटचाल केली आहे. आज काँग्रेसच्या देशातील स्थितीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे आमदार निवडून आले, ते स्वत:च्या बळावर निवडून आले. मात्र, जे हरले, त्यांच्या पराभवाची जबाबदारी पक्षाची आहे. आता सर्व मतभेद बाजूला सारून पक्ष संघटना मजबूत करावी लागेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूकYavatmalयवतमाळ