शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

दिल्लीत नफरत हरली, प्रेम जिंकले - गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 07:10 IST

गुलाम नबी आझाद । विदर्भातील काँग्रेसचे मंत्री, आमदारांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा

यवतमाळ : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह जवळपास संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरविले. हा राजकीय दबाव, सोबतच ईडी, एनआयएचाही दबाव असताना दिल्लीकरांनी भाजपला केवळ आठ आणि ‘आप’ला तब्बल ६२ जागा दिल्या. ‘नफरत हार गई, प्यार जित गया’ अशा शब्दात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण केले.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी येथे कार्यकर्ता मेळावा व काँग्रेसचे मंत्री, आमदारांचा सत्कार पार पडला. यावेळी आझाद बोलत होते. ते म्हणाले, भाजप सरकारने केवळ जाती-पातीचे राजकारण केले. मात्र,दिल्लीच्या जनतेने असे धार्मिक ध्रुवीकरण नाकारले. विशेष म्हणजे, दिल्लीत मुस्लीम लोकसंख्या कमी असून हिंदूच मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपच्या जातीय राजकारणाला दिल्लीतील हिंदू मतदारांनीही झिडकारले. भाजपच्या काळात देशात २३ लाख उद्योग बंद झाले. महागाई १२.२ टक्के वाढली. वादग्रस्त कायदे करायचे आणि लोकांना विभाजित करून आपसात भांडत ठेवायचे, ही भाजपची नीती असल्याचे आझाद यांनी सांगितले.प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, खासदार बाळासाहेब धानोरकर, माजी खासदार विजय दर्डा, आदी उपस्थित होते.पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज : विजय दर्डालोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, हा केवळ सत्कार समारंभ नसून हा संदेश आहे. जेव्हा - जेव्हा काँग्रेस संकटात होती, तेव्हा - तेव्हा गुलाम नबी आझाद पुढे सरसावले. त्यांनी विदर्भाचे नेतृत्व केले. इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी अशा सर्वांसोबत त्यांनी वाटचाल केली आहे. आज काँग्रेसच्या देशातील स्थितीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे आमदार निवडून आले, ते स्वत:च्या बळावर निवडून आले. मात्र, जे हरले, त्यांच्या पराभवाची जबाबदारी पक्षाची आहे. आता सर्व मतभेद बाजूला सारून पक्ष संघटना मजबूत करावी लागेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूकYavatmalयवतमाळ