शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

‘झेडपी’च्या बदल्यांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:48 IST

जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १ व २ जून रोजी समुपदेशन घेतले जाणार आहे. मात्र अद्यापही या बदल्यांवर टांगती तलवार कायम आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेने समुपदेशन प्रक्रिया रद्द केली.

ठळक मुद्देसमुपदेशन रद्द : बदलीप्रक्रियेवर काही कर्मचारी संघटनांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १ व २ जून रोजी समुपदेशन घेतले जाणार आहे. मात्र अद्यापही या बदल्यांवर टांगती तलवार कायम आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेने समुपदेशन प्रक्रिया रद्द केली.२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यानंतर आचारसंहिता शिथिल झाली होती. आचारसंहितेमुळे यावर्षी ३१ मेपूर्वी बदली करणे अशक्य झाले होते. परिणामी राज्य शासनाने बदल्यांसाठी ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदलीप्रक्रिया सुरू केली. १ व २ जून रोजी विविध विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांना समुपदेशनासाठी पाचारण करण्यात आले. रिक्त जागा आणि कर्मचाºयांच्या पसंतीक्रमानुसार ही प्रक्रिया राबविली जाणार होती. मात्र या प्रक्रियेत केवळ दहा ते १५ दिवसांचा अवधी मिळत आहे. वास्तविक बदली प्रक्रिया राबविण्यासाठी किमान ४५ दिवसांचा अवधी आवश्यक असतो. या ४५ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. मात्र आचारसंहितेमुळे शासनानेच तातडीने पत्र पाठवून हा कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने समुपदेशनाचे वेळापत्रक निश्चित केले होते.दरम्यान लोकसभेची आचारसंहिता संपली असली तरी आता ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बदल्या संकटात सापडण्याची चिन्हे दिसत होती.तथापि निश्चित वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद समुपदेशन प्रक्रिया राबविणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांनी स्पष्ट केले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समुपदेशनाची प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे चौधर यांनी सांगितले.बदलीप्रक्रियेसाठी अपुरा अवधीमहाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने या बदलीप्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यातून बदलीची प्रक्रिया ४५ दिवसांची असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ दहा दिवस मुदतवाढ मिळाल्याने ही प्रक्रिया कशी पूर्ण होईल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. बदल्यांचे टप्पे या अवधीत पूर्ण होत नाही, असा आक्षेप संघटनेने घेतला आहे. शासन निर्णयातील तरतूद कोणत्याही विभागाच्या पत्राने बदलविता येत का, याची शक्यताही तपासण्याची विनंती संघटनेने केली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये आरोग्य विभागाने काही प्रकरणे बदलीसाठी पाठविली होती. मात्र ती परत केली गेली. तथापि औषध निर्माण अधिकाºयांच्या प्रकरणात मात्र भलताच निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद