शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

‘झेडपी’च्या बदल्यांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:48 IST

जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १ व २ जून रोजी समुपदेशन घेतले जाणार आहे. मात्र अद्यापही या बदल्यांवर टांगती तलवार कायम आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेने समुपदेशन प्रक्रिया रद्द केली.

ठळक मुद्देसमुपदेशन रद्द : बदलीप्रक्रियेवर काही कर्मचारी संघटनांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १ व २ जून रोजी समुपदेशन घेतले जाणार आहे. मात्र अद्यापही या बदल्यांवर टांगती तलवार कायम आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेने समुपदेशन प्रक्रिया रद्द केली.२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यानंतर आचारसंहिता शिथिल झाली होती. आचारसंहितेमुळे यावर्षी ३१ मेपूर्वी बदली करणे अशक्य झाले होते. परिणामी राज्य शासनाने बदल्यांसाठी ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदलीप्रक्रिया सुरू केली. १ व २ जून रोजी विविध विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांना समुपदेशनासाठी पाचारण करण्यात आले. रिक्त जागा आणि कर्मचाºयांच्या पसंतीक्रमानुसार ही प्रक्रिया राबविली जाणार होती. मात्र या प्रक्रियेत केवळ दहा ते १५ दिवसांचा अवधी मिळत आहे. वास्तविक बदली प्रक्रिया राबविण्यासाठी किमान ४५ दिवसांचा अवधी आवश्यक असतो. या ४५ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. मात्र आचारसंहितेमुळे शासनानेच तातडीने पत्र पाठवून हा कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने समुपदेशनाचे वेळापत्रक निश्चित केले होते.दरम्यान लोकसभेची आचारसंहिता संपली असली तरी आता ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बदल्या संकटात सापडण्याची चिन्हे दिसत होती.तथापि निश्चित वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद समुपदेशन प्रक्रिया राबविणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांनी स्पष्ट केले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समुपदेशनाची प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे चौधर यांनी सांगितले.बदलीप्रक्रियेसाठी अपुरा अवधीमहाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने या बदलीप्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यातून बदलीची प्रक्रिया ४५ दिवसांची असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ दहा दिवस मुदतवाढ मिळाल्याने ही प्रक्रिया कशी पूर्ण होईल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. बदल्यांचे टप्पे या अवधीत पूर्ण होत नाही, असा आक्षेप संघटनेने घेतला आहे. शासन निर्णयातील तरतूद कोणत्याही विभागाच्या पत्राने बदलविता येत का, याची शक्यताही तपासण्याची विनंती संघटनेने केली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये आरोग्य विभागाने काही प्रकरणे बदलीसाठी पाठविली होती. मात्र ती परत केली गेली. तथापि औषध निर्माण अधिकाºयांच्या प्रकरणात मात्र भलताच निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद