शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात ‘चक्रीधरणे’त शेतकऱ्यांनी केले अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 11:40 IST

शासनाच्या नाकर्तेपणाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळात पाच दिवसांपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला.

ठळक मुद्देकाँग्रेस खासदारांचे नेतृत्व पाच दिवसांपासून शासनाविरोधी एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या नाकर्तेपणाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळात पाच दिवसांपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. दररोज अभिनव पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे नेतृत्व मंगळवारी हिंगोलीचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी केले.शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात यवतमाळच्या तिरंगा चौकात शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी शासनविरोधात एल्गार पुकारला आहे. दररोज एका विधानसभा क्षेत्रातील शेतकरी तिरंगा चौकात एकत्र येऊन आंदोलन करीत आहे. मंगळवारी उमरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. शासनाने शेतकऱ्यांना तसेही अर्धनग्न केले आहे. उद्धस्त झालेल्या या शेतकऱ्यांनी शर्ट आणि बनियान काढून केवळ पँट घालून हे आंदोलन केले. यावेळी खासदार राजीव सातव, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते राम देवसरकर, शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, अरूण राऊत, अशोक बोबडे, अनिल गायकवाड, अशोक भुतडा, शिवाजी सवनेकर, अविनाश काकडे, दिनेश गोगरकर, रमेश चव्हाण, नंदु अग्रवाल, सलीम सिद्धीकी, शैलेश कोपरकर, सोनू खातीब, शैलेश अनखुळे, बाबू दुर्गमवार, स्वप्नील नाईक, बालाजी आगलावे, अरविंद माने आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.शिवसेना-भाजपा युती सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारने शेतकऱ्यांना पोत्यावर आणले, असे म्हणत आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी अंगात पोत्यांचा सदरा घालून आणि गळ्यात अळीग्रस्त बोंडांच्या माळा घातल्या. हातात बेशरमचे झाड उंचावून सरकारचा निषेध केला.दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर आंदोलन घेण्यात आले. सरकारच्या अंगात शेतकऱ्यांचे रक्त नाही. त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून सरकारच्या अंगात शेतकऱ्यांचे रक्त संचारावे आणि शेतकरी मदतीची भावना निर्माण व्हावी, ही यामागची भूमिका होती. तिसऱ्या दिवशी मुंडण करून शासनाचा निषेध केला, तर चौथ्या दिवशी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांनी शासनविरोधी टाहो फोडला. गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची अद्याप शासनाने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करून राज्यभर पोहोचविण्याचा निर्धार शेतकरी संघर्ष समितीने केला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी