शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१५ दिवसांची सुट्टी तरीही गुरुजी नाखूशच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:21 IST

माणसाचे मन पाण्यासारखे असते. जिकडे उतार दिसला तिकडे धावत जाते... इतर कुणाच्या बाबतीत असो किंवा नसो, पण झेडपी गुरुजींचे मन पाण्याहूनही चपळ नव्हे चंचल आहे. कितीही मिळाले तरी आणखी हवेच, हा हव्यास काही सुटत नाही.

ठळक मुद्देआणखी सुट्ट्या वाढवा : ऐन दिवाळीत संघटनांच्या जिल्हा परिषदेत येरझारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माणसाचे मन पाण्यासारखे असते. जिकडे उतार दिसला तिकडे धावत जाते... इतर कुणाच्या बाबतीत असो किंवा नसो, पण झेडपी गुरुजींचे मन पाण्याहूनही चपळ नव्हे चंचल आहे. कितीही मिळाले तरी आणखी हवेच, हा हव्यास काही सुटत नाही. दिवाळीसाठी १३ दिवसांची घसघशीत सुटी मिळाल्यावरही गुरुजी आपले नाखूशच. १३ नव्हे आम्हाला १९ दिवसांची सुटी हवीच म्हणून जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवणे सुरू आहे.यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी जाहीर झाली आहे. त्यातही ४ तारखेचा आणि १८ तारखेचा रविवार आल्याने १५ दिवसांची दीर्घ सुटी मिळाली आहे. मात्र गुरुजीच ते, त्यांनी इतर जिल्हा परिषदांच्या तारखा शोधल्या आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकल्या. वाशीम जिल्हा परिषदेने ५ ते २२ आणि अमरावती जिल्हा परिषदेने ५ ते १७ नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांना सुट्या दिल्या आहेत. मग यवतमाळ जिल्हा परिषदेनेच सुट्या कमी का केल्या, असा सवाल शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला आहे.हो, दिवाळी सुट्यांच्या बाबतीत यवतमाळ जिल्हा परिषदेने अन्याय केला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना ५ ते २३ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी मिळावी, यासाठी आम्ही जिल्हा परिषदेत पाठपुरावा केला आहे.- दिवाकर राऊत, जिल्हाध्यक्ष, इब्टा संघटना

टॅग्स :Teacherशिक्षक