शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या ‘एनपीए’ने जिल्हा बँकेची नोकरभरती अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 21:50 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए (संभाव्य बुडित कर्ज) दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा परिणाम बँकेच्या कर्मचारी भरतीवर झाला आहे. या एनपीएमुळे सहकार आयुक्तांनी बँकेला प्रस्तावापेक्षा निम्म्याच जागांची भरती करण्याची परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देकेवळ १४७ पदांना मंजुरी : सहकार आयुक्तांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए (संभाव्य बुडित कर्ज) दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा परिणाम बँकेच्या कर्मचारी भरतीवर झाला आहे. या एनपीएमुळे सहकार आयुक्तांनी बँकेला प्रस्तावापेक्षा निम्म्याच जागांची भरती करण्याची परवानगी दिली आहे.जिल्हा बँकेने नाबार्डकडे लिपिक व शिपाई पदाच्या सुमारे ३५० जागांच्या भरतीचा प्रस्ताव सादर केला होता. गेली अनेक वर्ष यासाठी संचालकांनी पाठपुरावा केला. दरम्यान नोकरभरतीची परवानगी देण्याचे अधिकार सहकार आयुक्तांना देण्यात आले. त्यामुळे हा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे सादर करून त्याचा पाठपुरावा केला गेला. मात्र आयुक्तांनी लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांच्याच भरतीची परवानगी बँकेला दिली आहे. मागणीपेक्षा अर्ध्याच जागा भरण्याची परवानगी देण्यामागे बँकेचा ३३ टक्क्यांवर पोहोचलेला एनपीए हे प्रमुख कारण सांगितले जाते. पूर्वी बँकेचा एनपीए ४५ टक्के होता. तो आता ३३ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. नियमानुसार पाच टक्के एनपीएची सूट असते. मात्र हा स्टँडर्ड निकष कोणतीच बँक पाळू शकत नसल्याचा दावा जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने केला आहे. एनपीए पाच टक्क्याच्या आत असेल तर जिल्हा बँकेला नोकरभरतीसाठी आयुक्तांच्या परवानगीचीही गरज भासत नाही. लिपिकासाठी पदवीधर तर शिपायासाठी १२ वी उत्तीर्ण ही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. आॅनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार असून त्यानंतर मुलाखती घेतल्या जाणार आहे. ही नोकरभरती घेण्यासाठी एजंसीची शोधाशोध बँकेकडून केली जात आहे. ही एजंसी पारदर्शक असली तरच बँकेची नोकरभरती पारदर्शक पद्धतीने होईल, एवढे निश्चित. अन्यथा या नोकरभरतीसाठी संचालक मंडळी अनेक वर्षांपासून देव पाण्यात बुडवून बसले आहे. भरतीची कुणकुण लागताच अनेकांनी संचालकांचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याची माहिती आहे. काही वर्षांपूर्वी बँकेने घेतलेली नोकरभरती कोर्ट-कचेरीत अडकली होती.बँकेचा एनपीए वाढण्यामागे गेल्या चार वर्षांपासून असलेला दुष्काळ, त्या आडोशाने सरकारमधील कुणा ना कुणाकडून होणाऱ्या कर्जमाफीच्या घोषणा व एकूणच माफीचे वातावरण याबाबी कारणीभूत ठरल्याचे बँकेकडून सांगितले जाते. माफीच्या वातावरणामुळे नियमित कर्ज भरणाºयानेही हात आखुडता घेतला आहे. २०१९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन माफी होईल, अशी आशा शेतकºयांना आहे. त्यामुळेच एक तर सरसकट कर्ज भरणे टाळले जात आहे किंवा चार खाते असतील तर दोन खात्यातील कर्ज भरुन उर्वरित दोन खाते जाणीवपूर्वक थकीत ठेवले जात आहे. सततच्या या माफीमुळे शेतकºयांना कर्जाचे हप्ते पाडून द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरीच आणखी थकबाकीदार होतो आहे. यातूनच बँकेचे बुडित कर्ज वाढते आहे. सर्वच जिल्हा सहकारी बँकांचा एनपीए वाढला असून त्यातून राष्टÑीयकृत बँकांही सुटलेल्या नाहीत. वाढता एनपीए या बँकांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे.बँक म्हणते, दुष्काळ-कर्जमाफीमुळे वाढतोय ‘एनपीए’जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७०० कोटी रुपये कर्ज थकीत असून त्यात ९० टक्के पीक कर्ज आहे. २०१८-१९ मध्ये जिल्हा बँकेने ३५२ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. २०१६ मध्ये शासनाने ३० जूननंतरचे सुमारे ४०० कोटींचे कर्ज माफ केले नाही. केवळ या कर्जाची माहिती मागितली गेली होती. त्यामुळेच जिल्हा बँकेचा थकीत कर्जाचा आकडा ७०० कोटींवर पोहोचल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :bankबँक