शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या ‘एनपीए’ने जिल्हा बँकेची नोकरभरती अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 21:50 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए (संभाव्य बुडित कर्ज) दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा परिणाम बँकेच्या कर्मचारी भरतीवर झाला आहे. या एनपीएमुळे सहकार आयुक्तांनी बँकेला प्रस्तावापेक्षा निम्म्याच जागांची भरती करण्याची परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देकेवळ १४७ पदांना मंजुरी : सहकार आयुक्तांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए (संभाव्य बुडित कर्ज) दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा परिणाम बँकेच्या कर्मचारी भरतीवर झाला आहे. या एनपीएमुळे सहकार आयुक्तांनी बँकेला प्रस्तावापेक्षा निम्म्याच जागांची भरती करण्याची परवानगी दिली आहे.जिल्हा बँकेने नाबार्डकडे लिपिक व शिपाई पदाच्या सुमारे ३५० जागांच्या भरतीचा प्रस्ताव सादर केला होता. गेली अनेक वर्ष यासाठी संचालकांनी पाठपुरावा केला. दरम्यान नोकरभरतीची परवानगी देण्याचे अधिकार सहकार आयुक्तांना देण्यात आले. त्यामुळे हा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे सादर करून त्याचा पाठपुरावा केला गेला. मात्र आयुक्तांनी लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांच्याच भरतीची परवानगी बँकेला दिली आहे. मागणीपेक्षा अर्ध्याच जागा भरण्याची परवानगी देण्यामागे बँकेचा ३३ टक्क्यांवर पोहोचलेला एनपीए हे प्रमुख कारण सांगितले जाते. पूर्वी बँकेचा एनपीए ४५ टक्के होता. तो आता ३३ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. नियमानुसार पाच टक्के एनपीएची सूट असते. मात्र हा स्टँडर्ड निकष कोणतीच बँक पाळू शकत नसल्याचा दावा जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने केला आहे. एनपीए पाच टक्क्याच्या आत असेल तर जिल्हा बँकेला नोकरभरतीसाठी आयुक्तांच्या परवानगीचीही गरज भासत नाही. लिपिकासाठी पदवीधर तर शिपायासाठी १२ वी उत्तीर्ण ही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. आॅनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार असून त्यानंतर मुलाखती घेतल्या जाणार आहे. ही नोकरभरती घेण्यासाठी एजंसीची शोधाशोध बँकेकडून केली जात आहे. ही एजंसी पारदर्शक असली तरच बँकेची नोकरभरती पारदर्शक पद्धतीने होईल, एवढे निश्चित. अन्यथा या नोकरभरतीसाठी संचालक मंडळी अनेक वर्षांपासून देव पाण्यात बुडवून बसले आहे. भरतीची कुणकुण लागताच अनेकांनी संचालकांचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याची माहिती आहे. काही वर्षांपूर्वी बँकेने घेतलेली नोकरभरती कोर्ट-कचेरीत अडकली होती.बँकेचा एनपीए वाढण्यामागे गेल्या चार वर्षांपासून असलेला दुष्काळ, त्या आडोशाने सरकारमधील कुणा ना कुणाकडून होणाऱ्या कर्जमाफीच्या घोषणा व एकूणच माफीचे वातावरण याबाबी कारणीभूत ठरल्याचे बँकेकडून सांगितले जाते. माफीच्या वातावरणामुळे नियमित कर्ज भरणाºयानेही हात आखुडता घेतला आहे. २०१९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन माफी होईल, अशी आशा शेतकºयांना आहे. त्यामुळेच एक तर सरसकट कर्ज भरणे टाळले जात आहे किंवा चार खाते असतील तर दोन खात्यातील कर्ज भरुन उर्वरित दोन खाते जाणीवपूर्वक थकीत ठेवले जात आहे. सततच्या या माफीमुळे शेतकºयांना कर्जाचे हप्ते पाडून द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरीच आणखी थकबाकीदार होतो आहे. यातूनच बँकेचे बुडित कर्ज वाढते आहे. सर्वच जिल्हा सहकारी बँकांचा एनपीए वाढला असून त्यातून राष्टÑीयकृत बँकांही सुटलेल्या नाहीत. वाढता एनपीए या बँकांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे.बँक म्हणते, दुष्काळ-कर्जमाफीमुळे वाढतोय ‘एनपीए’जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७०० कोटी रुपये कर्ज थकीत असून त्यात ९० टक्के पीक कर्ज आहे. २०१८-१९ मध्ये जिल्हा बँकेने ३५२ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. २०१६ मध्ये शासनाने ३० जूननंतरचे सुमारे ४०० कोटींचे कर्ज माफ केले नाही. केवळ या कर्जाची माहिती मागितली गेली होती. त्यामुळेच जिल्हा बँकेचा थकीत कर्जाचा आकडा ७०० कोटींवर पोहोचल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :bankबँक