शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

होरपळलेले शेतकरी प्रशासनाच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 21:44 IST

निसर्गाच्या कोपाचा पहिला फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. पावसाविना होरपळलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांनी शेतशिवाराचे वास्तव मांडले. जूनमध्ये एकच पाऊस आला आणि आता गायब झाला.

ठळक मुद्देएकच पाऊस आला अन् गायब झाला : पऱ्हाटी गेली, सोयाबीन करपले, तूर जळाली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या कोपाचा पहिला फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. पावसाविना होरपळलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांनी शेतशिवाराचे वास्तव मांडले. जूनमध्ये एकच पाऊस आला आणि आता गायब झाला. त्यामुळे पऱ्हाटी गेली, सोयाबीन करपले, तूरही जळाली, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून अधिकारीही गहीवरले.बाभूळगाव तालुक्यातील कोटंबा, अल्लीपूर, मरळापूर, कृष्णापूर, पिंप्री, इंदिरानगर, झपाटखेड आणि नायगावातील शेतकऱ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव धेतली. यावेळी पावसाअभावी करपणाºया पिकांचे दु:ख जिल्हा प्रशासनापुढे मांडले. डोळ्यादेखत पऱ्हाटी, सोयाबीन, तूर, आणि इतर पीक करपत आहेत. या पिकांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. या गंभीर प्रकाराची कृषी विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. हातात असलेली सर्व जमापुंजी शेतशिवारात लावली. आता हातात काहीच उरले नाही. अशा स्थितीत वरूणराजाने दडी मारल्याने दु:खाला पारावार उरला नाही, असे दु:ख शेतकऱ्यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासनामार्फत हे दु:ख मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे शेतकरी आले होते.या भागामध्ये जून महिन्यात दोन तास पाऊस बरसला. त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. तेव्हापासून या भागात पाऊसच पडला नाही. आता शेतातले पीक करपले आहेत. जनावरांची वैरण संपली आहे. नवीन चारा तयारच झाला नाही. यामुळे जनावरांची देखभाल करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्ज माफ झाल्याची घोषणा झाली. मात्र या गावातील शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. नव्याने कर्जही उपलब्ध झाले नाही. गतवर्षी राज्य शासनाने तूर आणि हरभऱ्यासाठी क्विंटलला हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. अनुदानाचे पैसे केवळ ३ ते ४ शेतकऱ्यांच्याच हातात पडले. इतरांचे काय झाले, कोणालाच ठाऊक नाही. गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्या. २०१८-१९ मधील तर-हरभऱ्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकºयांनी केली.यावेळी ग्राम विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय गुगलिया, राजेंद्र गुगलिया, संजय राऊत, तेजस वसुले, अरूण वेळूकर, प्रमोद शिरभाते, गजानन ठाकरे, संतोष लोटकरे, विजय वाकेकर, नवीन खिवसरा, पुरूषोत्तम शिरभाते, मिलिंद पडोळे, रामचंद्र गुगलिया, प्रफुल्ल टिकले, संतोष कृष्णाके आदींसह विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट, अतिरिक्त ४० हजार क्विंटल बियाण्याची मागणीअपुºया पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाची पेरणी उलटत आहे. पिके संकटात सापडली आहे. हलक्या जमिनीतील पिके करपत आहे. परिणामी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे कृषी विभागाने दुबार पेरणीसाठी अतिरिक्त ४० हजार क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ १५ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुबार पेरणीची दाट शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने आयुक्त कार्यालयाकडे तूर आणि मका या अतिरिक्त बियाण्याची मागणी केली आहे. आयुक्त कार्यालयाकडे तूर्तास मका आणि तुरीच्या बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली. या बियाण्याची आॅगस्टपर्यंत लागवड करता येणार आहे. आॅगस्टच्या मध्यापर्यंत ते उगवण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना किमान माफक पीक घेणे शक्य होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस