शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

किराणा, दूध, भाजी नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

‘दुचाकी बंद, दुकानांच्या वेळांचा फेरविचार करा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन लगेच नवे आदेश जारी केले. त्यानुसार आता नागरिकांना भरउन्हात खरेदीला बाहेर पडण्याची गरज नाही. गुरुवारपासून पूर्वीप्रमाणे सर्व दिवस नियमित सकाळी ८ ते १२ या वेळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

ठळक मुद्देसकाळी ८ ते १२ : दुचाकी वाहनांना परवानगी, बँकाही सकाळीच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेली दोन दिवस कडाक्याच्या उन्हात खरेदीसाठी बाहेर पडावे लागलेल्या यवतमाळकरांना पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी बुधवारी दिलासा दिला. गुरुवारपासून दररोज सकाळी ८ ते १२ या वेळात दूध, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहणार आहे. त्यासाठी दुचाकी वाहनांचा वापरही करता येणार आहे. केवळ आपल्या रहिवासी परिसरातच या वस्तूंची खरेदी करण्याचे बंधन प्रशासनाने घातले आहे.‘दुचाकी बंद, दुकानांच्या वेळांचा फेरविचार करा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन लगेच नवे आदेश जारी केले. त्यानुसार आता नागरिकांना भरउन्हात खरेदीला बाहेर पडण्याची गरज नाही. गुरुवारपासून पूर्वीप्रमाणे सर्व दिवस नियमित सकाळी ८ ते १२ या वेळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. या काळात संबंधित दुकाने खुली राहतील. मात्र नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सक्ती आहे. या खरेदीच्या वेळात दुचाकी वाहनांवर बंदी राहणार नाही. परंतु १२ नंतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी नाही. १२ नंतर दुचाकी वाहनांनाही परवानगी राहणार नाही. तसे कुठे आढळल्यास कठोर कारवाई प्रशासनाकडून केली जाणार आहे. सर्व बँकांच्या वेळाही आता नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी ८ ते १२ या वेळातच नियमित करण्यात आल्या आहे. दवाखाने, मेडिकल्स आदी अत्यावश्यक सेवांना २४ तास सुरू राहणार आहे.भाजीपाल्यासाठी प्रशासनाने शहरातील २८ प्रभागात जागांचा शोध घेतला आहे. त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे भाजी मार्केट तयार केले जाणार आहे. कुणालाही भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी जाता येणार नाही. घराजवळच्या परिसरातूनच भाजीपाला, दूध, किराणा माल खरेदी करावा. उगाच मुख्य मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये, खरेदी करताना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचना प्रशासनाने केल्या आहे.पालकमंत्र्यांचा सील एरियासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’शहरातील १२ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र आहे. येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुरळीत पुरविण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. प्रतिबंधित क्षेत्राला चारही बाजूंनी पोलिसांची सुरक्षा कडे लावण्यात येईल. त्यानंतर या भागात भाजीपाला, किराणा दुकान, औषधी, दूध पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे. परिसरातील किराणा दुकान, मेडिकल स्टोअर्स यांच्या संपर्क क्रमांकाची यादी नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल. ज्या वस्तू लागतात, त्या फोनवरून संबंधित दुकानदाराकडे नागरिक मागतील. यादीप्रमाणे साहित्य घेऊन दुकानदाराचा माणूस संबंधित नागरिकांच्या घरापुढे हे साहित्य ठेवेल. यादी प्रमाणे पडताळणी करून लगेच त्या नागरिकाला संबंधित दुकानदाराकडे पैसे देता येईल. यामध्ये कुणाचाही कुणाशी संपर्क येणार नाही व नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येईल. सुरक्षा यंत्रणेवरही ताण पडणार नाही, असा अ‍ॅक्शन प्लॅन पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनापुढे ठेवला. त्याच्या अंमलबजावणीचे निर्देशही प्रशासनाला दिल्याचे सांगितले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड