शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

केंद्रीय समितीने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:35 IST

गुलाबी बोंडअळीने किती व काय नुकसान झाले, त्यांची कारणे काय, यासोबतच शेतकºयांच्या इतर व्यथा बुधवारी केंद्रीय समितीने कामठवाडा येथे जाणून घेतल्या. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी फोरेमन स्ट्रॅप (कामगंध सापळे) कृषी केंद्रांत उपलब्ध करुन देणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गुलाबी बोंडअळीने किती व काय नुकसान झाले, त्यांची कारणे काय, यासोबतच शेतकºयांच्या इतर व्यथा बुधवारी केंद्रीय समितीने कामठवाडा येथे जाणून घेतल्या. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी फोरेमन स्ट्रॅप (कामगंध सापळे) कृषी केंद्रांत उपलब्ध करुन देणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल, अशी माहिती समिती सदस्यांनी दिली.यावेळी माणिक कदम, दिलीप लोही, रोहन सावरकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या. त्यावर समितीचा अहवाल लवकरच केंद्राकडे पाठविला जाईल, असे मुख्य सचिव विजयकुमार यांनी सांगितले.समितीत कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार, निती आयोगाचे (कृषी) डॉ.बी.गणेशराम, दिना नाथ, डीसीटीचे निर्देशक डॉ.आर.पी. सिंग, डेप्युटी डायरेक्टर ओमप्रकाश सुमन, डॉ.तरुण कुमार, डॉ.एस.आर. होलेटी, निदेशक डॉ.ए.एच. प्रकाश, उपायुक्त एस. सेल्वाराज यांचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चवाळे, तहसीलदार रणजित भोसले, कृषी अधिकारी कैलास वानखडे, बीडीओ डॉ.मनोहर नाल्हे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, किशोर अंबरकर, सोनाली चव्हाण, सरपंच चंद्रशेखर डंभे आदी उपस्थित होते.मूळ प्रश्नाला बगलगुलाबी बोंडअळी येण्याला केवळ शेतकरी कसे दोषी. शेतमालाचे भाव वारंवार का पाडले जातात. बोंडअळीची जाहीर केलेली रक्कम अद्याप का मिळाली नाही. शेतमाल विकण्यासाठी अडचणींचा सामना का करावा लागतो. बियाणे, किटकनाशके व रासायनिक खतांच्या किंमतीवर सरकारचे नियंत्रण का नाही. कपाशीवर बोंडअळी येणार नाही, याची कोण हमी देणार, या व इतर प्रश्नांना समिती सदस्यांनी बगल दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी