शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

आठ गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाला इमारतच नाही

By admin | Updated: May 2, 2015 02:01 IST

तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अशा आहेत आहे की ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नाही.

आर्णी : तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अशा आहेत आहे की ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांच्या घरून किंवा इतर ठिकाणाहून चालतो. त्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत.ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्यामुळे विकास कामांना मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी अथवा एखाद्या दाखल्यासाठी भटकावे लागत आहे. या गावांमध्ये बारभाई, बोरगाव (पु), अंजनखेड, घोन्सरा, खंडाळा, माळेगाव, तेंडोळी, अंजनखेड, वरूड (म) आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये काही ठिकाणी राजीव गांधी भवन अंतर्गत काम घेतल्या गेले आहे. परंतु अद्याप बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे वास्तव दिसून येते.गावातील सर्व कामे ग्रामपंचायत अंतर्गत केली जात आहे. इतरही विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असणे सोयीचे ठरते. तेथून लोकांशी संपर्क साधणे सोपे जाते. त्यामुळे कामालाही गती येते. परंतु इमारतच नसल्यामुळे सर्वच कामे खोळंबतात. अनेक ग्रामपंचायतींना संगणक संच दिला गेला आहे. त्यासाठी एका आॅपरेटरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींचे स्वतंत्र कार्यालयच नसल्यामुळे संगणक धूळ खात पडले आहे किंवा सरपंचांच्या घरी ठेवण्यात आले आहे.परंतु या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारीसुद्धा या बाबत उदासीन दिसून येतात. काही दिवसांपूर्वी आर्णी पंचायत समिती सदस्य सारनाथ खडसे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बाबत माहिती देऊन आपण स्वत: याकडे लक्ष द्यावे, असे निवेदनही दिले होते. परंतु त्यानंतरही या बाबीकडे कुणाचेही लक्ष नाही. (शहर प्रतिनिधी)