शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

आठ गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाला इमारतच नाही

By admin | Updated: May 2, 2015 02:01 IST

तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अशा आहेत आहे की ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नाही.

आर्णी : तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अशा आहेत आहे की ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांच्या घरून किंवा इतर ठिकाणाहून चालतो. त्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत.ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्यामुळे विकास कामांना मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी अथवा एखाद्या दाखल्यासाठी भटकावे लागत आहे. या गावांमध्ये बारभाई, बोरगाव (पु), अंजनखेड, घोन्सरा, खंडाळा, माळेगाव, तेंडोळी, अंजनखेड, वरूड (म) आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये काही ठिकाणी राजीव गांधी भवन अंतर्गत काम घेतल्या गेले आहे. परंतु अद्याप बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे वास्तव दिसून येते.गावातील सर्व कामे ग्रामपंचायत अंतर्गत केली जात आहे. इतरही विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असणे सोयीचे ठरते. तेथून लोकांशी संपर्क साधणे सोपे जाते. त्यामुळे कामालाही गती येते. परंतु इमारतच नसल्यामुळे सर्वच कामे खोळंबतात. अनेक ग्रामपंचायतींना संगणक संच दिला गेला आहे. त्यासाठी एका आॅपरेटरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींचे स्वतंत्र कार्यालयच नसल्यामुळे संगणक धूळ खात पडले आहे किंवा सरपंचांच्या घरी ठेवण्यात आले आहे.परंतु या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारीसुद्धा या बाबत उदासीन दिसून येतात. काही दिवसांपूर्वी आर्णी पंचायत समिती सदस्य सारनाथ खडसे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बाबत माहिती देऊन आपण स्वत: याकडे लक्ष द्यावे, असे निवेदनही दिले होते. परंतु त्यानंतरही या बाबीकडे कुणाचेही लक्ष नाही. (शहर प्रतिनिधी)