शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आठ गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाला इमारतच नाही

By admin | Updated: May 2, 2015 02:01 IST

तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अशा आहेत आहे की ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नाही.

आर्णी : तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अशा आहेत आहे की ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांच्या घरून किंवा इतर ठिकाणाहून चालतो. त्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत.ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्यामुळे विकास कामांना मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी अथवा एखाद्या दाखल्यासाठी भटकावे लागत आहे. या गावांमध्ये बारभाई, बोरगाव (पु), अंजनखेड, घोन्सरा, खंडाळा, माळेगाव, तेंडोळी, अंजनखेड, वरूड (म) आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये काही ठिकाणी राजीव गांधी भवन अंतर्गत काम घेतल्या गेले आहे. परंतु अद्याप बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे वास्तव दिसून येते.गावातील सर्व कामे ग्रामपंचायत अंतर्गत केली जात आहे. इतरही विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असणे सोयीचे ठरते. तेथून लोकांशी संपर्क साधणे सोपे जाते. त्यामुळे कामालाही गती येते. परंतु इमारतच नसल्यामुळे सर्वच कामे खोळंबतात. अनेक ग्रामपंचायतींना संगणक संच दिला गेला आहे. त्यासाठी एका आॅपरेटरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींचे स्वतंत्र कार्यालयच नसल्यामुळे संगणक धूळ खात पडले आहे किंवा सरपंचांच्या घरी ठेवण्यात आले आहे.परंतु या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारीसुद्धा या बाबत उदासीन दिसून येतात. काही दिवसांपूर्वी आर्णी पंचायत समिती सदस्य सारनाथ खडसे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बाबत माहिती देऊन आपण स्वत: याकडे लक्ष द्यावे, असे निवेदनही दिले होते. परंतु त्यानंतरही या बाबीकडे कुणाचेही लक्ष नाही. (शहर प्रतिनिधी)