शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा उधारीवर ग्रामपंचायत निवडणूकीची नामुष्की

By admin | Updated: April 9, 2015 00:06 IST

जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होत आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होत आहे. यासाठी जिल्ह्याला चार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. प्रत्यक्षात ग्रामविकास विभागाने जिल्ह्याकडे ४५ लाख रुपयांचाच निधी वळता केला. यामुळे होणाऱ्या निवडणुका प्रशासनाला उधारीवर पार पाडाव्या लागणार आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार कोटी रुपये लागणार असल्याचा अहवाल निवडणूक विभागाने पाठविला आहे. यानंतरही ४५ लाखांचाच निधी मिळाल्याने जिल्हा प्रशासनाला उधारीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मंडप, वीज, डिझेल, वाहतूक, छपाई, अधिकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता, खासगी वाहने, स्पिकर, जनरेटर, शिक्के, व्हीडीओ चित्रिकरण, स्ट्राँग रुमची उभारणी, एसटीचे भाडे, पोस्टर्स, बॅनर, स्ट्रम पेट्या, जेवन, चहा आणि नाश्ता याबाबींसाठी लागणारा निधी आणायचा कोठून हा प्रश्न निवडणूक विभागापुढे आहे. यावर विचार होणे गरजेचे असल्याचे दिसून येते. एकंदरीत मागील अनुभव लक्षात घेता निवडणूक विभागाने उधारीवरच काम भागवावे लागणार आहे. (शहर वार्ताहर)जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचयतींची पोट निवडणूकजुनी बाकी ५१ लाख रुपये२०१० पूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी लागलेल्या निधीपैकी ४१ लाख रुपये अद्यापही मिळाले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी लागलेल्या निधीतील दहा लाख रुपयांचा निधी अद्यापही मिळायचा आहे. दहा हजार नामांकन दाखलजिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी दहा हजार ७०६ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. १० एप्रिल रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे.