शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

शेतक-यांच्या १९ बळींमागे सरकारची निष्क्रियता, यंत्रणेचा भ्रष्टाचार - राधाकृष्ण विखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 17:42 IST

राज्य सरकारची निष्क्रियता व यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यात १९ बळी गेले. या विषबाधा प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. 

यवतमाळ : राज्य सरकारची निष्क्रियता व यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यात १९ बळी गेले. या विषबाधा प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. विषबाधा प्रकरणाची माहिती घेण्यासाठी विखे गुरूवारी जिल्ह्यात आले. येथील शासकीय रूग्णालयात विषबाधितांशी संवाद साधून त्यांनी नंतर विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या घटनेत कृषी विभागाने अक्षम्य हलगर्जीपणा केला. नंतर आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले. जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनीही दुर्लक्ष केले. यानंतर जिल्हास्तरीय यंत्रणेनेसुद्धा हा विषय गांभीर्याने घेतला नाही. एकूणच संपूर्ण यंत्रणेचा बेजबाबदारपणा यातून उघड झाला. या सर्वांना त्वरित निलंबित करण्याची मागणी विखे यांनी केली.कृषीमंत्री, कृषी आयुक्तांना वेळ नाही. या सरकारला माणसांचा जीव स्वस्त आहे असे वाटते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कीटकनाशके सदोष आणि कालबाह्य असावी, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. यात कृषी अधीक्षक अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि व्यापाºयांचे संगनमत असून या सर्वांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण यंत्रणा खिळखिळी झाली असून पीकेव्हीच्या शास्त्रज्ञांनाही काय चालले याची माहिती नाही. राज्यात केवळ ‘चला हवा येऊ द्या’ आणि शिवसेनेचे ‘चला सत्ता सोडू द्या’, हे दोनच विनोदी कार्यक्रम सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्रीव्दय प्रा.वसंतराव पुरके व अ‍ॅड.शिवाजीराव मोघे, माजी आमदारव्दय विजय खडसे व विजयाताई धोटे, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी राधाकृष्ण विखे नागपूरवरून कळंब तालुक्यात दाखल झाले. त्यांनी विषबाधेने बळी गेलेल्या कळंब येथील देविदास मडावी या शेतक-याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी यवतमाळात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठून विषबाधित रुग्णांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही त्यांनी उपस्थिती नोंदवून प्रकरणाचा आढावा घेतला. उच्चस्तरीय चौकशीवर विश्वास नाहीराज्य शासनाने विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठित केली. मात्र या समितीवर आमचा विश्वास नसून एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे यांनी केली. एकीकडे शेतकरी मरत असताना सरकार समृद्धी मार्गाची घोषणा करते. त्याच परिसरात अधोगती होत आहे. दिव्याखाली अंधार असून या सर्व बाबींना वाली कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील