शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

शेतक-यांच्या १९ बळींमागे सरकारची निष्क्रियता, यंत्रणेचा भ्रष्टाचार - राधाकृष्ण विखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 17:42 IST

राज्य सरकारची निष्क्रियता व यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यात १९ बळी गेले. या विषबाधा प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. 

यवतमाळ : राज्य सरकारची निष्क्रियता व यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यात १९ बळी गेले. या विषबाधा प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. विषबाधा प्रकरणाची माहिती घेण्यासाठी विखे गुरूवारी जिल्ह्यात आले. येथील शासकीय रूग्णालयात विषबाधितांशी संवाद साधून त्यांनी नंतर विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या घटनेत कृषी विभागाने अक्षम्य हलगर्जीपणा केला. नंतर आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले. जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनीही दुर्लक्ष केले. यानंतर जिल्हास्तरीय यंत्रणेनेसुद्धा हा विषय गांभीर्याने घेतला नाही. एकूणच संपूर्ण यंत्रणेचा बेजबाबदारपणा यातून उघड झाला. या सर्वांना त्वरित निलंबित करण्याची मागणी विखे यांनी केली.कृषीमंत्री, कृषी आयुक्तांना वेळ नाही. या सरकारला माणसांचा जीव स्वस्त आहे असे वाटते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कीटकनाशके सदोष आणि कालबाह्य असावी, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. यात कृषी अधीक्षक अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि व्यापाºयांचे संगनमत असून या सर्वांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण यंत्रणा खिळखिळी झाली असून पीकेव्हीच्या शास्त्रज्ञांनाही काय चालले याची माहिती नाही. राज्यात केवळ ‘चला हवा येऊ द्या’ आणि शिवसेनेचे ‘चला सत्ता सोडू द्या’, हे दोनच विनोदी कार्यक्रम सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्रीव्दय प्रा.वसंतराव पुरके व अ‍ॅड.शिवाजीराव मोघे, माजी आमदारव्दय विजय खडसे व विजयाताई धोटे, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी राधाकृष्ण विखे नागपूरवरून कळंब तालुक्यात दाखल झाले. त्यांनी विषबाधेने बळी गेलेल्या कळंब येथील देविदास मडावी या शेतक-याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी यवतमाळात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठून विषबाधित रुग्णांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही त्यांनी उपस्थिती नोंदवून प्रकरणाचा आढावा घेतला. उच्चस्तरीय चौकशीवर विश्वास नाहीराज्य शासनाने विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठित केली. मात्र या समितीवर आमचा विश्वास नसून एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे यांनी केली. एकीकडे शेतकरी मरत असताना सरकार समृद्धी मार्गाची घोषणा करते. त्याच परिसरात अधोगती होत आहे. दिव्याखाली अंधार असून या सर्व बाबींना वाली कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील