शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 1:50 PM

पांढरकवडा (यवतमाळ) पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशती हल्ल्याचा तीव्र निषेध करतानाच, येत्या काळात देशाच्या संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याचे भरीव आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित महिला बचतगटांच्या महामेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला दिले.

ठळक मुद्देधीर धरा, सैन्यदलावर विश्वास ठेवाआम्ही सीआरपीएफला सांगितले आहे, जे करायचे ते करापाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनरेश मानकर/वर्षा बाशूपांढरकवडा (यवतमाळ) पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशती हल्ल्याचा तीव्र निषेध करतानाच, येत्या काळात देशाच्या संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याचे भरीव आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित महिला बचतगटांच्या महामेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला दिले.उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यवतमाळच्या वतीने आयोजित या महामेळाव्यास राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार व्यासपीठावर उपस्थित होते.पुलवामा येथील घटनेबाबत देशातील जनमानस संवेदनशील असताना, मोदींचे हे पहिलेच जाहीर भाषण असल्याने ते यावेळी काय बोलतात याकडे जनसामान्यांचे विशेष लक्ष राहणार होते. आपल्या भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी शहीद जवानांना पुनश्च एकवार श्रद्धांजली वाहिली व दोन मिनिटांचे मौन पाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, दोन महिलांना यावेळी घरांच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या.आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या २० रुग्णांची मोदी यांनी यावेळी भेट घेतली. तसेच नागपुरातील अजनी रेल्वेस्थानक ते पुणे दरम्यान सुरू होत असलेल्या हमसफर या रेल्वेगाडीचे ई उद्घाटन केले. यावेळी नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या रेल्वेचे थेट प्रक्षेपण सभास्थळी करण्यात आले होते.आपल्या भाषणात मोदी यांनी, यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याचा उल्लेख करून येथे आपण विशेषत्वाने आलो असल्याचे सांगितले. या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक नव्या योजना सुरू केल्याचा उल्लेख त्यांनी केला.जनसामान्यांचा आपल्यावर विश्वास आहे का असा सवाल त्यांनी उपस्थितांना करताच नागरिकांनी हात उंचावून आपले समर्थन त्यांना दर्शविले. तुमचा आशीर्वाद आम्हाला आहे का.. तो पुढेही राहील कां.. या मोदींनी केलेल्या प्रश्नांना जनसभेने हात उंचावीत आपला पाठिंबा दिला.२०२२ सालापर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के घरकुल देण्याचा मनोदय पंतप्रधानांनी व्यक्त करताच लोकांनी त्याला टाळ््यांच्या प्रतिसादात प्रत्युत्तर दिले.भाषणाची सुरुवात बंजारा व गोंडी भाषेतून केलीपंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ बंजारा, कोलामी व गोंडी भाषेतून केली. या भाषेतून त्यांनी, उपस्थितांना अभिवादन केले.याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या सभेस सुमारे एक लाखांहून अधिक जनसमुदाय उपस्थित असल्याची चर्चा होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला