शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:42 IST

पांढरकवडा (यवतमाळ) पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशती हल्ल्याचा तीव्र निषेध करतानाच, येत्या काळात देशाच्या संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याचे भरीव आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित महिला बचतगटांच्या महामेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला दिले.

ठळक मुद्देधीर धरा, सैन्यदलावर विश्वास ठेवाआम्ही सीआरपीएफला सांगितले आहे, जे करायचे ते करापाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनरेश मानकर/वर्षा बाशूपांढरकवडा (यवतमाळ) पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशती हल्ल्याचा तीव्र निषेध करतानाच, येत्या काळात देशाच्या संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याचे भरीव आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित महिला बचतगटांच्या महामेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला दिले.उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यवतमाळच्या वतीने आयोजित या महामेळाव्यास राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार व्यासपीठावर उपस्थित होते.पुलवामा येथील घटनेबाबत देशातील जनमानस संवेदनशील असताना, मोदींचे हे पहिलेच जाहीर भाषण असल्याने ते यावेळी काय बोलतात याकडे जनसामान्यांचे विशेष लक्ष राहणार होते. आपल्या भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी शहीद जवानांना पुनश्च एकवार श्रद्धांजली वाहिली व दोन मिनिटांचे मौन पाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, दोन महिलांना यावेळी घरांच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या.आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या २० रुग्णांची मोदी यांनी यावेळी भेट घेतली. तसेच नागपुरातील अजनी रेल्वेस्थानक ते पुणे दरम्यान सुरू होत असलेल्या हमसफर या रेल्वेगाडीचे ई उद्घाटन केले. यावेळी नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या रेल्वेचे थेट प्रक्षेपण सभास्थळी करण्यात आले होते.आपल्या भाषणात मोदी यांनी, यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याचा उल्लेख करून येथे आपण विशेषत्वाने आलो असल्याचे सांगितले. या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक नव्या योजना सुरू केल्याचा उल्लेख त्यांनी केला.जनसामान्यांचा आपल्यावर विश्वास आहे का असा सवाल त्यांनी उपस्थितांना करताच नागरिकांनी हात उंचावून आपले समर्थन त्यांना दर्शविले. तुमचा आशीर्वाद आम्हाला आहे का.. तो पुढेही राहील कां.. या मोदींनी केलेल्या प्रश्नांना जनसभेने हात उंचावीत आपला पाठिंबा दिला.२०२२ सालापर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के घरकुल देण्याचा मनोदय पंतप्रधानांनी व्यक्त करताच लोकांनी त्याला टाळ््यांच्या प्रतिसादात प्रत्युत्तर दिले.भाषणाची सुरुवात बंजारा व गोंडी भाषेतून केलीपंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ बंजारा, कोलामी व गोंडी भाषेतून केली. या भाषेतून त्यांनी, उपस्थितांना अभिवादन केले.याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या सभेस सुमारे एक लाखांहून अधिक जनसमुदाय उपस्थित असल्याची चर्चा होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला