शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तुषार व ठिबक संचाच्या अनुदानाला सरकारची कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची गळचेपी करत आहे. बाजार समिती संचालक निवडण्याचा अधिकार भाजपा सरकारने शेतकऱ्यांना दिला होता. तो अधिकार पुन्हा संपुष्टात आणला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या सल्ल्याने कारभार चालवितात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र धार्जीन धोरण राबविले जात आहे. विदर्भातील सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहे.

ठळक मुद्देअनिल बोंडे : सरकारने सिंचनाची कामे थांबवली, शेतकऱ्यांचा बाजार समितीतील मतदानाचा हक्क हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विद्यमान मुख्यमंत्री शेतकऱ्यांबाबत अनेक आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात मात्र भाजप सरकारच्या काळातील ठिबक व तुषार संचाच्या अनुदानाला कात्री लावण्याचे काम सुरू आहे. जलयुक्त शिवारसारखी उपयोगी योजना बंद केल्याचा आरोप माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केला.यवतमाळ जिल्हा दौºयावर असताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची गळचेपी करत आहे. बाजार समिती संचालक निवडण्याचा अधिकार भाजपा सरकारने शेतकऱ्यांना दिला होता. तो अधिकार पुन्हा संपुष्टात आणला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या सल्ल्याने कारभार चालवितात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र धार्जीन धोरण राबविले जात आहे. विदर्भातील सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहे.आता साखर कारखानदारी भोवतीच शासनाच्या योजना केंद्रीत होत आहेत, असा आरोप डॉ.अनिल बोंडे यांनी केला. बाजार समितीमधील काँग्रेस-राष्ट्रवादीची घराणेशाही मोडीत काढण्यासाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. बाजार समितीमध्ये हमालालाही मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र शेतकरी त्यापासून वंचित होता. आता पुन्हा शेतकऱ्याचा मतदानाचा अधिकार या सरकारने गोठवला आहे. जलयुक्त शिवार योजनेला लोकसहभाग व नियोजन समितीतून पैसा दिला जात होता. तो बंद केला असून रोजगार हमी योजनेतून ही योजना राबविण्याचे निर्देश आहे. या योजनेला स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. तुषार व ठिबक सिंचन अनुदान ४५ टक्क्यावरून फडणवीस सरकारने ८० ते ७५ टक्क्यापर्यंत केले होते. आदिवासी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान दिले जात होते.या सरकारने या अनुदानालाही कात्री लावली आहे. नानाजी देशमुख योजनेसाठी संरक्षित शेतीसाठी यांत्रिकीकरणावर भर देवून ७५ टक्के अनुदान दिले जात होते. आता हे अनुदान महाविकास आघाडी सरकारने कमी केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ५० हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.आता ते मुख्यमंत्री असताना ही मदत मिळाली. तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. यावेळी त्यांनी अन्य विषयांवरही आक्रमक मते मांडली.राज्याच्या कृषी धोरणावर राष्ट्रवादीचा पगडाराज्याच्या शेती धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच पगडा आहे. राष्ट्रवादीच्या बोळ्याने दूध पिवून कृषी धोरण राबविले जात असल्याचा घाणाघाती आरोप डॉ.अनिल बोंडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्यासाठी भाजप रस्त्यावर उतवून आंदोलन करेल, असाही इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेFarmerशेतकरी