शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकार आंधळ्याचे सोंग घेतेय : बच्चू कडू यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:23 IST

Amravati : २४ जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, निवडणुका संपल्यानंतर या आश्वासनाचा सरकारला विसर पडला. खरं तर शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. सरकार या अत्यंत संवेदनशील विषयात आंधळ्याचे सोंग घेत असल्याची खरमरीत टीका 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी केली.

अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून सुरू झालेल्या सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप आठव्या दिवशी सोमवारी महागाव तालुक्यातील अंबोडा येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रसिद्ध सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, आमदार रोहित पाटील, माजी आमदार ख्वाजा बेग उपस्थित होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. येथे उपस्थित राहिल्याने तुमचे ना नाव येणार होते, ना गाव येणार होते, तरीही लोकचळवळ म्हणून विश्वासाने उपस्थित राहिलात, माझ्याबरोबर १३८ किलोमीटर चाललात, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढे मरेपर्यंत शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी संघर्ष करीत राहीन, अशी ग्वाही कडू यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविरोधात संताप आहे. कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे दुःख हलके करण्याची संधी असताना सरकार वेळकाढूपणा करीत आहे. कर्जमाफीतून सरकारला सुटी देणार नाही, याच मागणीसाठी येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचीघोषणा बच्चू कडू यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तीन तास चक्का जामसातबारा कोरा पदयात्रेत सहभागी होण्यासाठी विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी अंबोडा येथे दाखल झाले होते. काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. तर काहींच्या हातात लाठ्याकाठ्यांसह रुमणे होते. या शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करीत महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.

चिलगव्हाण येथे शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने सहकुटुंब आत्महत्या केली होती. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून याची नोंद आहे. पदयात्रा निघाल्यानंतर बच्चू कडू यांनी चिलगव्हाण येथे जाऊन शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्यपाल महाराजही आवर्जून अंबोडा येथे आले होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीfarmer suicideशेतकरी आत्महत्या