शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकार आंधळ्याचे सोंग घेतेय : बच्चू कडू यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:23 IST

Amravati : २४ जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, निवडणुका संपल्यानंतर या आश्वासनाचा सरकारला विसर पडला. खरं तर शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. सरकार या अत्यंत संवेदनशील विषयात आंधळ्याचे सोंग घेत असल्याची खरमरीत टीका 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी केली.

अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून सुरू झालेल्या सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप आठव्या दिवशी सोमवारी महागाव तालुक्यातील अंबोडा येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रसिद्ध सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, आमदार रोहित पाटील, माजी आमदार ख्वाजा बेग उपस्थित होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. येथे उपस्थित राहिल्याने तुमचे ना नाव येणार होते, ना गाव येणार होते, तरीही लोकचळवळ म्हणून विश्वासाने उपस्थित राहिलात, माझ्याबरोबर १३८ किलोमीटर चाललात, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढे मरेपर्यंत शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी संघर्ष करीत राहीन, अशी ग्वाही कडू यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविरोधात संताप आहे. कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे दुःख हलके करण्याची संधी असताना सरकार वेळकाढूपणा करीत आहे. कर्जमाफीतून सरकारला सुटी देणार नाही, याच मागणीसाठी येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचीघोषणा बच्चू कडू यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तीन तास चक्का जामसातबारा कोरा पदयात्रेत सहभागी होण्यासाठी विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी अंबोडा येथे दाखल झाले होते. काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. तर काहींच्या हातात लाठ्याकाठ्यांसह रुमणे होते. या शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करीत महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.

चिलगव्हाण येथे शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने सहकुटुंब आत्महत्या केली होती. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून याची नोंद आहे. पदयात्रा निघाल्यानंतर बच्चू कडू यांनी चिलगव्हाण येथे जाऊन शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्यपाल महाराजही आवर्जून अंबोडा येथे आले होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीfarmer suicideशेतकरी आत्महत्या