शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकार आंधळ्याचे सोंग घेतेय : बच्चू कडू यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:23 IST

Amravati : २४ जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, निवडणुका संपल्यानंतर या आश्वासनाचा सरकारला विसर पडला. खरं तर शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. सरकार या अत्यंत संवेदनशील विषयात आंधळ्याचे सोंग घेत असल्याची खरमरीत टीका 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी केली.

अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून सुरू झालेल्या सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप आठव्या दिवशी सोमवारी महागाव तालुक्यातील अंबोडा येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रसिद्ध सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, आमदार रोहित पाटील, माजी आमदार ख्वाजा बेग उपस्थित होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. येथे उपस्थित राहिल्याने तुमचे ना नाव येणार होते, ना गाव येणार होते, तरीही लोकचळवळ म्हणून विश्वासाने उपस्थित राहिलात, माझ्याबरोबर १३८ किलोमीटर चाललात, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढे मरेपर्यंत शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी संघर्ष करीत राहीन, अशी ग्वाही कडू यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविरोधात संताप आहे. कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे दुःख हलके करण्याची संधी असताना सरकार वेळकाढूपणा करीत आहे. कर्जमाफीतून सरकारला सुटी देणार नाही, याच मागणीसाठी येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचीघोषणा बच्चू कडू यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तीन तास चक्का जामसातबारा कोरा पदयात्रेत सहभागी होण्यासाठी विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी अंबोडा येथे दाखल झाले होते. काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. तर काहींच्या हातात लाठ्याकाठ्यांसह रुमणे होते. या शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करीत महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.

चिलगव्हाण येथे शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने सहकुटुंब आत्महत्या केली होती. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून याची नोंद आहे. पदयात्रा निघाल्यानंतर बच्चू कडू यांनी चिलगव्हाण येथे जाऊन शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्यपाल महाराजही आवर्जून अंबोडा येथे आले होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीfarmer suicideशेतकरी आत्महत्या