शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:01 IST

भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री : शासन योजनांच्या प्रगतीचा लेखाजोखा, तीन लाखांवर शेतकºयांना कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी केंद्र्र आणि राज्य सरकार कार्य करीत आहे. हे सरकार माझं आहे, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी शासन व प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी आदी उपस्थित होते.शासनाच्या विविध योजनांची प्रगती पालकमंत्र्यांनी सांगितली. कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास तीन लाख १४ हजार शेतकºयांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार, सिंचन विहिरी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषिपंप विद्युत जोडणी, मागेल त्याला शेततळे आदी योजनांची प्रगती त्यांनी सांगितली. जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित अभ्यासिका होत आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या घरकुलासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटीक ट्रॅकसाठी निधी मंजूर झाला. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग भूसंपादनाचा शेतकºयांना थेट खरेदीने मोबदला दिला जात आहे. १८५ कोटींची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजूर झाली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी, एसपींचा सत्कारजिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. पोलिस उपनिरीक्षक सुरज बोंडे, यवतमाळच्या प्रथम महिला ठाणेदार शीतल मालटे, शिष्यवृत्तीत जिल्ह्यातून प्रथम आलेला अरमान शेंडे, पोलीस पाटील अशोक भोयर यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले.