शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चांगले वाचन घडविते चांगला माणूस

By admin | Updated: January 12, 2016 02:17 IST

माणूस आपोआप घडत नाही. चांगले वाचन चांगला माणूस घडवते. संतांनी आणि महापुरुषांनी वाचनाचे महत्त्व ओळखले होते.

रमाकांत कोलते : मराठी संवर्धन पंधरवडादिग्रस : माणूस आपोआप घडत नाही. चांगले वाचन चांगला माणूस घडवते. संतांनी आणि महापुरुषांनी वाचनाचे महत्त्व ओळखले होते. म्हणून विद्यार्थ्यांनीही चांगल्या ग्रंथांचं भरपूर वाचन करावे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.रमाकांत कोलते यांनी केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवडाअंतर्गत येथील बा.बु. कला, ना.भ. वाणिज्य आणि बा.पा. विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘मराठी वाचन संस्कृती आणि मराठीतील अभिजात ग्रंथसंपदा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.व्ही. आगरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ.रविकिरण पंडित, डॉ.अपर्णा पाटील होत्या. प्रा.डॉ.कोलते म्हणाले, संत तुकारामांनी ‘आधी पाठ केली संतांची उत्तरे’ हे प्रांजळपणे सांगितले, तर महात्मा चक्रधरांनी श्रवण पठन मनन हे ज्ञानप्राप्तीचे मार्ग सांगतांना वाचनाचे महत्त्व विषद केले. विनोबांनी विचार हाच आचाराचा बाप आहे, असं म्हटलं आहे आणि हा विचार वाचनातून निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ‘शासन व्यवहारात मराठीचा वापर’ या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक किरण आडे, द्वितीय अश्विनी गावंडे, तृतीय प्राजक्ता राठोड यांनी पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.गजानन खंडारे यांनी काम पाहिले. या पंधरवडाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)