शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी डॉक्टरांच्या सेवेने चार मुलींसह आईलाही जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 21:27 IST

यवतमाळच्या सरकारी दवाखान्याने चक्क चार गर्भ असलेल्या महिलेची किचकट वाटणारी प्रसुतीही नैसर्गिकरित्या घडवून आणली.

ठळक मुद्देचार गर्भ असूनही नैसर्गिक प्रसुतीगरीब आईसाठी दीड महिना झटले डॉक्टर

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चकाचक खासगी दवाखान्यांमध्ये सर्व सोयी असल्या तरीही बहुतांश गर्भवतींना ‘सिझर’ करण्याचाच मार्ग दाखविला जातो. पण यवतमाळच्या सरकारी दवाखान्याने चक्क चार गर्भ असलेल्या महिलेची किचकट वाटणारी प्रसुतीही नैसर्गिकरित्या घडवून आणली. सरकारी दवाखान्यांविषयीचा न्यूनगंड पुसून टाकणारी ही यशकथा कशी घडली? मजूर महिलेची दीड महिना सेवा करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनी हे शक्य केले. त्यांनी नेमकी कशी सेवा केली, कसे उपचार केले... वाचा त्यांच्याच शब्दात.‘एकाच वेळी चार मुलींना दिला जन्म’ या वृत्ताने गेल्या आठवड्यात अख्ख्या जिल्ह्याला आनंदित आणि चकितही केले होते. पहिली मुलगी असताना पुन्हा चार मुलींचे हसून स्वागत करणाऱ्या या आईचे नाव आहे, राणी प्रमोद राठोड. दारव्हा तालुक्यातील चिखली रामनाथ येथील राठोड दाम्पत्य रोमजुरी करणारे. राणी गर्भवती असताना तिला त्रास जाणवू लागला. ती यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात (मेडिकल) आली, तेव्हाच डॉक्टरांनी ओळखले, राणीच्या पोटात चार गर्भ आहेत. पण तिला एकाएकी सांगण्यापेक्षा डॉक्टरांनी आधी तिच्यावर योग्य उपचार करण्याचा निर्णय घेतला. गर्भ सहा महिन्यांचे झाल्यावर राणीला चार गर्भ असल्याची कल्पना दिली.

डॉक्टरांनी नेमके काय केले?आता ही प्रसुती यशस्वी करणे, हे डॉक्टरांसाठीही आव्हानच होते. प्रसुती विभाग प्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण, डॉ. निमिषा शर्मा, डॉ. सुषमा गोरे, डॉ. पूनम कुलसंगे, डॉ. भव्या दोशी, डॉ. प्रक्षक शहा यांच्या चमूने ही जबाबदारी स्वीकारली. राणीला दवाखान्यात भरतीच करून घेण्यात आले. रात्रंदिवस या चमूने राणीची सुश्रृषा केली. उपचारासोबतच तिच्या आहाराची डॉक्टरांनी काळजी घेतली. तिला भरपूर प्रोटीन मिळावे, यासाठी अंडी, फळे यासोबतच डॉक्टरांनी तिळाचे लाडू करून खाऊ घातले. दिवसातून दोन वेळा राणीला दूध दिले. प्रत्येक आठवड्यात तिचे वजन मोजण्यात आले. रक्तदाब वेळोवेळी तपासण्यात आला. दोन-दोन हप्त्यांनी रक्ततपासणी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सोनोग्राफी करून घेण्यात आली. गर्भवती रुग्णासाठी जे-जे करावे लागते ते सर्व डॉक्टरांनी केलेच; पण त्यासोबतच चार गर्भाची यशस्वी प्रसुती हे आव्हान पेलण्यासाठी डॉक्टर ‘सेवक’ही बनले. दर १५ मिनिटांनी आवश्यक औषध दिले.

गर्भपिशवीच्या आकुंचनावर लक्ष, गर्भ फिरण्याचा धोका टाळलाराणीला प्रत्यक्ष प्रसवकळा सुरू झाल्यावर डॉक्टरांपुढे खरे आव्हान होते. काहीही झाले तरी आईच्या जीवाला धोका होऊ नये, हे त्यांचे पहिले ‘लक्ष्य’ होते. अतिरक्तस्त्रावाने आईला धोका होऊ नये म्हणून आधीच दोन बॉटल रक्ताची व्यवस्था करण्यात आली. पण नंतर त्याची गरजच पडली नाही. चारपैकी पहिले बाळ बाहेर आल्यावर गर्भ पिशवीचे आकुंचन न झाल्यास दुसरे बाळ किंवा त्यानंतरच्या सर्वच बाळांची प्रसुती अशक्य झाली असती. मग सिझर करण्याशिवाय पर्यायच नसता. पण असे होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सलाईनद्वारे राणीला पिटोसीन हे औषध दिले. चारही बाळ पायाळू जन्माला आले. अशा घटनेत, पहिले बाळ जन्मास आल्यानंतर गर्भातील दुसरे बाळ फिरण्याचा धोका असतो. ते गर्भात फिरल्यास प्रसुती न होण्यासोबतच आईच्या जीवालाही धोका होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मग महिला डॉक्टरांनी आईचे पोट धरून ठेवले. आतील बाळांना फिरण्यापासून थांबवले आणि चारही मुलींचा जन्म पायाळूच झाला.डॉक्टर म्हणतात, आमचाही आत्मविश्वास वाढलायापूर्वी यवतमाळच्या ‘मेडिकल’मध्ये दोन गर्भ असलेल्या महिलांची प्रसुती करण्याचे प्रसंग अनेकदा आले. पण चार गर्भ असलेल्या महिलेची प्रसुती करण्याचा आमचाही हा पहिलाच प्रसंग होता. आम्ही सुरुवातीपासूनच ‘नैसर्गिक प्रसुती’ करण्याचा निर्णय घेतला होता. तो यशस्वीही झाला. आमच्या करिअरमध्ये ही घटना मार्गदर्शक ठरणार आहे. आता आमच्यामध्येही कितीही ‘क्रिटिकल’ पेशंट आला तरी उपचार करण्याचा आत्मविश्वास आला आहे, अशा शब्दात डॉ. रोहिदास चव्हाण, डॉ. निमिषा शर्मा, डॉ. सुषमा गोरे, डॉ. पूनम कुलसंगे, डॉ. भव्या दोशी, डॉ. प्रक्षल शहा यांनी आपली कृतार्थ भावना व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांचा पुढाकार व वेळोवेळी केलेले मार्गदर्शनसुद्धा तेवढेच महत्वपूर्ण ठरल्याचे या डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य