शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

साखर उद्योगाला विशेष पॅकेज द्या

By admin | Updated: March 29, 2015 00:11 IST

देशात आणि राज्यात गत तीन वर्षांपासून साखर उद्योगाची अत्यंत वाईट अवस्था आहे.

उमरखेड : देशात आणि राज्यात गत तीन वर्षांपासून साखर उद्योगाची अत्यंत वाईट अवस्था आहे. साखर उद्योगाला जिवंत ठेवायचे असेल तर केंद्र सरकारने १६ हजार कोटींचे पॅकेज द्यावे. केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कामगार व संचालक ३१ मार्च व १ एप्रिल रोजी लक्षवेध आंदोलन करणार असल्याची माहिती वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.गत तीन वर्षांच्या कार्यकाळात साखर उद्योग अडचणीत आला आहे. अनेक कारखाने बंद पडले आहे. आतापर्यंत कोणतीही वस्तू तयार झाली असताना निर्माण किमतीपेक्षा कमी दरात विकली जात नाही. साखर निर्मिती करीत असताना कमी दरात विकली जात आहे. ही बाब साखर उद्योगासाठी चिंताजनक आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला. त्यांचे पेमेंट वेळेत देण्यासाठी हाच मुद्दा महत्त्वाचा समजून तीन हजार प्रतिक्विंटलने निर्माण केलेली साखर २१४५ रुपये अशा पड्या भावाने ४५ हजार क्विंटल साखर बाजारात विकली. २०१३-१४ पर्यंत एफआरपीप्रमाणेच उसाला भाव दिला. परंतु चालू हंगामात निर्माण साखरेपेक्षा कमी दराने साखर विकावी लागत आहे. त्यामुळे एफआरपीएफप्रमाणे १८७८ रुपये ६५ पैसे एवढा भाव कोणताच कारखाना देवू शकत नाही. तेव्हा शासनाने खुशालपणे संचालकाविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहनही देवसरकर यांनी केले. एकीकडे शासन उद्योग समूहांना आर्थिक पाठबळ देते. परंतु कृषी प्रधान असलेल्या भारतातील शेतकऱ्यांच्या साखर उद्योगाला अनुदानित आर्थिक पाठबळ का देत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देशातील तयार केलेली साखर विदेशात निर्यात करावी, जे साखर कारखाने आजारी आहे त्यांचा वेगळा अभ्यासगट तयार करून त्यांना आपत्तीतून बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (शहर प्रतिनिधी)