शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री साहेब, कर्जमाफी आणि तुरीचे चुकारे द्या हो !

By admin | Updated: May 6, 2017 00:10 IST

आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतमालाचे दर दररोज कोसळत आहे.

शेतकऱ्यांचा टाहो : कर्ज वितरणासाठी बँकांकडे पैसाच नाही रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतमालाचे दर दररोज कोसळत आहे. तूर विक्रीचेही वांदे आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी नवनवीन आदेश काढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा सवाल करीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, तुरीचे चुकारे द्या, असा टाहो जिल्ह्यातील तमाम शेतकरी फोडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री बाभूळगाव दौऱ्यात काय घोषणा करतात, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गत काही वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. असा एकही दिवस जात नाही की शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. यावर्षी तुरीचे प्रचंड उत्पादन झाले. कर्जाचा डोंगर कमी होईल, अशी आशा होती. परंतु धडाधड तुरीचे दर खाली आले. नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कुचंबना झाली. १५-१५ दिवस शेतकऱ्यांना या ठिकाणी मुक्काम ठोकावा लागला. हे शुक्लकाष्ठ संपत नाही तोच सातबारावरील नोंदीपेक्षा अधिक तूर विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी हा आदेश असला तरी यात शेतकरीच बळी ठरणार आहे. शेतकऱ्यांचे तुरीचे चुकारे रखडले आहे. थकबाकीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याची नोटीस बँकांनी काढली. त्यातून संपूर्ण कर्जमाफीची मागणी पुढे आली. जिल्ह्यातील तब्बल एक लाख ३९ हजार शेतकरी ब्लॅक लिस्टमध्ये आहे. त्यांना ९५० कोटींच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. यात ५९६ कोटींचे कृषी कर्ज आहे. खरीपात शेतकऱ्यांना १९१२ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. मात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांकडे पैसेच नाही. दुसरीकडे सोयाबीन उत्पादकांनाही २०० रुपयाप्रमाणे २० क्विंटलपर्यंत अनुदान दिले नाही. २०१५ साली घोषित दुष्काळ निधीही शेतकऱ्यांना मिळाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी, असा प्रश्न आहे. दुसरीकडे वीज भारनियमनाने ओलिताला ब्रेक लागला आहे. केवळ २४ तासात आठ तासच वीज पुरवठा शेतीला होत आहे. मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे ते लक्ष देतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मुख्यमंत्री आज चार तास बाभूळगावात जिल्ह्यातील जलयुक्त शिवार, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशनच्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी ६ मे रोजी बाभूळगाव तालुक्यात येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील बैठक आटोपून दुपारी २ वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने बाभूळगावात येतील. २.१५ वाजता ते सरुळ येथे पोहोचणार आहेत. तेथे जलयुक्त शिवार, सिमेंट नाला खोलीकरण, गाळ काढणे, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन आदी कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता बाभूळगाव पंचायत समिती सभागृहात मुख्यमंत्री जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी नागपूरकडे रवाना होतील.