शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज विकासाची कामे वेळेत करा

By admin | Updated: October 19, 2015 00:22 IST

शेतकऱ्यांच्या दृष्टीने वीज जोडणी अतिशय महत्त्वाची आहे. मागेल त्या शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकाला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे.

संजय राठोड : जिल्हास्तरीय वीज वितरण नियंत्रण समितीची बैठक यवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने वीज जोडणी अतिशय महत्त्वाची आहे. मागेल त्या शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकाला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा सुविधा तसेच उपकेंद्राची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून त्याप्रमाणे कामे करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.बचत भवन येथे जिल्हास्तरीय वीज वितरण व नियंत्रण समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, वीज वितरणचे मुख्य अभियंता रंगारी, अधीक्षक अभियंता विजय भटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.जिल्ह्यात नवीन उपकेंद्र तसेच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय वीज कनेक्शन देण्यातील अडथळे दूर होणार नाही. त्यामुळे वीज कनेक्शनचे काम सातत्याने सुरु ठेवण्यासोबतच पायाभूत सुविधांनाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. मंजूर तथा प्रस्तावित वीज उपकेंद्रांसह वीजवाहिन्या तसेच आवश्यक बाबींनाही सातत्याने पुढे नेणे आवश्यक आहे. या कामांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याप्रमाणे काम करा. ज्या उपकेंद्रांना मुंबई स्तरावर मंजुरी अडली आहे, तेथे पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री राठोड म्हणाले. जिल्ह्यात वीज वितरणचे केवळ तीन विभाग आहे. जिल्ह्याचा विस्तार पाहता ग्राहकांना चांगल्या आणि जलद गतीच्या सुविधा देण्यासाठी दारव्हा आणि वणी हे दोन विभाग प्रस्तावित करा. या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी प्राप्त करून देऊ. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी विशेष बाब म्हणून ५७ कोटी रुपये शासनाने उपलब्ध करून दिले आहे. हा निधी तातडीने उपयोगात आणा. पुन्हा नव्याने निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री म्हणाले. वीज कनेक्शन वेळेत उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव काही ग्राहक आकोडे टाकून वीज घेत असल्याने वीजचोरीचे प्रमाण दिसून येते. या ग्राहकांना तातडीने कनेक्शन दिल्यास अशी चोरी होणार नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये तातडीने वीज कनेक्शन दिले जात असल्याची भावना निर्माण करा. त्यांच्यात तशी जनजागृती करा. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत मंजूर निधीतून कामाचे चांगले नियोजन करण्यासोबतच या योजनेतून जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)