शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

वीज विकासाची कामे वेळेत करा

By admin | Updated: October 19, 2015 00:22 IST

शेतकऱ्यांच्या दृष्टीने वीज जोडणी अतिशय महत्त्वाची आहे. मागेल त्या शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकाला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे.

संजय राठोड : जिल्हास्तरीय वीज वितरण नियंत्रण समितीची बैठक यवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने वीज जोडणी अतिशय महत्त्वाची आहे. मागेल त्या शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकाला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा सुविधा तसेच उपकेंद्राची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून त्याप्रमाणे कामे करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.बचत भवन येथे जिल्हास्तरीय वीज वितरण व नियंत्रण समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, वीज वितरणचे मुख्य अभियंता रंगारी, अधीक्षक अभियंता विजय भटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.जिल्ह्यात नवीन उपकेंद्र तसेच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय वीज कनेक्शन देण्यातील अडथळे दूर होणार नाही. त्यामुळे वीज कनेक्शनचे काम सातत्याने सुरु ठेवण्यासोबतच पायाभूत सुविधांनाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. मंजूर तथा प्रस्तावित वीज उपकेंद्रांसह वीजवाहिन्या तसेच आवश्यक बाबींनाही सातत्याने पुढे नेणे आवश्यक आहे. या कामांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याप्रमाणे काम करा. ज्या उपकेंद्रांना मुंबई स्तरावर मंजुरी अडली आहे, तेथे पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री राठोड म्हणाले. जिल्ह्यात वीज वितरणचे केवळ तीन विभाग आहे. जिल्ह्याचा विस्तार पाहता ग्राहकांना चांगल्या आणि जलद गतीच्या सुविधा देण्यासाठी दारव्हा आणि वणी हे दोन विभाग प्रस्तावित करा. या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी प्राप्त करून देऊ. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी विशेष बाब म्हणून ५७ कोटी रुपये शासनाने उपलब्ध करून दिले आहे. हा निधी तातडीने उपयोगात आणा. पुन्हा नव्याने निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री म्हणाले. वीज कनेक्शन वेळेत उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव काही ग्राहक आकोडे टाकून वीज घेत असल्याने वीजचोरीचे प्रमाण दिसून येते. या ग्राहकांना तातडीने कनेक्शन दिल्यास अशी चोरी होणार नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये तातडीने वीज कनेक्शन दिले जात असल्याची भावना निर्माण करा. त्यांच्यात तशी जनजागृती करा. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत मंजूर निधीतून कामाचे चांगले नियोजन करण्यासोबतच या योजनेतून जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)