शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

फसव्या कर्जमाफीविरुद्ध १०० शेतकऱ्यांची शवयात्रा

By admin | Updated: July 5, 2017 00:13 IST

राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. यात सर्व गरजू शेतकऱ्यांचा समावेश होणे शक्य नाही.

सर्वपक्षीय सहभाग : शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. यात सर्व गरजू शेतकऱ्यांचा समावेश होणे शक्य नाही. आकड्यांचा खेळ करून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मारले आहे. त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून १४ जुलै रोजी शंभर शेतकऱ्यांची शवयात्रा काढून अभिनव आंदोलन करण्याची घोषणा शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पत्रपरिषदेत केली.मंगळवारी समितीची जिल्हा बैठक येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात पार पडली. यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांच्या नेत्यांनी हजेरी लावली. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणाले, सरकारने गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाद केले आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकरी शवयात्रा काढणार आहेत. १०० तिरड्यांवर शेतकऱ्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. आमदार बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे आदी नेते या शवयात्रेत सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयाताई धोटे, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत, यवतमाळ बाजार समिती सभापती रवींद्र ढोक, आर्णी बाजार समिती सभापती राजू पाटील, अशोक भुतडा, गोपाल चव्हाण, प्रमोद कुदळे, संतोष अरसोड, पुष्पा नागतुरे, विजयराज शेगेकर, रामचंद्र मडकाम, गुलाब उमरतकर, राजेंद्र हेंडवे, चंद्रकांत अलोणे, रूस्तम शेख, आदींची उपस्थिती होती.सत्ताधाऱ्यांना अंत्यदर्शनाची खास सोयशेतकऱ्यांची शवयात्रा आंदोलनात शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा, आरपीआय, बामसेफ, संभाजी ब्रिगेड आदींसह विविध संघटना सहभागी होणार आहे. मात्र सत्ताधारी भाजपा आंदोलनापासून दूर आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे अंत्यदर्शन घेता यावे याकरिता दत्त चौकात शवयात्रा काही काळ थांबविण्यात येईल. सत्ताधाऱ्यांनी दत्त चौकात येऊन अंत्यदर्शन घ्यावे, असे पत्रकार परिषदेत देवानंद पवार यांनी सांगितले.