शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘मजीप्रा’वर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:09 IST

गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला.

ठळक मुद्देवाहनाची हवा सोडली : तुकडोजीनगरात पाणी नाही, पालिकेवरही धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला. तर दुसरीकडे बांगरनगरातील महिलांनी नगरपरिषदेवर धडक देत पाणीपुरवठा विभागाच्या कक्षात ठिय्या दिला.शहरातील पाणी प्रश्नाने बिकट रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. पाण्याची व्यथा मांडण्यासाठी आलेल्या या महिलांना कार्यकारी अभियंताच भेटले नाही. यामुळे मोर्चेकरी महिलांची तीव्र नाराजी झाली. त्यांनी प्राधिकरणाच्या कामकाजावर संताप नोंदविला.तुकडोजीनगरामध्ये गत महिनाभरापासून नळ नाही. या भागात १० ते १२ दिवसानंतरच टँकर फिरकतो. यात अर्धा ड्रम पाणी मिळते. या पाण्यात कसे होणार, असा प्रश्न या भागातील महिलांनी उपस्थित करीत प्राधिकरणाचे पाणी देण्याची मागणी केली. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना केल्यानंतरही नळ सोडले जात नााही. काही भागात चार ते पाच दिवसापासून नळ सुरू आहे. मात्र तुकडोजीनगराला पाणी मिळत नाही, अशी खंत या महिलांनी अभियंत्यापुढे व्यक्त केली. जीवन प्राधिकरणाचे नियोजन चुकले. प्रशासनाने कामकाजात दिरंगाई केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाणी न मिळाल्यास बुधवारपासून उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला. यावेळी महिलांनी आंदोलनाचा एक भाग म्हणून जीवन प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडली. यावेळी छाया सपाट, अर्चना गिरोळकर, संगीता चातूरकर, संध्या भोयर, कांता अंबागरे, लिला राऊत, सुधा भोयर, मंदा तपके, आशा सोनकुसरे, छबू पखाले उपस्थित होत्या. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून उपाययोजना तोकड्या पडत असल्याने नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. या संतापाला वाट मोकळी करण्यासाठी दररोज मोर्चे धडकत आहेत.विशिष्ट घरांनाच पाणीपुरवठाप्रत्येक वॉर्डात पाणीवाटपासाठी टँकर देण्यात आले आहे. मात्र नगरसेवक विशिष्ट घरांनाच पाण्याचे वाटप करतात, असा आरोप तुकडोजीनगरातील महिलांनी केला आहे. बांगरनगरामध्येही २५ दिवसांपासून नळ नाही. १० ते १५ दिवसानंतर या ठिकाणी टँकर फिरकतो. यामुळे महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहे, असा आरोप बांगरनगरातील महिलांनी केला आहे. यावेळी सुनिता बोरकर, वंदना आगमे, रूपाली उपरकार, सोनाली मेश्राम, प्रज्ञा बिडवे, महानंदा इंगळे, मिरा खांदवे, शांता वांडरे, दीपमाला राठोड उपस्थित होत्या.