शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

‘मजीप्रा’वर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:09 IST

गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला.

ठळक मुद्देवाहनाची हवा सोडली : तुकडोजीनगरात पाणी नाही, पालिकेवरही धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला. तर दुसरीकडे बांगरनगरातील महिलांनी नगरपरिषदेवर धडक देत पाणीपुरवठा विभागाच्या कक्षात ठिय्या दिला.शहरातील पाणी प्रश्नाने बिकट रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. पाण्याची व्यथा मांडण्यासाठी आलेल्या या महिलांना कार्यकारी अभियंताच भेटले नाही. यामुळे मोर्चेकरी महिलांची तीव्र नाराजी झाली. त्यांनी प्राधिकरणाच्या कामकाजावर संताप नोंदविला.तुकडोजीनगरामध्ये गत महिनाभरापासून नळ नाही. या भागात १० ते १२ दिवसानंतरच टँकर फिरकतो. यात अर्धा ड्रम पाणी मिळते. या पाण्यात कसे होणार, असा प्रश्न या भागातील महिलांनी उपस्थित करीत प्राधिकरणाचे पाणी देण्याची मागणी केली. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना केल्यानंतरही नळ सोडले जात नााही. काही भागात चार ते पाच दिवसापासून नळ सुरू आहे. मात्र तुकडोजीनगराला पाणी मिळत नाही, अशी खंत या महिलांनी अभियंत्यापुढे व्यक्त केली. जीवन प्राधिकरणाचे नियोजन चुकले. प्रशासनाने कामकाजात दिरंगाई केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाणी न मिळाल्यास बुधवारपासून उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला. यावेळी महिलांनी आंदोलनाचा एक भाग म्हणून जीवन प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडली. यावेळी छाया सपाट, अर्चना गिरोळकर, संगीता चातूरकर, संध्या भोयर, कांता अंबागरे, लिला राऊत, सुधा भोयर, मंदा तपके, आशा सोनकुसरे, छबू पखाले उपस्थित होत्या. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून उपाययोजना तोकड्या पडत असल्याने नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. या संतापाला वाट मोकळी करण्यासाठी दररोज मोर्चे धडकत आहेत.विशिष्ट घरांनाच पाणीपुरवठाप्रत्येक वॉर्डात पाणीवाटपासाठी टँकर देण्यात आले आहे. मात्र नगरसेवक विशिष्ट घरांनाच पाण्याचे वाटप करतात, असा आरोप तुकडोजीनगरातील महिलांनी केला आहे. बांगरनगरामध्येही २५ दिवसांपासून नळ नाही. १० ते १५ दिवसानंतर या ठिकाणी टँकर फिरकतो. यामुळे महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहे, असा आरोप बांगरनगरातील महिलांनी केला आहे. यावेळी सुनिता बोरकर, वंदना आगमे, रूपाली उपरकार, सोनाली मेश्राम, प्रज्ञा बिडवे, महानंदा इंगळे, मिरा खांदवे, शांता वांडरे, दीपमाला राठोड उपस्थित होत्या.