शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
2
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?
3
गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'
4
‘’कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना समज द्यावी अन्यथा…’’ काँग्रेसचा इशारा
5
'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना
6
Pakistan : पाकच्या अडचणी वाढणार! नद्या सुकणार, पाण्याचं मोठं संकट कोसळणार; अभ्यासातून आले समोर
7
INS Vikrant: सागरी सुरक्षेतील 'बाहुबली'! 'आयएनएस विक्रांत' पाहून पाकिस्तानलाही भरेल धडकी
8
या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, किंमत विक्रमी उच्चांकावर! क्षेपणास्त्रांच्या मोठ्या ऑर्डरवर कंपनीची नजर
9
'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका
10
देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षात वाद, बहिणीने भावावर केले असे आरोप  
11
"आता वेळ आलीय..." रशियाचा मास्टरस्ट्रोक! भारताबाबत असं केले विधान, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
12
'...तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते', राजनाथ सिंह यांचा INS विक्रांतवरुन मोठा खुलासा
13
IPL Playoffs मध्ये कशी राहिलीये हिटमॅन रोहितची कामगिरी? विराट-गिल ठरलेत त्याच्यापेक्षा भारी!
14
Garud Puran: गरुड पुराणानुसार रोज 'या' पाच चुका घडत असतील तर नरकाचे तिकीट फिक्स!
15
महिलेला दीड महिना साखळदंडाने बांधून ठेवले, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार, समोर आलं असं कारण
16
Palmistry: तळहातावर किंवा बोटांवर असलेला तीळ दर्शवतो तुमच्या यशापयशाचा आलेख!
17
शतकांचं महाशतक ठोकणाऱ्या सचिनलाही मोडता आले नाहीत हे ४ विक्रम, मोडले असते तर...!
18
Gokul Milk : 'गोकुळ'मधील पेच सुटला; अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची निवड
19
काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज
20
पाकिस्तानचे तुकडे अटळ?; बलूचिस्ताननंतर आता आणखी एका प्रांताने केली स्वतंत्र देशाची मागणी

वणी वनपरिक्षेत्रातील कृत्रीम पाणवठ्यांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

वणी वनपरिक्षेत्रात नवीन पाणवठ्यांसाठी वनविभागाच्यावतीने दोनवेळा वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळेल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. वणी वनपरिक्षेत्रात ३० कृत्रीम पाणवठे आहेत. यापैकी केवळ पाच ते सहा पाणवठ्यात आठ ते १० दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. त्यानंतर तीव्र उन्हामुळे हे पाणवठेदेखील आटण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनदी-नाल्यांवर निर्भर । वनविभागाला नव्या पाणवठ्यांसाठी निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी : जंगलात भटकणाऱ्या वन्यप्राण्यांची तहान भागावी, यासाठी वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यांमध्ये ठणठणाट असून त्यामुळे आता या वन्यजीवांना नदी किंवा नैसर्गीक नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. सध्यातरी मानव-वन्यजीवांच्या संघर्षाची या परिसरात घटना घडली नसली तरी भविष्यात अशी घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वणी वनपरिक्षेत्रात नवीन पाणवठ्यांसाठी वनविभागाच्यावतीने दोनवेळा वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळेल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. वणी वनपरिक्षेत्रात ३० कृत्रीम पाणवठे आहेत. यापैकी केवळ पाच ते सहा पाणवठ्यात आठ ते १० दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. त्यानंतर तीव्र उन्हामुळे हे पाणवठेदेखील आटण्याची शक्यता आहे. नाही म्हणायला अधुनमधून हजेरी लावणाºया अवकाळी पावसामुळे या पाणवठ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी साचते. परंतु नंतर तेही आटून जाते. त्यामुळे वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव लोकवस्त्यांकडे धाव घेण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.वणी वनपरिक्षेत्रात वाघ, हरिण, रोही, सांबर, रानडुक्कर, मोर, निलगाय, यासह अनेक वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. त्यांची जंगलातच तहान भागावी म्हणून वनविभागाच्यावतीन पाणवठे तयार करण्यात आले. परंतु हे पाणवठे कोरडे पडल्याने या वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी नदीकडे धाव घ्यावी लागत आहे. वणी वनपरिक्षेत्रातून वर्धा, पैनगंगा, निर्गुडा, विदर्भा यासह नांदेपेराजवळून एक मोठा नालाही वाहतो. या जलस्त्रोतातूनच वन्यजीव सध्यातरी आपली तहान भागवित असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.मोर, रानडुकरांच्या शिकारी वाढल्यासध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे जंगलातून जाणारे रस्तेही निर्मनुष्य आहे. परिणामी वन्यजीव मुक्तपणे भटकंती करताना दिसत आहे. यातच काही शौकीनांकडून मोर व रानडुकरांच्या मोठ्या प्रमाणावर शिकारी केल्या जात असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात