शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकऱ्यांना फसविणारा भामटा १९ वर्षानंतर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 15:48 IST

दारव्हा पोलिसांचे यश

मुकेश इंगोले

दारव्हा (यवतमाळ) : पोलिस के हाथ बहुत लंबे होते है, आरोपी कितीही चतूर असला तरी तो एक ना एक दिवस पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच, असे म्हटले जाते. याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. २००४ मध्ये लाखो रुपयांचा शेतमाल खरेदी करून मोबदला न देताच फरार झालेल्या एका भामट्यास दारव्हा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. दिनेश मानसिंग जाधव रा. आर्णी असे या आरोपीचे नाव आहे.

२००४ मध्ये दारव्हा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाची त्याने खरेदी केली. मात्र, मोबदला देण्याची वेळ आली, तेव्हा त्याने पळ काढला. अखेर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दारव्हा ठाणे गाठून तक्रार दिली. या फिर्यादीवरून आरोपी दिनेश विरोधात भादंवि कलम ४०६, ४२० प्रमाणे दारव्हा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो आढळला नाही. यावर पोलिसांनी दारव्हा न्यायालयात २९९ सीआरपीसीप्रमाणे दोषारोपत्र दाखल केले. यावर न्यायालयाने आरोपीस फरार घोषित केले. त्यानंतरही आरोपीचा शोध सुरू होता.

दरम्यान, ६ जुलै रोजी आरोपी दिनेश हा यवतमाळमध्ये आल्याची माहिती दारव्हा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांना मिळाली. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुरेश राठोड, ओंकार गायकवाड, निखील इंगोले, सलीम पठाण आदींनी यवतमाळ येथून दिनेशला उचलले. या प्रकरणाचा आता अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ