शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहारप्रकरण; महिला व्यवस्थापकासह तिघे निलंबित, एकाची सेवा संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 20:23 IST

जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील गैरप्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ‘जिल्हा बँकेची रोकड चक्क अवैध सावकारीत, आर्णी शाखेतील घबाड चार कोटींचे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आली.

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहारप्रकरणी (fraud) महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित, तर कंत्राटी कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील गैरप्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ‘जिल्हा बँकेची रोकड चक्क अवैध सावकारीत, आर्णी शाखेतील घबाड चार कोटींचे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. या प्रकरणाचे वास्तव संचालक मंडळापुढे ठेवण्याचे आदेश मंगळवारीच प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण परिस्थिती संचालक मंडळापुढे ठेवली गेली. अखेर तथ्य आढळल्याने आर्णी शाखेच्या व्यवस्थापक योगीता आडे (पुसनायके), रोखपाल विजय गवई व लेखापाल अमोल मुजमुले यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर कंत्राटी लिपिक अंकित मिरासे यांची सेवा संपुष्टात आणण्यात आली आहे. 

दरम्यान, याच शाखेतील शिपाई विलास अवघड यांना सतत गैरहजेरी व बेशिस्त वर्तनासाठी निलंबित करण्यात आले आहे. संचालक मंडळाने आर्णी शाखेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात चालकासह काहींच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, आर्णी शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांची तालुक्याबाहेर बदली करण्यात येईल, या शाखेचे सखोल लेखापरीक्षण करण्यासाठी त्रयस्थ चार्टर्ड अकाऊंटंटची (सीए) नियुक्ती केली जाईल, असे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, कुणी कितीही मोठा असो अथवा कुणाकडूनही दबाव आला तरी कारवाई होणारच, कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही कोंगरे यांनी म्हटले आहे.

जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतून रोख रक्कम परस्परच दोन टक्के व्याजदराने अवैध सावकारीत वापरली जात असल्याचा प्रकार पुढे आला. ही रक्कम कृषीतील व्यापाऱ्याला दिली जात होती. तसेच यवतमाळमध्ये ज्वेलर्समधील भीसीसाठी वापरली जात होती, अशी माहिती आहे. आर्णी शाखेत ३० लाखांची रोकड कमी असल्याच्या निनावी फोनने हे बिंग फोडले. प्रकार उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात पोत्यात भरून ही रोकड बँकेत भरण्यात आली. पोत्याने कॅश आणली जात असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. आर्णी शाखेत कर्ज वसुली, निराधारांचे अनुदान यातही सुमारे चार कोटींचे गौडबंगाल असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच मोठी संपत्तीही जमविली गेल्याचे बोलले जाते. गेल्या १४ वर्षांत पहिल्यांदाच जिल्हा बँकेत एवढी धडक कारवाई झाल्याने यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी