शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहारप्रकरण; महिला व्यवस्थापकासह तिघे निलंबित, एकाची सेवा संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 20:23 IST

जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील गैरप्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ‘जिल्हा बँकेची रोकड चक्क अवैध सावकारीत, आर्णी शाखेतील घबाड चार कोटींचे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आली.

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहारप्रकरणी (fraud) महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित, तर कंत्राटी कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील गैरप्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ‘जिल्हा बँकेची रोकड चक्क अवैध सावकारीत, आर्णी शाखेतील घबाड चार कोटींचे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. या प्रकरणाचे वास्तव संचालक मंडळापुढे ठेवण्याचे आदेश मंगळवारीच प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण परिस्थिती संचालक मंडळापुढे ठेवली गेली. अखेर तथ्य आढळल्याने आर्णी शाखेच्या व्यवस्थापक योगीता आडे (पुसनायके), रोखपाल विजय गवई व लेखापाल अमोल मुजमुले यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर कंत्राटी लिपिक अंकित मिरासे यांची सेवा संपुष्टात आणण्यात आली आहे. 

दरम्यान, याच शाखेतील शिपाई विलास अवघड यांना सतत गैरहजेरी व बेशिस्त वर्तनासाठी निलंबित करण्यात आले आहे. संचालक मंडळाने आर्णी शाखेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात चालकासह काहींच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, आर्णी शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांची तालुक्याबाहेर बदली करण्यात येईल, या शाखेचे सखोल लेखापरीक्षण करण्यासाठी त्रयस्थ चार्टर्ड अकाऊंटंटची (सीए) नियुक्ती केली जाईल, असे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, कुणी कितीही मोठा असो अथवा कुणाकडूनही दबाव आला तरी कारवाई होणारच, कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही कोंगरे यांनी म्हटले आहे.

जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतून रोख रक्कम परस्परच दोन टक्के व्याजदराने अवैध सावकारीत वापरली जात असल्याचा प्रकार पुढे आला. ही रक्कम कृषीतील व्यापाऱ्याला दिली जात होती. तसेच यवतमाळमध्ये ज्वेलर्समधील भीसीसाठी वापरली जात होती, अशी माहिती आहे. आर्णी शाखेत ३० लाखांची रोकड कमी असल्याच्या निनावी फोनने हे बिंग फोडले. प्रकार उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात पोत्यात भरून ही रोकड बँकेत भरण्यात आली. पोत्याने कॅश आणली जात असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. आर्णी शाखेत कर्ज वसुली, निराधारांचे अनुदान यातही सुमारे चार कोटींचे गौडबंगाल असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच मोठी संपत्तीही जमविली गेल्याचे बोलले जाते. गेल्या १४ वर्षांत पहिल्यांदाच जिल्हा बँकेत एवढी धडक कारवाई झाल्याने यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी